शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

...अन्यथा सनदशीर मार्गाने लढा उभारू

By admin | Updated: December 15, 2015 00:35 IST

पाली येथे पर्यायी मार्गाची मागणी : ओसाड जमिनीचे संपादन नाही, बागायती शेतीचे संपादन

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरी पाली उभी धोंड येथे माझी जमीन आहे. त्यामध्ये प्रस्तावित रस्ता रूंदीकरणामध्ये माझ्या एकाच बाजूने जास्त भूसंपादन होणार आहे. यात माझी शेतजमीन, विहीर, बागायती उद्ध्वस्त होणार आहे. मात्र, पलिकडील ओसाड कातळाची जमीन जराही संपादित न करता ती सुरक्षित ठेवण्यात आली आहे. हा कोणता न्याय? ही व्यथा मांडली आहे पाली येथील सुमंत पालकर यांनी! या रस्ता रुंदीकरणामध्ये त्या शेतकऱ्याची तीन एकर भूखंडाची पट्टी विहिरीसह जाणार आहे. त्यामुळे आमच्या रोजीरोटीचे पूर्ण साधनच संपणार आहे. त्यामुळे पाली येथे केवळ पर्यायी बाह्य वळण मार्गाचा अवलंब करावा, अन्यथा आम्हाला सनदशीर मार्गाने लढा उभारावा लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, पालीच्या वतीने देण्यात आला आहे.मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाबाबत हरकती नोंदवण्यात आल्या. त्यावेळी पाली बाजारपेठ, संघर्ष समिती, ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी यांनी पोटतिडकीने आपली बाजू वैयक्तिकपणे प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांच्यासमोर नोंदवली. यावेळी अगदी ८० वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक, अपंग स्त्रिया उपस्थित होत्या. पालीमध्ये सर्वाधिक नुकसान होऊन बाजारपेठ नामशेष होणार असल्याने जून महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पाचा आढावा घेताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यायी बाह्य मार्गाला मंजूरी दिली आहे. तरीही सध्या येथूनच भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असल्याने प्रकल्पग्रस्त संभ्रमावस्थेत सापडले आहेत. त्यामुळे पाली गावातून सर्वाधिक हरकती नोंदवल्या गेल्या.हरकत नोंदवल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी येथील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सुमंत पालकर यांनी सांगितले की, माझ्या जमिनीचे प्रस्तावित चौपदरीकरणासाठी भूसंपादन होणार असेल, तर त्यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये मला सुचित करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रकृ ती साथ देत नसतानाही आज मी हजर राहून सुनावणीमध्ये ठामपणे हरकत घेतली आहे. यामध्ये माझे राहाते घर, जमीन यांचे नुकसान होणार आहे. अशीच घटना पालीतील विनोद पालकर यांच्यासंदर्भात झाली आहे. त्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयाने भूसंपादनाच्या बाबतीत सुचित केलेली नाही. तसेच रवींद्र सुर्वे म्हणाले की, माझ्या जमिनीचे संपादन होणार असल्याने त्यातील विहीर, बागायती, जमीन अशी तीन एकरापर्यंतची जागा बाधित होणार आहे. याउलट रस्त्याच्या दोन्ही बाजूने समान संपादन येथेही झालेली नाही. यावेळी सुनावणीमध्ये हरकत नोंदवताना संघर्ष समिती अध्यक्ष प्रभाकर राऊत, जयप्रकाश पाखरे, विश्वास सावंत, शंकर राऊत, सिद्धराज सावंत, अनंत हिरवे, नामदेव लिंगायत, अजित साळवी, मनोहर काटकर, शरद राऊत, प्रसन्न पाखरे, सदानंद राऊत यांनी पर्यायी मार्गांसाठी हरकती नोंदविल्या. (प्रतिनिधी)आमचा रस्ता रूंदीकरणाला विरोध नाही. आम्ही पालीवासीयांनी यासंदर्भातील पूर्वीच्या प्रक्रियांना सहाय्य केले आहे. परंतु पाली बाजारपेठेची भौगोलिक स्थिती पाहता येथून होणारे रुंदीकरण लोकांना उद्ध्वस्त करणारे आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करून येथील शेतकरी, व्यावसायिकांना वाचवावे, ही आमची मागणी नोंदविली आहे.- प्रभाकर राऊत, अध्यक्ष, प्रकल्प संघर्ष समिती, पाली