शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्वमध्ये पानमळे नामशेष होणार

By admin | Updated: September 4, 2015 22:09 IST

पानाला कवडीमोल किंमत : खुडेकऱ्यांची मजुरीही परवडेना; पानमळ्यांवर कुऱ्हाड

दिलीप कुंभार -नरवाड---मिरज पूर्व भागातील पान उत्पादकांच्या पानांना बाजारपेठेत कवडीमोल किंमत मिळत असल्याने, अखेर पानवेलीच काढून टाकण्याचा निर्णय अनेक पान उत्पादकांनी घेतला आहे. नीचांकी दराने पाठ सोडली नसल्याने, अखेर ज्या हाताने पानवेलीला पाणी देऊन जतन केले, त्याच हातांनी नाईलाजास्तव कुऱ्हाड चालवावी लागत असल्याचे विदारक चित्र मिरज पूर्वभागातून दिसू लागले आहे.-मिरज पूर्वभागात पानमळे मोठ्या प्रमाणावर आहेत. पान उत्पादकांना १८ वाफ्यांचा एक गुंठा पानमळा तयार करण्यासाठी २५२ पानवेली लागतात. एका वाफ्यात १४ पानवेलींची लागण करतात. ४० आर क्षेत्रासाठी १० हजार ८० पानवेली लागतात. पानवेलीच्या बिया म्हणून साडेसात कांड्याचे खोडाकडील कलम वापरतात. एका कलमाची किंमत सात रुपये असते. एक एकर क्षेत्रावर पानवेलींची लागण करण्यासाठी ७० हजार ५६० रुपये इतका खर्च येतो.याशिवाय ठिबक सिंचन सेटसाठी ५५ हजार रुपये, शेवगा, शेवरी, पानमळ्याला तटबंदी आदींचा खर्च २५ हजार रुपये येतो. एक एकर पानमळा घालून उत्पादन सुरू करण्यासाठी एक लाख ४० हजार ५६० रुपये खर्च येतो. एवढी प्रचंड गुंतवणूक करूनही पानांना पान बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्याने उत्पादक चिंतातूर झाले आहेत. पानांचा दर घसरल्याने पान मळ्यातील वेल बांधणे आणि खुडा करणे पान उत्पादकांना परवडत नसल्याने पदरमोड करावी लागत आहे. याबाबत जाधव यांनी सांगितले की, पान मळ्यातील कामगारांचा खर्च निघत नसल्याने पानमळा तोडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही.दर मिळत नसल्याने हंगाम परवडेनाएकेकाळी मिरज पूर्वभागाचे वैभव, अशी या भागातील पानमळ्यांची ओळख होती. देशभरात येथील पान निर्यात होत होते. मात्र गेल्या काही वर्षात वाढती शेतमजुरी, अवास्तव शेणखतांचे दर आणि भरपूर लागणारे पाणी यातून सध्या तरी पानांच्या मिळणाऱ्या भावात सावरणे अशक्य असल्याचेही मत येथील पानमळे बागायतदार काकासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. भविष्यात पानवेलींच्या पानांच्या दराची अशीच घसरण कायम राहिल्यास पानमळा शेतीच नामशेष होण्याची भीती परिसरातील पान उत्पादक बागायतदांतून व्यक्त होत आहे. उत्पादकांचा जून ते डिसेंबर हा पाने खुडण्याचा हंगाम असतो, पण यावर्षी हंगाम सुरू होऊन सप्टेंबर महिना उजाडला तरी पानांना दर मिळत नसल्याने, मळ्यांवर कुऱ्हाड चालविणे उत्पादकांना भाग पडत आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रथमच पानांच्या दराने नीचांकी पातळी गाठली आहे. सांगोला, पंढरपूर, उस्मानाबाद, पुणे, रत्नागिरी, मुंबई, कलकत्ता, बनारस, राजकोट (गुजरात) आदी प्रमुख पान बाजारपेठेत मंदीचे सावट कायम आहे. यामुळे नरवाड (ता. मिरज) येथील काकासाहेब जाधव यांनी दराची वाट पाहून स्वत:च आजवर जपलेल्या आपल्या पानमळ्याला कुऱ्हाड लावली आहे.