शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एसटी वाचविण्यासाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार : व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:50 IST

एसटीचे (गरिबांची लाल परी) खासगीकरण करुन ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. तो हाणून पाडण्यासाठी एसटीबद्दल प्रेम असणाऱ्या काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘एसटी वाचवा’ हा व्हॉटस् -अ‍ॅप ग्रुप तयार केला असून, ग्रुपचे अडीचशे सदस्य आहेत.

ठळक मुद्देपहिली एसटी बचाव परिषद १४ आॅक्टोबरला इस्लामपुरात‘हिरकणी’ बस बंद करुन त्याच मार्गावर शिवशाही बस सुरु केली आहे.

अशोक डोंबाळे ।सांगली : एसटीचे (गरिबांची लाल परी) खासगीकरण करुन ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. तो हाणून पाडण्यासाठी एसटीबद्दल प्रेम असणाऱ्या काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘एसटी वाचवा’ हा व्हॉटस् -अ‍ॅप ग्रुप तयार केला असून, ग्रुपचे अडीचशे सदस्य आहेत. एसटी वाचविण्यासाठीचे धोरण ठरविण्यासाठी दि. १४ आॅक्टोबर रोजी इस्लामपूर येथे त्यांची पहिली ‘एसटी बचाव परिषद’ आयोजित केली आहे.

एसटीबद्दल सहानुभूती असणाºया काही जागरुक सामाजिक कार्यकर्त्यांनी एसटीसमोरील भविष्यातील समस्या ओळखून दोन महिन्यापूर्वी व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, हमाल माथाडी कामगारांचे नेते विकास मगदूम, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह एसटीचे अधिकारी, कर्मचाºयांचाही समावेश आहे.

महाराष्ट्राच्या विकासामध्ये एसटीचे फार मोठे योगदान आहे. ‘गाव तेथे एसटी’ आणि ‘रस्ता तेथे एसटी’ पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण झाले. अन्यथा विशेषत: मुलींचे तर शिक्षणच थांबले असते. केवळ एसटीमुळे ग्रामीण भागातील मुलींना शहरापर्यंत शिक्षणासाठी पोहोचता आले. सामान्य प्रवाशाला शहरापर्यंत जायचे असेल तर, एसटीशिवाय पर्याय नाही. एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक लढूनच मिळविलेली आहे.

एसटीला लाल डबा म्हणून उच्चशिक्षित कमी लेखत असले तरी, आजही गावाकडील सामान्य गरिबांच्यादृष्टीने ती लाल परीच आहे. ही लाल परीच सध्या आर्थिकदृष्ट्या संकटात सापडली आहे. दिवसेंदिवस तोट्याचा प्रवास चालू आहे. याच तोट्याचा मुद्दा पुढे करुन राज्यकर्त्यांचा एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक खासगीकरणाच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘एसटी वाचवा’ हा व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे.

कॉ. धनाजी गुरव म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली पाहिजे. एसटीच्या लाल रंगाच्या आणि एशियाड बसेसची खरेदीच थांबलेली आहे. शिवनेरी, शिवशाही बसेसच्या माध्यमातून खासगी कंत्राटदारांना जगविण्याचा काही राज्यकर्त्यांचा प्रयत्न चालू आहे. प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल, तर महामंडळानेच दर्जेदार आलिशान बसेस खरेदी कराव्यात. एसटीसमोरील खासगीकरणाचे संकट ओळखूनच एसटी बचाव परिषद दि. १४ आॅक्टोबर रोजी इस्लामपूर येथे घेण्यात येणार आहे.फायद्यातील ‘हिरकणी’ बस बंद का?सांगली ते पुणे, सांगली ते कोल्हापूर, सांगली ते सातारा या मार्गावर ‘हिरकणी’ या बसेस फायद्यात चालू होत्या. प्रवाशांचीही येथे गर्दी होती. अपघातही फारसे होत नव्हते. तरीही फायद्यातील ‘हिरकणी’ बंद करुन एसटी महामंडळाने नक्की काय साध्य केले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ‘हिरकणी’ बस बंद करुन त्याच मार्गावर शिवशाही बस सुरु केली आहे.

यापैकी बहुतांशी बसेस खासगी कंपनीच्या असून, ठेकेदारास पहिल्या ३०० ते ३४९ किलोमीटर अंतरासाठी प्रति किलोमीटर १९ रुपये ४१ पैसे द्यावे लागत आहेत. त्यानंतर ८०० ते त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी १३ रुपये ठेकेदाराला महामंडळ देत आहे. ठेकेदाराला देण्यात येणारे भाडे डिझेल सोडून आहे. डिझेलचा खर्च महामंडळावरच आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार या तीन दिवशीच सध्या शिवशाहीला गर्दी असून, उर्वरित दिवशी तोटाच असल्याचे खासगीत प्रशासनाचे अधिकारी सांगत आहेत. हा तोटा महामंडळाला सहन करावा लागत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळWhatsAppव्हॉट्सअॅपSocialसामाजिक