शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : पतंगराव कदम यांना परदेशातही आदरांजली , ओमान स्थित भारतीय नागरिक शोकाकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:48 IST

भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांना ओमान देशातील भारतीय नागरिकांकडून शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देपतंगराव कदम यांना परदेशातही आदरांजली ओमान स्थित भारतीय नागरिक शोकाकुल लाखोंचा पोशिंदा हरपल्याचे  दुःख 

प्रताप महाडिक कडेगाव : भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांना ओमान देशातील भारतीय नागरिकांकडून शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.ओमान देशाची राजधानी असलेल्या मस्कत शहरात प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील, सरला पाटील, रुक्मिणी पाटील, मधुरा पाटील, हर्षवर्धन पाटील (चिंचणी -तालुका कडेगाव) यांच्यासह ओमान स्थित वीरेंद्र जाधव (फलटण), दीपक कुंभार व करीम मुलाणी (निमसोड, तालुका कडेगाव ), अनिल जोशी, सोनाली जीशी, प्रीती जोशी  (भिलवडी, तालुका पलूस ), डॉ. श्रीमंत अडसूळ (बार्शी जिल्हा सोलापूर ), प्रशांत सोनावणे (लातूर ), सदाशिव मांगले, समृद्धी मांगले (गडहिंग्लज), डॉ. संजय निकम (कऱ्हाड) आदी भारतीय नागरिकानी  दिवंगत नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांना आदरांजली वाहिली.

यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्धल तिव्र दुःख व्यक्त केले व  त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित भारतीय नागरिकांनी गरिबांचा कैवारी व लाखोंचा पोशिंदा हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त करताना डॉ. पांडुरंग पाटील म्हणाले, मी १२ वीला असताना माझ्या वडिलांचे निधन झाले.

अनंत अडचणींना सामोरे जात मी कऱ्हाडच्या सायन्स कॉलेजला बीएस्सी झालो. पुढे शिकण्याची माझी परिस्थिती नव्हती. यावेळी डॉ. पतंगराव कदम साहेबानी मला पुण्याच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात एमएस्सीला प्रवेश दिला. पुढे मी पीएचडी केली. यानंतर मी लिबिया देशात प्रोफेसर म्हणून नोकरीसाठी गेलो. लिबियात अस्थिरतेमुळे फेब्रुवारी २०११ मध्ये माझ्यावर ओढवलेल्या संकटातूनसुद्धा मला साहेबांनीच बाहेर काढले व सुखरूप भारतात आणले होते.

आता मी ओमान देशाची राजधानी असलेल्या मस्कत शहरात तेथील मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या तांत्रिक महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. अशाप्रकारे संकटकाळी धावून येणारा आमचा आधारवड निखळला, असे  प्रोफेसर डॉ. पांडुरंग पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अनेक भारतीय नागरिकांनी भारती विद्यापीठात शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी परदेशात उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगितले व डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्धल दुःख व्यक्त केले.

साहेबांच्या फोनमुळे लिबियातून मायदेशात सुखरूप : डॉ. पांडुरंग पाटील सन २०११ मध्ये मी लिबिया देशातील अलमर्ग विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी त्या देशातील प्रजेने तेथील हुकूमशहा कर्नल गद्दाफी यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. त्यावेळी तेथे अस्थिरता निर्माण झाली. अस्थिरतेमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयायांना मायदेशी आणण्याचे काम भारत सरकार करत होते, परंतु लिबियातील भारतीय दूतावासालाही माझ्याशी संपर्क साधणे कठीण झाले होते. या कठीण प्रसंगात मीही अडकलो होतो.

यावेळी चिंचणी येथील माझे मित्र डॉ. भरत महाडिक यांनी  डॉ. पतंगराव कदम यांना सर्व हकिकत सांगितली. यावर डॉ. पतंगराव कदम यांनी भारताचे केंद्रीय मंत्री वायलर रवी यांना थेट फोन केला. साहेबांच्या या एका फोनची दखल घेऊन भारत सरकारने लिबियातील भारतीय दूतावासामार्फत मला २७ फेब्रुवारी २०११ रोजी सुरक्षीत मायदेशात आणले. परंतु या देवमाणसाने या ऋणातून मला उतराई होण्याची संधीही मला दिली नाही असे डॉ. पांडुरंग पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगली