शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

खत कंपन्यांच्या लिंकिंगला राजकर्ते, अधिकारी जबाबदार - रघुनाथदादा पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: March 25, 2025 18:17 IST

नको असलेल्या खताची शेतकऱ्यांना सक्ती

सांगली : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यात पुन्हा केंद्र, राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे रासायनिक खत विक्रेत्यांकडून खत लिंकिंग जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांची गरज नसलेल्या पीजीआर आणि मिश्र खताची सक्ती केली जात आहे. हे उद्योग शासनाने थांबवली नाही तर सरकार आणि खत कंपन्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

पाटील म्हणाले, युरिया घेण्यासाठी नको असलेली मिश्र खते शेतकऱ्यांच्या माथी मारून लिंकिंग केले जात आहे. यामध्ये सरकारच सहभागी झाले आहे, याला आमचा विरोध आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा एकीकडे सांगतात, रासायनिक खताचे लिंकिंग करू नका असे सांगत आहेत. तरीही खत कंपन्या आणि खत विक्रेत्यांकडून लिंकिंग चालूच आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही ते दुर्लक्ष करत आहेत. खत कंपन्यांनाच त्यांचे पाठबळ दिसत आहे.

निवडणुकांमध्ये खत कंपन्यांकडून राजकीय पक्षांना देणग्या मिळत असल्यामुळे ते कंपन्यावर कारवाई करू शकत नाहीत. कृषी विभागाचे अधिकारीही त्यामुळेच गप्प आहेत. खत कंपन्यांच्या लिंकिंगविरोधात कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेकडे फर्टिलायझर कंपनीच्या तक्रारी आम्ही केल्या आहेत. तरीही नको असलेली मिश्र खते व इतर खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. युरियावर सबसिडी मात्र सोबत दिली जाणारी खते महागडी आहेत.

शरद पवार यांच्याकडून दोनवेळा आमदारकीची ऑफरतत्कालीन एका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मला भेटण्यासाठी प्रस्ताव दिला होता. आमदारकीचाही प्रस्ताव होता. पण, तो प्रस्ताव मी नाकारला. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांना शेतकरी संघटनेतून फोडून खासदार केले होते, असा गौप्यस्फोट रघुथनाथदादा पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.

तसेच मी खासदार, आमदार जनतेतून निवडणूक लढवूनच होणार आहे. पाच विधानसभा आणि चार लोकसभा निवडणुका आतापर्यंत लढलो आहे. मतदारांनी मला स्वीकारले नाही. तरीही शेतकऱ्यांसाठी यापुढेही निवडणुका लढतच राहणार आहे, असेही ते म्हणाले.

खत कंपन्यांकडून 'मॅनेज'साठी प्रयत्नखत लिंकिंगविरोधात आवाज उठवताच मलाही 'मॅनेज' करण्यासाठी रासायनिक खत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. माझ्या नातेवाइकांकडेही कंपनीचे प्रतिनिधी गेले होते. तरीही मी त्यांना मॅनेज झालो नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी खत कंपन्यांच्या विरोधात मी आवाज उठविणार आहे, असेही रघुनाथदादा पाटील म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारAgriculture Sectorशेती क्षेत्र