शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

शालाबाह्य मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात ! : शिक्षकांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:52 IST

अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेमी इंग्रजी व प्ले ग्रुपचे वर्ग सुरू झाल्याने पटसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

सचिन काकडे ।सातारा : गरिबीचे चटके सोसणाऱ्या कुटुंबातील अनेक मुलांना आज शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अशा मुलांना मग मिळेल ते काम करावं लागतं अथवा दुसऱ्यांपुढे हात पसरावे लागतात. अशा शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच पालिका शाळांचा भौतिक, गुणात्मक विकास साधण्यासाठी नववर्षात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार ज्ञानेश्वर कांबळे व अजित बल्लाळ या शिक्षकांनी केला आहे.

ज्ञानेश्वर कांबळे हे पालिकेच्या ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर शाळा क्रमांक २ तर अजित बल्लाळ हे ज्ञानदीप विद्यामंदिर शाळा क्रमांक १६ मध्ये कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांत ज्ञानेश्वर कांबळे यांनी फूटपाथ व रस्त्यावर, बसून व्यवसाय करणाºया परप्रांतीय तसेच झोपडपट्टीतील सुमारे ४५ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. तर अजित बल्लाळ यांनी भंगार वेचणाºया मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. नववर्षात या शिक्षकांनी अशा शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आहे.अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेमी इंग्रजी व प्ले ग्रुपचे वर्ग सुरू झाल्याने पटसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

पालिका शाळा हळूहळू कात टाकू लागल्या असून, विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासही होऊ लागला आहे. गुणवत्तेचा हा आलेख वाढविण्यासाठी शाळांमध्ये ई-लर्निंग क्लास सुरू करणे, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरावर परीक्षा घेणे असे उपक्रम या वर्षात राबविणार असल्याचे पालिकेचे शिक्षक ज्ञानेश्वर कांबळे व अजित बल्लाळ यांनी सांगितले. हे करीत असतानाच शिक्षणापासून भरकटत चाललेल्या तसेच शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार या शिक्षकांनी केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.

 

पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. सेमी इंग्रजी, प्ले ग्रुपचे वर्ग आता या शाळांमध्येही सुरू झाले आहेत. आतापर्यंत अनेक शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. हा उपक्रम अविरतपणे सुरूच राहणार आहे.- ज्ञानेश्वर कांबळे, शिक्षक, ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर, शाळा क्र. २

 

विद्यार्थ्यांना बौद्धिक व गुणात्मक विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ई-लर्निंग क्लासमुळे बऱ्याच अडचणी संपुष्टात आल्या आहेत. खासगी व इंग्रजी माध्यमिक शाळांच्या तुलनेत आता पालिका शाळाही कोणत्याच बाबतीत मागे नाहीत.- अजित बल्लाळ, शिक्षक, ज्ञानदीप विद्यामंदिर, शाळा क्र. १६

 

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक