शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजपची सत्ता उलथवून टाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:30 IST

ऐतवडे बुद्रुक : लोकांना कायम गुंगीत ठेवून, कायम आपल्याच हाती सत्ता ठेवण्याची हिटलरची पद्धत नरेंद्र मोदी भारतात वापरत आहेत. परंतु सध्या लोकजागृती होत आहे. त्यामुळे देशात व राज्यात समविचारी पक्ष एकत्र येऊन देशातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाची सत्ता उलथवून टाकतील, असा विश्वास राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त ...

ऐतवडे बुद्रुक : लोकांना कायम गुंगीत ठेवून, कायम आपल्याच हाती सत्ता ठेवण्याची हिटलरची पद्धत नरेंद्र मोदी भारतात वापरत आहेत. परंतु सध्या लोकजागृती होत आहे. त्यामुळे देशात व राज्यात समविचारी पक्ष एकत्र येऊन देशातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाची सत्ता उलथवून टाकतील, असा विश्वास राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे भाजपमधून राष्टÑवादीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, पशुवैद्यकीय रूग्णालयात कर्मचारी निवासस्थान इमारत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील प्रसुतिगृहाचे उद्घाटन, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार जयंत पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. आ. जयंत पाटील म्हणाले, पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानला संपवू, अशी वल्गना करणाऱ्या भाजपने आतंकवाद पसरविणाºया पीडीपीसारख्या पक्षाशी सत्तेसाठी युती केली. त्यामुळे जवानांचे नाहक बलिदान होत आहे व आतंकवाद पसरतच आहे. विशिष्ट विचारधारा असणारे हे लोक राज्यघटना बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्यावतीने संविधान बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दलित आरक्षण बदलू पाहणारे धनगर आरक्षण, मराठा आरक्षण याबद्दल काय भूमिका घेणार, याकडे लोकांचे लक्ष आहे. सर्वधर्मसमभाव मानणाºया पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्यासारख्या समाजसुधारकांची हत्या करणाºया प्रवृतींना पाठीशी घालण्याचे पाप हे लोक करीत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे धनगर, मुस्लिम व मराठा आरक्षण रखडले आहे. सध्या न्यायव्यवस्था व न्यायाधीशही सुरक्षित नाहीत.शेतकºयांच्या हिताचे कोणतेही निर्णय या सरकारने घेतलेले नाहीत. साखरधंदा केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आला. तूर, कापूस, सोयाबीनला आधारभूत किंमत नाही. दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.राष्टÑवादीने माझ्यावर राज्याची जबाबदारी सोपविली आहे. महाराष्टÑात येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी नंबर १ ला असणार आहे. तरी आपल्या हक्काच्या तासगाव, इस्लामपूर व शिराळा या तीन जागा लोकांनी व कार्यकर्त्यांनीच निवडून आणल्या पाहिजेत. ऐतवडे बुद्रुक गावाच्या विकासासाठी पाणी असणे गरजेचे असून शहाजी गायकवाड हे त्यादृष्टीने उत्तम काम करीत आहेत, असेही पाटील म्हणाले.यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, ग्रामीण भाग व शेतकºयांना समजून घेणारे सरकार असणे सध्या गरजेचे आहे. राष्टÑवादीच्या माध्यमातून राज्याला अग्रेसर करण्यासाठी सहकार्य करावे.यावेळी राष्टÑवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा छाया पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीना मलगुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, बॅँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, संचालक शहाजी गायकवाड, तालुका सभापती सचिन हुलवान, पंचायत समिती सदस्या धनश्री माने, डॉ. धनंजय माने, शेखरवाडीचे सरपंच बबन माळी, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, ढगेवाडीचे संदीप सावंत, डोंगरवाडीचे दशरथ लबडे, बाळासाहेब पाटील, अनिरुद्ध गायकवाड, केदारनाथ खडके, शंकर घोडके, अरविंद गायकवाड, प्रकाश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.