शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांविरुध्द उच्च न्यायालयात याचिका : मिरज महापालिकेवर दगडफेक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:08 IST

मिरज : महापालिकेवर दगडफेकप्रकरणी मिरजेतील आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरूध्द जिल्हा सुधार समितीचे तानाजी रुईकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिकेच्या इमारतीची नुकसान भरपाई संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.दहा वर्षांपूर्वी मिरजेतील रस्ते व पाणीप्रश्नी महापालिकेच्या मिरज कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा ...

ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान

मिरज : महापालिकेवर दगडफेकप्रकरणी मिरजेतील आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरूध्द जिल्हा सुधार समितीचे तानाजी रुईकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिकेच्या इमारतीची नुकसान भरपाई संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

दहा वर्षांपूर्वी मिरजेतील रस्ते व पाणीप्रश्नी महापालिकेच्या मिरज कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढून दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तत्कालीन नगरसेवक इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, आनंदा देवमाने, महादेव कुरणे, सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, विवेक कांबळे, समित कदम, महादेव कोरे, शिवसेनेचे बजरंग पाटील, रिक्षा संघटनेचे इलियास शेख, सुफी भोकरे, यासीन खतीब यांच्यासह २८ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मिरज न्यायालयाने २८ जणांना दोन वर्षे कैदेची शिक्षा दिली होती. शिक्षेच्या निर्णयाविरूध्द आजी-माजी नगरसेवकांनी जिल्हा न्यायालयात अपील केले होते. जिल्हा न्यायालयाने २० एप्रिल रोजी सर्व २८ जणांची शिक्षा रद्द ठरविली. या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पोलीस व महापालिकेने अपील केले नसल्याने, सुधार समितीचे तानाजी रुईकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मिरज न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आजी-माजी नगरसेवकांची शिक्षा कायम करुन त्यांच्याकडून महापालिकेच्या नुकसानीची भरपाई वसूल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.निवडून आलेल्या नगरसेवकांवर टांगती तलवारमहापालिकेवर दगडफेकप्रकरणी न्यायालयाने आजी-माजी नगरसेवकांना दोषी ठरविल्याने गत महापालिका निवडणुकीत इद्रिस नायकवडी यांची उमेदवारी अपात्र ठरली, तर मैनुद्दीन बागवान व सुरेश आवटी यांच्याविरूध्द न्यायालयात याचिका दाखल झाल्याने त्यांना कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्यात आली होती. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेल्याने, निवडून आलेल्या नगरसेवकांवर टांगती तलवार आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय