शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Patangrao Kadam Funeral : 'आमचा देव हरपला!'कडेगाव पलूस तालुक्यावर शोककळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 13:08 IST

डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने वृत्त येताच शुक्रवारी रात्रीपासून कडेगाव व पलूस तालुक्यात व परिसरात सन्नाटा पसरला होता.

सांगली/कडेगाव : डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने वृत्त येताच शुक्रवारी रात्रीपासून कडेगाव व पलूस तालुक्यात व परिसरात सन्नाटा पसरला होता. या नेत्याने ताकारी, टेंभू योजनांच्या माध्यमातून या दुष्काळी भागात हरितक्रांती केली. रोजगार निर्मितीमधून हजारो कुटुंबांचे संसार फुलविले. त्यामुळे इथल्या प्रत्येक घरात कर्ता पुरुष गमावल्याचे चित्र दिसत होते. शुक्रवारी रात्री  कदम यांच्या निधनाचे वृत्त कडेगाव-पलूस तालुक्यात समजताच एकच शांतता परिसरात पसरली, तर अनेकांच्या घरातली चूलही पेटली नाही.

शनिवारी सकाळी तालुक्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. दोन्ही तालुक्यातील शाळा, महाविद्यालयात डॉ.पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व शाळांना सुट्टी देण्यात आली. कडेगाव, वांगी, सोनहिरा कारखाना, चिंचणी, सोनसळ, शिरसगाव, देवराष्ट्रे आदी गावांसह सर्व गावोगावी डॉ. पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. दरम्यान चाहत्यांच्या आक्रोशाने सोनहिरा हेलावला। कंठात दाटलेले हुंदके, डोळ्य़ांतून ओघळणारे अश्रू आणि भावनावेगाने फोडलेला हंबरडा यामुळे सोनहिरा कारखाना व सोनसळ परिसरातील वातावरण शनिवारी कमालीचे भावूक झाले. कदम यांच्या जन्मगावी सोनसळ येथे तसेच कडेगाव-पलूस तालुक्यात प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. आमचा देव हरपला असा आवाज दाटून आलेल्या कंठातून निघत होता.

तशा पोस्ट सोशल मीडियात सर्वत्र फिरत होत्या. 'साहेब परत या’ अशी इच्छा व्यक्त केली जात होती. अनेक जण धाय मोकलून रडत होते. साहेब आपल्यात नाहीत हेच त्यांना सहन होत नव्हते. कडेगाव पलूस तालुक्यासह, जिल्ह्यातील आणि राज्यातील आजपर्यंतच्या अनेक सभा डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांच्या दिलखुलास  गाजवल्या होत्या. मात्र, यापुढे त्यांचा आवाज येथे परत ऐकू येणार नसल्याची खंत प्रत्येकालाच जाणवत होती. चाहत्यांच्या आक्रोशाने सोनहिरा हेलावला. कंठात दाटलेले हुंदके, डोळय़ांतून ओघळणारे अश्रू आणि भावनावेगाने फोडलेला हंबरडा यामुळे सोनहिरा कारखाना परिसरातील वातावरण शनिवारी  कमालीचे भावूक झाले. 

दरम्यान सोनहिरा कारखाना परिसरात दुपारी ४ वाजता डॉ.पतंगराव कदम यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान शुक्रवारी रात्री   जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांचेसह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. मोठी गर्दी होणार असल्यामुळे वाहनांच्या पार्किंगसह बैठक व्यवस्था  याबाबत याबाबतची माहिती घेतली. तसेच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.