शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : लढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:17 IST

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.

ठळक मुद्देलढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम

शीतल पाटील सांगली : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. त्याखालोखाल जयंत पाटील, आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे, अनिल बाबर, संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनी आतापर्यंत सहावेळा निवडणूक लढविली आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. १९६२ पासून २०१४ पर्यंत विधानसभा निवडणुकीचा आलेख पाहता, सर्वाधिक आठ निवडणुका पतंगराव कदम यांनी लढविल्या आहेत. १९७८ ला पहिल्यांदा ते विधानसभेच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरले होते. त्यानंतर १९८० च्या निवडणुकीत ८६ मतांनी त्यांचा पराभव झाला.

१९८५ ला मात्र त्यांनी संपतराव चव्हाण यांचा पराभव करीत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९९० मध्येही ते विजयी झाले. १९९५ मध्ये त्यांचा संपतराव देशमुख यांनी पराभव केला; तर वर्षभराने झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. १९९९ ते २०१४ या कालावधीतील सर्व निवडणुकीत मात्र पतंगराव कदम यांनी बाजी मारली.राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर १९९० मध्ये जयंत पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढविली. त्यानंतर आजअखेर त्यांनी सहा निवडणुका वाळवा मतदारसंघातून जिंकल्या आहेत. दिवंगत नेते आर. आर. पाटील, अनिल बाबर हेही याचवर्षी विधानसभेत पोहोचले होते. या दोघांनीही सहा निवडणुका लढल्या.

कवठेमहांकाळ मतदारसंघातून अजितराव घोरपडे १९८५ पासून निवडणुका लढत आहेत. आतापर्यंत त्यांनी सहा निवडणुका लढविल्या आहेत. त्यांना यश मिळण्यास १९९५ पर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर १९९९, २००४ मध्ये पुन्हा निवडून आले. २००९ ला मतदार संघाची पुनर्रचना होऊन तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ तयार झाला. तेव्हा त्यांनी निवडणूक लढविली नाही. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरले, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आर. आर. आबांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध झाली. आता पुन्हा ते नशीब अजमावत आहेत. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही दोनदा विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना यश आले नाही.संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनीही सहावेळा विधानसभा निवडणूक लढविली. पवार यांना १९९९ व २००४ मध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर २००९ मध्ये पुन्हा ते भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. २०१४ मध्ये त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार मैदानात होते.

प्रा. शरद पाटील हेही १९८५ पासून निवडणुका लढवित आहेत. १९९० व १९९५ मध्ये ते विजयी झाले, तर एकदा पदवीधर मतदारसंघातून ते आमदार झाले होते. याशिवाय शिवाजीराव नाईक, उमाजी सनमडीकर यांनी पाचवेळा, तर मदन पाटील, पृथ्वीराज देशमुख, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव देशमुख, विलासराव शिंदे यांनी चारवेळा विधानसभेची निवडणूक लढविली आहे.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगली