शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

संजयकाकांवर पक्षांतर्गत विरोधकांनी केली कुरघोडी

By admin | Updated: March 21, 2017 23:25 IST

संग्रामसिंहांच्या नावावरच एकमत : घोरपडेंसह मित्रपक्षांचा काका गटाला विरोध

अशोक डोंबाळे ल्ल सांगलीभाजपमधील अंतर्गत कलह जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी चव्हाट्यावर आला. खासदार संजयकाका पाटील गटाला अध्यक्षपद देण्यास भाजपच्याच नेत्यांचा कडाडून विरोध होता. अजितराव घोरपडेंसह इतरांनी संग्रामसिंह देशमुख असतील तरच पाठिंबा अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाण्याचा इशारा दिला होता. या धुमसत असलेल्या संघर्षाचा उद्रेक झाला. यातूनच डी. के. पाटील आणि शिवाजी डोंगरे यांना अध्यक्षपदापासून दूर रहावे लागले. काकांची अखेरची खेळीही मुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीने फोल ठरली. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते गाफील राहिल्यामुळे त्यांचा कोणाशीही यशस्वी समझोता झाला नाही.जिल्हा परिषदेत भाजपचे २५ सदस्य असून, त्यात जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गटाचे व आमदार विलासराव जगताप गटाचे प्रत्येकी सहा, खासदार संजयकाका पाटील गटाचे दोन, आमदार सुरेश खाडे गटाचे चार, शिवाजी डोंगरे गटाचे तीन, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख व गोपीचंद पडळकर गटाचे चार अशी सदस्यसंख्या आहे. पृथ्वीराज देशमुख आणि संजयकाका पाटील गटातील मतभेद जगजाहीर आहेत. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरून पृथ्वीराजबाबा आणि संजयकाका यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागली होती. दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाले असले तरी, मने जुळलीच नसल्याचे दिसत आहे. आटपाडी तालुक्यात गोपीचंद पडळकर आणि संजयकाका गटाचेही फारसे जमत नाही. दोघे नेते कार्यक्रमांतही फारसे एकत्र नसतात. देशमुख आणि पडळकर यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून खदखद आहे. या दोन गटाकडे दहा सदस्यांचे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच संजयकाका गटाला अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. या दोन नेत्यांना भाजपमधील अन्य काका विरोधकांनीही बळ दिले. शिवाय, भाजपकडे जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसल्यामुळे रयत विकास आघाडी चार, शिवसेना तीन आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे दोन अशा नऊ सदस्यांवर अवलंबून रहावे लागणार होते. भाजप सोडून अन्य मित्रपक्षांबरोबरही संजयकाका गटाचे फारसे जमत नसल्यामुळे त्यांनीही त्यांच्या समर्थकांना दूर ठेवण्याची अट घातल्याचे भाजपच्या एका नेत्याने मंगळवारी पत्रकारांना सांगितले. अजितराव घोरपडे यांनी तर संजयकाकांविरोधात उघड भूमिका घेतली आहे. भाजपला काठावरचे बहुमत असल्यामुळे घोरपडेंची दोन मते अत्यंत महत्त्वाची होती. घोरपडे यांनी, संग्रामसिंहांची उमेदवारी असेल तरच पाठिंबा मिळेल, अशी भूमिका घेतली होती. याला रयत आघाडीच्या काही नेत्यांनीही पाठबळ दिल्यामुळे संजयकाकांचे चुलते आणि डी. के. पाटील यांचे नाव मागे पडले. या कुरघोड्यांमुळे नाराज झालेल्या संजयकाकांचा मिरज पंचायत समिती निवडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत आणण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत या पॅटर्नची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत भाजपच्या अन्य नेत्यांनी पोहोचवली. यातूनच डोंगरेंची बंडखोरी थोपविण्यात भाजपला यश आले. डोंगरेंना वर्षानंतर अध्यक्ष करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपच्या सर्वच नेत्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष अडीच वर्षासाठी असतील, असे जाहीर केल्याने डोंगरे यांना फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय, असाही प्रश्न चर्चेत आला आहे.