शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

योजना अभियान राबविणार : सदाभाऊ खोत -वाळवा तालुक्यामध्ये १ मेपासून पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:43 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात १ ते १५ मेपर्यंत शासनाच्या सर्व योजना घरा-घरापर्यंत पोहोचवणारा शासकीय पंधरवडा अभियानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात १ ते १५ मेपर्यंत शासनाच्या सर्व योजना घरा-घरापर्यंत पोहोचवणारा शासकीय पंधरवडा अभियानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मोतिबिंदूमुक्त वाळवा तालुका करण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने गावपातळीवर मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या सर्व यंत्रणांनी या काळामध्ये सामुदायिकपणे काम करुन तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील राजारामबापू नाट्यगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले—पाटील, विक्रम पाटील, दि. बा. पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, भास्कर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री खोत म्हणाले, ग्रामसभेतून मिळालेल्या अहवालाच्या आधारे तालुक्याच्या विकास कामांची दिशा निश्चित केली जाणार आहे. हा अहवाल हातात घेऊन संपूर्ण तालुक्यात गावदौरे करणार आहोत. शासकीय पंधरवडा अभियानातून बांधकाम कामगार योजना, शिधापत्रिका, संजय गांधी योजना, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, वारस दाखले जाग्यावर देण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य कार्ड वाटपही होईल. तालुक्यात गाई, म्हैशींचे गोठे वाढवले जातील. रमाबाई घरकुल योजना प्रभावीपणे राबविणार आहोत. कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.यावेळी प्रांताधिकारी जाधव यांनी गावनिहाय आढावा घेताना, सरकारी कामाच्या एक पाऊल पुढे जाऊन मदत करा, असे आवाहन केले. वीज वितरणबाबत आलेल्या सूचना व तक्रारींची गंभीरपणे दखल घेतली जाणार आहे. वारसा नोंदी प्रलंबित ठेवू नका. पाणंद रस्ते आणि वीज तारांच्या समस्या शोधून काढा. शासन आपल्या दारी अभियानातून नागरिकांची कामे थेट जागेवरच निर्गत करण्याचा प्रयत्न करा, असे स्पष्ट केले.या बैठकीस तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, वीज वितरण व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.गय करणार नाही : प्रांताधिकारी जाधवयेलूरमध्ये तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन तिघांचा बळी गेल्याच्या घटनेचे पडसाद बैठकीत उमटले. प्रत्येक गावातील विजेच्या तारा, खांब, फ्यूज पेट्या, जन्नित्र यांची गांभीर्याने विचारणा केली जात होती. प्रांताधिकारी जाधव यांनी, येलूर प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंत्यांवरही निलंबनाची कारवाई झाल्याचे सांगत, यापुढे कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला.इस्लामपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नागेश पाटील, राजेंद्र जाधव, निशिकांत भोसले—पाटील, दि. बा. पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत