शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

चारशे कोटींचा घोटाळा हा पवार यांचा जावईशोध

By admin | Updated: June 22, 2016 00:08 IST

पी. आर. पाटील : खोट्या, बालीश आरोपांना महत्त्व देत नाही

इस्लामपूर : शिवसेनेच्या पृथ्वीराज पवार यांनी राजकीय द्वेषातूनच माजी मंत्री, आमदार जयंत पाटील व राजारामबापू साखर कारखान्यावर आरोप केले आहेत़ चारशे कोटी घोटाळा हा त्यांचा जावईशोध आहे़ त्यांच्या खोट्या व बालीश आरोपांना आम्ही महत्त्व देत नाही. अशा शब्दात राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी.़ आऱ पाटील यांनी मंगळवारी पवार यांच्या आरोपांचे खंडन केले. पाटील म्हणाले, आ़ पाटील यांचे ३० वर्षांचे राजकीय, सार्वजनिक जीवन ही त्यांची तपश्चर्या आहे़ त्यांचा स्वच्छ व पारदर्शी कारभार, वागण्या-बोलण्यावरून समाजाने त्यांना ‘मिस्टर क्लिन’ ही प्रतिमा बहाल केली आहे़ एकाद-दुसऱ्या ‘चिल्लर माणसा’च्या आरोपावरून त्यांच्या प्रतिमेला ओरखडाही येऊ शकत नाही, याचे बोलणाऱ्यांनी भान ठेवावे.लॉटरी प्रकरणाबाबत आ़ पाटील यांनी अमेरिकेतून उत्तर दिले आहे़ ते भारतात परतल्यानंतर यावर सविस्तर बोलतीलच़ मात्र आज आम्ही एवढेच सांगू की, आम्ही त्यांच्याबरोबर गेल्या ३0 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात काम करीत असून, त्यांच्या हातून चुकीचे काम होऊ शकत नाही़ राजारामबापू कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या आग्रहावरून ठेवी कपात केल्या असून, आम्ही त्यांना या रकमेवर १० टक्के व्याज देणार आहोत़ पूर्वी अशा ठेवी घेतल्या जात होत्या़ मात्र मध्यंतरी त्या घेणे बंद केल्याने शेतकऱ्यांनीच ठेवी घेण्याची मागणी केल्याने आम्ही त्या घेतल्या आहेत़, असे ते म्हणाले.ते म्हणाले की, जत तालुक्यातील विकासाचे केंद्र बंद पडू नये, ही भावना आणि शेतकरी, कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून आम्ही तिप्पेहळ्ळीचा साखर कारखाना चालविण्यास घेतला़ तो आम्ही उस उत्पादकांच्या सहकार्याने चांगला चालविला़ मात्र राज्य शासनाने तिसऱ्या वर्षी तो आमच्याकडून काढून प्रशासक मंडळास चालवण्यास दिला़ दरम्यान, आम्ही या कारखान्यात दोन कोटी ३४ लाख रुपये गुंतविले होते, जो कोणी हा कारखाना घेईल त्यांनी ते द्यावेत, अशी आम्ही बॅँक व शासनाकडे मागणी केली होती. जेव्हा राज्य बॅँकेने सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टखाली या कारखान्याच्या विक्री निविदा काढल्या. तेव्हा त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही़ तिसऱ्यांदा आमच्याबरोबर आणखी २-३ निविदा विकल्या गेल्या. मात्र त्या परत आल्या नाहीत़ (प्रतिनिधी)राज्य बँकेवर संचालक नव्हे : प्रशासक होतेतिसऱ्यांदा आमच्याबरोबर आणखी २-३ निविदा विकल्या गेल्या. मात्र त्या परत आल्या नाहीत़ त्यावेळी राज्य बँकेवर संचालक मंडळ नव्हे, तर प्रशासक मंडळ होते़ कारखान्याची किंमत बँकेनेच निश्चित केली आहे़ हा सर्व व्यवहार पारदर्शी व स्वच्छ आहे. जर कोणाला मुख्यमंत्र्यांकडे जायचे असेल तर त्यांनी जरूर जावे़ आम्ही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत, असा टोलाही पी. आर. पाटील यांनी लगवला.