शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पतंगराव कदम बोलले खरे, पण..!

By admin | Updated: December 3, 2015 23:55 IST

भानगडीमुळे महापालिका बदनाम : वर्चस्वाच्या लढाईचा पहिला अंक सुरू; कारभार सुधारण्याचे आव्हान

शीतल पाटील- सांगली --सांगली महापालिका आणि भानगडी यांचे नाते काही औरच आहे. भानगडीशिवाय महापालिकेत चांगले-वाईट घडू शकत नाही. जनतेच्या हितासाठी, विकासासाठी भानगडी केल्या, तर गोष्ट वेगळी. पण ‘बदनाम हुए तो क्या, नाम तो हुआ’ अशीच मानसिकता येथील कारभाऱ्यांची राहिल्याने, दररोज बोंबाबोंब सुरू आहे. आता काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांनी महापालिकेतील भानगडबाजीवर बोट ठेवले आहे. वर्षभरात पालिकेचा कारभार सुधारू, अशी ग्वाहीही दिली आहे. पण त्यांना कितपत यश मिळते, याविषयी सध्या तरी साशंकता आहे. कधी बीओटीची भानगड, तर कधी खुल्या भूखंडाची! एक ना अनेक भानगडी महापालिकेत दररोज सुरू असतात. मग सत्ताधारी कोण आहे, हे त्यासाठी महत्त्वाचे नसते. सत्ता कुणाचीही असली तरी, आजअखेर पालिकेतील भागनडीला लगाम घालता आलेला नाही, हेही तितकेच खरे आहे. महापालिका निवडणुकीनंतर पहिले वर्षभर विरोधकांची उपस्थिती जाणवते. नंतर मात्र सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हे शोधावे लागते. सेटलमेंटचे राजकारण हा तर नेहमीचाच खेळ बनला आहे. या साऱ्यातून जनतेच्या हाती काय पडले, याचा विचार पालिकेच्या पटलावर कधीच झाला नाही. एकीकडे नागरिक चांगले रस्ते, शुद्ध पाणी, आरोग्याच्या सुविधा या मूलभूत सुविधांसाठी टाहो फोडत असतात, तर दुसरीकडे महापालिकेत निवडून आलेले लोकसेवक मात्र स्वत:ची तुंबडी भरण्यातच मग्न असतात. त्यातही साऱ्यांनाच वाटा मिळतो असे नाही. पालिकेचा गाडा हाकणाऱ्या कारभाऱ्यांच्या हाती सारी सूत्रे असतात. सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी, स्वाभिमानीत असे दोन- चार कारभारी आहेत. तेच सारे निर्णय घेतात आणि आपल्या सहकाऱ्यांवर लादतात. यातूनच आता सत्ताधारी व विरोधकांत खदखद सुरू झाली आहे. कारभारी नगरसेवकांविरोधात दबाव गटाच्या नावाखाली नगरसेवक एकवटू लागले आहेत. यात केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर राष्ट्रवादीचेही नगरसेवक आहेत. कारभाऱ्यांनी केवळ आपल्या प्रभागाचा, स्वत:चा विकास करायचा आणि दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नगरसेवकांना वाऱ्यावर सोडायचे, या प्रकारातून आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. त्याला पालिकेतील अर्थकारणाची किनार असली तरी, प्रभागाच्या विकासाचा मुद्दाही नजरेआड करून चालणार नाही. म्हणून कुपवाड विभागीय कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी नगरसेवकांच्या खऱ्या दुखण्यावरच बोट ठेवले आहे. महापौर विवेक कांबळे, गटनेते किशोर जामदार, सुरेश आवटी यांना कानपिचक्या देताना प्रशासनालाही शेलक्या भाषेत टोचले आहे. मोठमोठे नगरसेवक निधी पळवितात आणि बारक्या नगरसेवकांवर अन्याय होतो, असे जाहीरपणे सांगून कदम यांनी, पालिकेत काय चाललंय याचा एक नमुनाच सांगितला. महापालिकेतील बोंबाबोंब थांबवा, असे सांगताना आयुक्तांच्या कारभाराबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यातून प्रशासन व कारभारी नगरसेवक काय धडा घेतात, हे भविष्यात कळेलच. खरी कसोटी : महापौर निवडीवेळीसध्या महापालिकेत वेगवेगळ्या कारभाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गटा-तटाचे राजकारण सुरू आहे. नगरसेवकांची विभागणी झाली आहे. त्यात दबाव गटाच्या नावाखाली नगरसेवकांचा एक मोठा गट एकत्र आला आहे. या साऱ्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली एकसंधपणे ठेवण्याचे आव्हान आ. पतंगराव कदम, जयश्रीताई मदन पाटील व विश्वजित कदम यांच्यासमोर आहे. फेब्रुवारी महिन्यात महापौर, उपमहापौर निवडी होत आहेत. या निवडीवेळी नेत्यांची कसोटी लागणार आहे. त्यासाठी कदम पिता-पुत्रानी आतापासूनच महापालिकेत लक्ष घालून नगरसेवकांना दुरूस्त करण्याची गरज आहे. भानगडी रोखणार तरी कोण? महापालिकेतील भानगडींना केवळ विशिष्ट पदाधिकारी, अधिकारीच कारणीभूत आहेत असे नाही. भानगडीच्या विषयात अर्थपूर्ण तडजोड यशस्वी ठरली, तर सारेच एकमेकाच्या सुरात सूर मिसळतात. तिथे कोणी विरोधक नसतो, कोणी सत्ताधारी नसतो. त्यामुळे नेत्यांनी कितीही घोषणा केल्या तरी, भानगडी रोखणे तसे मुश्किलीचे आहे.