शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

अध्यक्ष साहेब, उसाला ३५०० रुपये दर द्या; एसएमएसद्वारे शेतकऱ्यांची कारखानदारांकडे मागणी  

By अशोक डोंबाळे | Updated: July 24, 2023 13:29 IST

साखर, उपपदार्थांचे दर चांगले असल्यामुळे जादा दर देणे शक्य

सांगली : साखर आणि साखर कारखान्यातील उपपदार्थांचे दर सध्या तेजीत आहेत. म्हणून ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांनी तोडणी व वाहतुकीचा खर्च वजा करून प्रतिटन किमान तीन हजार ५०० रुपये दर दिला पाहिजे. त्यानुसार कारखान्यांनी गेलेल्या उसाची अंतिम बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी एसएमएसद्वारे साखर कारखानदारांकडे करत आहेत.ऊस दराच्या प्रश्नांवर माजी खा. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना सहकार आघाडीप्रमुख संजय कोले यांनी प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दरासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा एसएमएसद्वारे साखर कारखान्याच्या अध्यक्षांकडे तीन हजार ५०० रुपये दर द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. त्यानंतर ऑगस्टमध्ये कारखान्यांवर मोर्चाने जाऊन वाढीव ऊस दराची मागणी करणार आहे, अशी माहिती संजय कोले यांनी दिली.कोले म्हणाले, गेले दोन वर्षे बाजारातील तीन हजार १०० रुपये क्विंटलपेक्षा चढे राहिल्याने आता साखरेच्या एमएसपीला अर्थ राहिलेला नाही. तरीही साखरेची एसएमपी तीन हजार ७५० रुपये करा नाहीतर उसाची एफआरपी पूर्णपणे देता येणार नाही, अशी शेतकऱ्यांना भीती घालण्याचा प्रयत्न महाराष्ट्र को -ऑप शुगर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष पी. आर. पाटील व खासगी कारखानदारांच्या ' विस्मा ' चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे हे करत आहेत. साखरेची एसएमपी वाढवून द्या, अन्यथा एफआरपी देणार नाही, अशी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे.शासनाकडे कारखानदार चुकीची मागणी करत आहेत. यात काही अर्थ नाही. गुजरात राज्यातील गणदेवी साखर कारखान्याने उसाला प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर तोडणी व वाहतुकीचे ७०० रुपये वगळून देत आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा कमी साखर उतारा असताना गणदेवी कारखाना प्रशासनाला जमत असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांना का जमत नाही, असा सवालही कोले यांनी केला.

कारखाने पुढाऱ्यांची जहागिरी : संजय कोलेमहाराष्ट्रात सहकारी कारखाने सभासदांचे नव्हे तर, पुढाऱ्यांच्या खासगी जहागिऱ्या झाल्या आहेत. नुकतीच काही मंडळी सहकारी कारखाना खरेदीच्या व्यवहारातून कारवाया होऊ नयेत म्हणून पक्ष फोडून सत्तेत गेले आहेत. सभासद निष्क्रिय असल्याने कारखानदार आपलीच मुले अध्यक्षपदी बसवत आहेत, असा आरोपही संजय कोले यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने