शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शालाबाह्य मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात ! : शिक्षकांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:52 IST

अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेमी इंग्रजी व प्ले ग्रुपचे वर्ग सुरू झाल्याने पटसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

सचिन काकडे ।सातारा : गरिबीचे चटके सोसणाऱ्या कुटुंबातील अनेक मुलांना आज शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अशा मुलांना मग मिळेल ते काम करावं लागतं अथवा दुसऱ्यांपुढे हात पसरावे लागतात. अशा शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच पालिका शाळांचा भौतिक, गुणात्मक विकास साधण्यासाठी नववर्षात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार ज्ञानेश्वर कांबळे व अजित बल्लाळ या शिक्षकांनी केला आहे.

ज्ञानेश्वर कांबळे हे पालिकेच्या ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर शाळा क्रमांक २ तर अजित बल्लाळ हे ज्ञानदीप विद्यामंदिर शाळा क्रमांक १६ मध्ये कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांत ज्ञानेश्वर कांबळे यांनी फूटपाथ व रस्त्यावर, बसून व्यवसाय करणाºया परप्रांतीय तसेच झोपडपट्टीतील सुमारे ४५ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. तर अजित बल्लाळ यांनी भंगार वेचणाºया मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. नववर्षात या शिक्षकांनी अशा शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आहे.अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेमी इंग्रजी व प्ले ग्रुपचे वर्ग सुरू झाल्याने पटसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

पालिका शाळा हळूहळू कात टाकू लागल्या असून, विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासही होऊ लागला आहे. गुणवत्तेचा हा आलेख वाढविण्यासाठी शाळांमध्ये ई-लर्निंग क्लास सुरू करणे, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरावर परीक्षा घेणे असे उपक्रम या वर्षात राबविणार असल्याचे पालिकेचे शिक्षक ज्ञानेश्वर कांबळे व अजित बल्लाळ यांनी सांगितले. हे करीत असतानाच शिक्षणापासून भरकटत चाललेल्या तसेच शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार या शिक्षकांनी केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.

 

पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. सेमी इंग्रजी, प्ले ग्रुपचे वर्ग आता या शाळांमध्येही सुरू झाले आहेत. आतापर्यंत अनेक शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. हा उपक्रम अविरतपणे सुरूच राहणार आहे.- ज्ञानेश्वर कांबळे, शिक्षक, ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर, शाळा क्र. २

 

विद्यार्थ्यांना बौद्धिक व गुणात्मक विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ई-लर्निंग क्लासमुळे बऱ्याच अडचणी संपुष्टात आल्या आहेत. खासगी व इंग्रजी माध्यमिक शाळांच्या तुलनेत आता पालिका शाळाही कोणत्याच बाबतीत मागे नाहीत.- अजित बल्लाळ, शिक्षक, ज्ञानदीप विद्यामंदिर, शाळा क्र. १६

 

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक