शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

तीन टप्प्यांत दर द्या, पण गुजरातच्या कारखान्याप्रमाणे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST

सांगली : नीती आयोग व केंद्रीय कृषी मूल्य समितीने एफआरपी हप्त्यात ऊस उत्पादकांना देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार तीन ...

सांगली : नीती आयोग व केंद्रीय कृषी मूल्य समितीने एफआरपी हप्त्यात ऊस उत्पादकांना देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार तीन हप्त्यात एफआरपी द्या, पण गुजरात राज्यातील साखर कारखाने व्यवस्थापन खर्च कमी करून ती रक्कमही वर्षाच्या शेवटी ऊस उत्पादकांना देत आहेत. याप्रमाणे महाराष्ट्रातील कारखान्यांनीही ऊस उत्पादकांना प्रति टन तीन हजार ४०० रुपयेपर्यंत दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटना सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी केली आहे.

संजय कोलेे म्हणाले, ऊस उत्पादकांची दरवर्षी आर्थिक कोंडी करण्याचे साखर कारखानदारांचे धोरण दिसत आहे. एफआरपी एकरक्कमी देण्याचा कायदा होता. त्यावेळीही साखर कारखानदार एफआरपीची तुकडेच करत होते. तेही अनेकवेळा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाहीत. आता तर केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्यास रीतसर परवाना दिला आहे. यापूर्वी गुजरात राज्यातील साखर कारखाने एफआरपीचे तुकडे करूनच शेतकऱ्यांना उसाचे बिल देत होते. परंतु, हे कारखानदार एफआरपी, तर शेतकऱ्यांना देत होते. याशिवाय, कारखाना व्यवस्थापनाचा खर्च कमी करून प्रति टन ४०० रुपये शेतकऱ्यांना देत होते. यामुळे गुजरात राज्यातील कारखाने शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार ४०० रुपयेपर्यंत दर देत आहेत. याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याने दर दिले, तर एफआरपीचे तुकडे करण्यास आमची काहीच हरकत नाही. पण, एफआरपीपेक्षा जादा दर दिला नाही, तर कारखान्यांचे गळीत हंगामही आम्ही चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.