शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

'घरातील वाद घरातच संपावा यासाठी आमचे प्रयत्न'; जयंत पाटील यांचं विधान

By शीतल पाटील | Updated: August 13, 2023 21:47 IST

राज्यात महाआघाडी खंबीर

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाचा न्यायनिवाडा निवडणुक आयोगाकडून होईल, तोपर्यंत हा वाद टळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. घरातील वाद घरात संपावा, असा आमचा प्रयत्न आहे. पण त्याला यश आलेले नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत शरद पवार- अजित पवार भेटीवर भाष्य केले.

महापालिकेच्या प्रतापसिंह उद्यानातील पक्षी संग्रहालयाच्या भूमीपूजनासाठी जयंत पाटील सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार, अजित पवार भेटीबाबत विचारता ते म्हणाले की, राजकारणात बेरीज करायची असते. भागाकार, वजाबाकी होऊ नये, याची दक्षता पक्षाच्या अध्यक्षांनी घ्यायची असते. पक्षातील फुट टाळण्याची आम्ही प्रयत्न करीत आहोत. पक्षातील अनेकजण प्रयत्नशील आहेत. पण त्याला यश आलेले नाही. राज्यात महाआघाडी खंबीर आहे. शरद पवार यांची भूमिकाही स्पष्ट आहे. त्यामुळे कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही.

भाजप प्रवेशाच्या वृत्ताबाबत ते म्हणाले की, माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहे. मध्यंतरी भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या. पण असा पक्ष बदलता येतो का? मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. लोक बोलत असतात. विश्लेषण करीत असतात. लोकशाहीत सर्वांनीच तुम्हाला चांगले बोलले पाहिजे, अशी अपेक्षा चुकीची असल्याचेही पाटील म्हणाले.

जाती-धर्मात संघर्षाचा प्रयत्नसंभाजी भिडे यांच्याबाबत पाटील म्हणाले की, महात्मा गांधी यांच्याबद्दल ७५ वर्षानंतर वक्तव्य करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. निवडणुका जवळ आल्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अनेकांना कामे वाटून दिली आहेत. जाती-धर्मात संघर्ष व्हावा, यासाठी अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असल्याची टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखान्याकडे लक्ष द्यावेठाणे रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखान्याकडे आधी बघावे. त्यात सुधारणा कराव्यात. ते नक्कीच ही बाब गांभीर्याने घेतील, असा टोलाही लगाविला .

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस