शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खासगी शिवशाही चालकांच्या दादागिरीमुळे प्रवासी त्रस्त, रात्री प्रवाशांची ससेहोलपट

By संतोष भिसे | Updated: September 26, 2022 19:02 IST

शहरातील प्रवासात छोटे थांबे घेत नसल्याने प्रवाशांना भुर्दंड

सांगली : खासगी शिवशाही गाड्यांवरील चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासातील तसेच शहरातील प्रवासात छोटे थांबे घेत नसल्याने प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत आहे.एसटी महामंडळाकडे खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या मोठ्या संख्येने आहेत. त्यामध्ये वाहत नियुक्त नसतो. त्यामुळे चालक मनमानीपणे सेवा देत असल्याने उत्पन्न बरेच घटले होते. थांब्यावर प्रवाशांनी हात केल्यानंतरही गाडी न थांबविणे, रिकामीच पळविणे असे प्रकार सुरु होते. याला आळा घालण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी आपले वाहक नियुक्त केले. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. गाड्या भरुन धावू लागल्या. पण त्यानंतरही चालकांची दादागिरी थांबली नाही.पुण्या-मुंबईहून आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या सामान्यत: शहरातील छोट्या थांब्यांवर प्रवासी उतरण्यासाठी थांबतात. सांगलीत शासकीय रुग्णालय, पुष्पराज चौक, बाजार समिती, विश्रामबाग, विजयनगर, वॉन्लेसवाडी, मिरजेत वंटमुरे कॉर्नर, रेल्वेस्थानक असे थांबे घेत जातात. एसटीच्या सर्व बसेस व शिवशाही गाड्या तेथे थांबतात. खासगी शिवशाहीचे चालक मात्र थांबत नाहीत. सांगली बसस्थानकानंतर थेट विश्रामबाग आणि मिरज बसस्थानकांत थांबतात. त्यामुळे अध्येमध्ये उतरु इच्छिणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात.विशेषत: रात्री उशिरा शहरात आलेल्या प्रवाशांना रिक्षासाठी जादा पैसे मोजावे लागतात. या छोट्या थांब्यांवर थांबण्यासाठी वाहकाने सूचना करुनही दुर्लक्ष केले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चालकांना सक्त सूचना देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

खासगी लक्झरी थांबतात, मग शिवशाही का नाही?खासगी प्रवासी कंपन्यांच्या गाड्या सर्व थांब्यांवर थांबतात, एकेक प्रवासी घेतात किंवा उतरवतात. मग शिवशाही का थांबत नाही? असा प्रवाशांचा प्रश्न आहे. एसटीच्या उत्पन्नाशी काहीही देणेघेणे नसलेल्या खासगी चालकांमुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीShivshahiशिवशाहीpassengerप्रवासी