शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

योजना अभियान राबविणार : सदाभाऊ खोत -वाळवा तालुक्यामध्ये १ मेपासून पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:43 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात १ ते १५ मेपर्यंत शासनाच्या सर्व योजना घरा-घरापर्यंत पोहोचवणारा शासकीय पंधरवडा अभियानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात १ ते १५ मेपर्यंत शासनाच्या सर्व योजना घरा-घरापर्यंत पोहोचवणारा शासकीय पंधरवडा अभियानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मोतिबिंदूमुक्त वाळवा तालुका करण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने गावपातळीवर मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या सर्व यंत्रणांनी या काळामध्ये सामुदायिकपणे काम करुन तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील राजारामबापू नाट्यगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले—पाटील, विक्रम पाटील, दि. बा. पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, भास्कर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री खोत म्हणाले, ग्रामसभेतून मिळालेल्या अहवालाच्या आधारे तालुक्याच्या विकास कामांची दिशा निश्चित केली जाणार आहे. हा अहवाल हातात घेऊन संपूर्ण तालुक्यात गावदौरे करणार आहोत. शासकीय पंधरवडा अभियानातून बांधकाम कामगार योजना, शिधापत्रिका, संजय गांधी योजना, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, वारस दाखले जाग्यावर देण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य कार्ड वाटपही होईल. तालुक्यात गाई, म्हैशींचे गोठे वाढवले जातील. रमाबाई घरकुल योजना प्रभावीपणे राबविणार आहोत. कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.यावेळी प्रांताधिकारी जाधव यांनी गावनिहाय आढावा घेताना, सरकारी कामाच्या एक पाऊल पुढे जाऊन मदत करा, असे आवाहन केले. वीज वितरणबाबत आलेल्या सूचना व तक्रारींची गंभीरपणे दखल घेतली जाणार आहे. वारसा नोंदी प्रलंबित ठेवू नका. पाणंद रस्ते आणि वीज तारांच्या समस्या शोधून काढा. शासन आपल्या दारी अभियानातून नागरिकांची कामे थेट जागेवरच निर्गत करण्याचा प्रयत्न करा, असे स्पष्ट केले.या बैठकीस तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, वीज वितरण व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.गय करणार नाही : प्रांताधिकारी जाधवयेलूरमध्ये तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन तिघांचा बळी गेल्याच्या घटनेचे पडसाद बैठकीत उमटले. प्रत्येक गावातील विजेच्या तारा, खांब, फ्यूज पेट्या, जन्नित्र यांची गांभीर्याने विचारणा केली जात होती. प्रांताधिकारी जाधव यांनी, येलूर प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंत्यांवरही निलंबनाची कारवाई झाल्याचे सांगत, यापुढे कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला.इस्लामपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नागेश पाटील, राजेंद्र जाधव, निशिकांत भोसले—पाटील, दि. बा. पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत