शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Maharashtra Vidhan Sabha 2019 : लढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:17 IST

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.

ठळक मुद्देलढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम

शीतल पाटील सांगली : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. त्याखालोखाल जयंत पाटील, आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे, अनिल बाबर, संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनी आतापर्यंत सहावेळा निवडणूक लढविली आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. १९६२ पासून २०१४ पर्यंत विधानसभा निवडणुकीचा आलेख पाहता, सर्वाधिक आठ निवडणुका पतंगराव कदम यांनी लढविल्या आहेत. १९७८ ला पहिल्यांदा ते विधानसभेच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरले होते. त्यानंतर १९८० च्या निवडणुकीत ८६ मतांनी त्यांचा पराभव झाला.

१९८५ ला मात्र त्यांनी संपतराव चव्हाण यांचा पराभव करीत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९९० मध्येही ते विजयी झाले. १९९५ मध्ये त्यांचा संपतराव देशमुख यांनी पराभव केला; तर वर्षभराने झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. १९९९ ते २०१४ या कालावधीतील सर्व निवडणुकीत मात्र पतंगराव कदम यांनी बाजी मारली.राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर १९९० मध्ये जयंत पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढविली. त्यानंतर आजअखेर त्यांनी सहा निवडणुका वाळवा मतदारसंघातून जिंकल्या आहेत. दिवंगत नेते आर. आर. पाटील, अनिल बाबर हेही याचवर्षी विधानसभेत पोहोचले होते. या दोघांनीही सहा निवडणुका लढल्या.

कवठेमहांकाळ मतदारसंघातून अजितराव घोरपडे १९८५ पासून निवडणुका लढत आहेत. आतापर्यंत त्यांनी सहा निवडणुका लढविल्या आहेत. त्यांना यश मिळण्यास १९९५ पर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर १९९९, २००४ मध्ये पुन्हा निवडून आले. २००९ ला मतदार संघाची पुनर्रचना होऊन तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ तयार झाला. तेव्हा त्यांनी निवडणूक लढविली नाही. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरले, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आर. आर. आबांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध झाली. आता पुन्हा ते नशीब अजमावत आहेत. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही दोनदा विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना यश आले नाही.संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनीही सहावेळा विधानसभा निवडणूक लढविली. पवार यांना १९९९ व २००४ मध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर २००९ मध्ये पुन्हा ते भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. २०१४ मध्ये त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार मैदानात होते.

प्रा. शरद पाटील हेही १९८५ पासून निवडणुका लढवित आहेत. १९९० व १९९५ मध्ये ते विजयी झाले, तर एकदा पदवीधर मतदारसंघातून ते आमदार झाले होते. याशिवाय शिवाजीराव नाईक, उमाजी सनमडीकर यांनी पाचवेळा, तर मदन पाटील, पृथ्वीराज देशमुख, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव देशमुख, विलासराव शिंदे यांनी चारवेळा विधानसभेची निवडणूक लढविली आहे.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगली