शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील अडीच लाखांवर शेतकऱ्यांकडे नाही ‘फार्मर आयडी’; विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार

By अशोक डोंबाळे | Updated: April 23, 2025 18:59 IST

आता ‘फार्मर आयडी’ अनिवार्य 

अशोक डोंबाळे

सांगली : केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’, तसेच राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवण्यासाठी ‘फार्मर आयडी’ (शेतकरी ओळखपत्र) काढणे शेतकऱ्यांसाठी सक्तीचे आहे. जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ तीन लाख ३४ हजार ९९५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे. उर्वरित जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडीच काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.‘फार्मर आयडी’ ही ओळख प्रणाली ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पाअंतर्गत विकसित केली आहे. शेतकऱ्यांची शेती, पीककर्ज, विमा योजना इत्यादींशी डिजिटल स्वरूपात जोडली जाणार आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. यापुढे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.जिल्ह्यातील सहा लाखांवर शेतकऱ्यांपैकी तीन लाख ३४ हजार ९९५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे. या शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे; पण जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडीच काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीतालुका - फार्मर आयडी असलेलेआटपाडी - २१६५८जत - ६५११९कडेगाव - २७५९६क.महांकाळ - २६८६९खानापूर - २०८६१मिरज - ४१८७७पलूस - २१२८७शिराळा - २७२८७तासगाव - ३६७४६वाळवा - ४५७४८

आवश्यक कागदपत्रे व नोंदणी प्रक्रियाशेतकऱ्यांनी फार्मर आयडी मिळवण्यासाठी आधारकार्ड, ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मोबाइल क्रमांक व गट क्रमांक सोबत ठेवावा. नोंदणीसाठी तलाठी, कृषी सहायक, सीएससी केंद्रचालक किंवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजे काय?आधारप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ व त्यांच्या जमिनींसाठी ‘फार्म आयडी’ तयार करण्यात येणार आहे. दोन्ही आयडी आधारशी लिंक करून पीककर्ज, विमा आदी योजनांची कार्यप्रणाली सुलभ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तत्काळ काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

..तर लाभ होणार बंद?पीएम किसान, नमो सन्मान या योजनांबरोबरच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी १५ एप्रिलपासून शासनाने फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. त्यामुळे, हा आयडी काढला नसल्यास शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनांसह पीएम किसान, नमो सन्मान योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी तो तातडीने काढून घ्यावा. अन्यथा विविध योजनांच्या लाभापासून मुकण्याची वेळ येऊ शकते. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी