शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

सांगली जिल्ह्यातील अडीच लाखांवर शेतकऱ्यांकडे नाही ‘फार्मर आयडी’; विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार

By अशोक डोंबाळे | Updated: April 23, 2025 18:59 IST

आता ‘फार्मर आयडी’ अनिवार्य 

अशोक डोंबाळे

सांगली : केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’, तसेच राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवण्यासाठी ‘फार्मर आयडी’ (शेतकरी ओळखपत्र) काढणे शेतकऱ्यांसाठी सक्तीचे आहे. जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ तीन लाख ३४ हजार ९९५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे. उर्वरित जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडीच काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.‘फार्मर आयडी’ ही ओळख प्रणाली ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पाअंतर्गत विकसित केली आहे. शेतकऱ्यांची शेती, पीककर्ज, विमा योजना इत्यादींशी डिजिटल स्वरूपात जोडली जाणार आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. यापुढे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.जिल्ह्यातील सहा लाखांवर शेतकऱ्यांपैकी तीन लाख ३४ हजार ९९५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे. या शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे; पण जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडीच काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीतालुका - फार्मर आयडी असलेलेआटपाडी - २१६५८जत - ६५११९कडेगाव - २७५९६क.महांकाळ - २६८६९खानापूर - २०८६१मिरज - ४१८७७पलूस - २१२८७शिराळा - २७२८७तासगाव - ३६७४६वाळवा - ४५७४८

आवश्यक कागदपत्रे व नोंदणी प्रक्रियाशेतकऱ्यांनी फार्मर आयडी मिळवण्यासाठी आधारकार्ड, ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मोबाइल क्रमांक व गट क्रमांक सोबत ठेवावा. नोंदणीसाठी तलाठी, कृषी सहायक, सीएससी केंद्रचालक किंवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजे काय?आधारप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ व त्यांच्या जमिनींसाठी ‘फार्म आयडी’ तयार करण्यात येणार आहे. दोन्ही आयडी आधारशी लिंक करून पीककर्ज, विमा आदी योजनांची कार्यप्रणाली सुलभ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तत्काळ काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

..तर लाभ होणार बंद?पीएम किसान, नमो सन्मान या योजनांबरोबरच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी १५ एप्रिलपासून शासनाने फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. त्यामुळे, हा आयडी काढला नसल्यास शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनांसह पीएम किसान, नमो सन्मान योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी तो तातडीने काढून घ्यावा. अन्यथा विविध योजनांच्या लाभापासून मुकण्याची वेळ येऊ शकते. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी