शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : लढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:17 IST

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.

ठळक मुद्देलढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम

शीतल पाटील सांगली : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. त्याखालोखाल जयंत पाटील, आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे, अनिल बाबर, संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनी आतापर्यंत सहावेळा निवडणूक लढविली आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. १९६२ पासून २०१४ पर्यंत विधानसभा निवडणुकीचा आलेख पाहता, सर्वाधिक आठ निवडणुका पतंगराव कदम यांनी लढविल्या आहेत. १९७८ ला पहिल्यांदा ते विधानसभेच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरले होते. त्यानंतर १९८० च्या निवडणुकीत ८६ मतांनी त्यांचा पराभव झाला.

१९८५ ला मात्र त्यांनी संपतराव चव्हाण यांचा पराभव करीत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९९० मध्येही ते विजयी झाले. १९९५ मध्ये त्यांचा संपतराव देशमुख यांनी पराभव केला; तर वर्षभराने झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. १९९९ ते २०१४ या कालावधीतील सर्व निवडणुकीत मात्र पतंगराव कदम यांनी बाजी मारली.राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर १९९० मध्ये जयंत पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढविली. त्यानंतर आजअखेर त्यांनी सहा निवडणुका वाळवा मतदारसंघातून जिंकल्या आहेत. दिवंगत नेते आर. आर. पाटील, अनिल बाबर हेही याचवर्षी विधानसभेत पोहोचले होते. या दोघांनीही सहा निवडणुका लढल्या.

कवठेमहांकाळ मतदारसंघातून अजितराव घोरपडे १९८५ पासून निवडणुका लढत आहेत. आतापर्यंत त्यांनी सहा निवडणुका लढविल्या आहेत. त्यांना यश मिळण्यास १९९५ पर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर १९९९, २००४ मध्ये पुन्हा निवडून आले. २००९ ला मतदार संघाची पुनर्रचना होऊन तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ तयार झाला. तेव्हा त्यांनी निवडणूक लढविली नाही. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरले, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आर. आर. आबांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध झाली. आता पुन्हा ते नशीब अजमावत आहेत. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही दोनदा विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना यश आले नाही.संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनीही सहावेळा विधानसभा निवडणूक लढविली. पवार यांना १९९९ व २००४ मध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर २००९ मध्ये पुन्हा ते भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. २०१४ मध्ये त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार मैदानात होते.

प्रा. शरद पाटील हेही १९८५ पासून निवडणुका लढवित आहेत. १९९० व १९९५ मध्ये ते विजयी झाले, तर एकदा पदवीधर मतदारसंघातून ते आमदार झाले होते. याशिवाय शिवाजीराव नाईक, उमाजी सनमडीकर यांनी पाचवेळा, तर मदन पाटील, पृथ्वीराज देशमुख, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव देशमुख, विलासराव शिंदे यांनी चारवेळा विधानसभेची निवडणूक लढविली आहे.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगली