शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

संजयकाकांवर पक्षांतर्गत विरोधकांनी केली कुरघोडी

By admin | Updated: March 21, 2017 23:25 IST

संग्रामसिंहांच्या नावावरच एकमत : घोरपडेंसह मित्रपक्षांचा काका गटाला विरोध

अशोक डोंबाळे ल्ल सांगलीभाजपमधील अंतर्गत कलह जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी चव्हाट्यावर आला. खासदार संजयकाका पाटील गटाला अध्यक्षपद देण्यास भाजपच्याच नेत्यांचा कडाडून विरोध होता. अजितराव घोरपडेंसह इतरांनी संग्रामसिंह देशमुख असतील तरच पाठिंबा अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाण्याचा इशारा दिला होता. या धुमसत असलेल्या संघर्षाचा उद्रेक झाला. यातूनच डी. के. पाटील आणि शिवाजी डोंगरे यांना अध्यक्षपदापासून दूर रहावे लागले. काकांची अखेरची खेळीही मुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीने फोल ठरली. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते गाफील राहिल्यामुळे त्यांचा कोणाशीही यशस्वी समझोता झाला नाही.जिल्हा परिषदेत भाजपचे २५ सदस्य असून, त्यात जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गटाचे व आमदार विलासराव जगताप गटाचे प्रत्येकी सहा, खासदार संजयकाका पाटील गटाचे दोन, आमदार सुरेश खाडे गटाचे चार, शिवाजी डोंगरे गटाचे तीन, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख व गोपीचंद पडळकर गटाचे चार अशी सदस्यसंख्या आहे. पृथ्वीराज देशमुख आणि संजयकाका पाटील गटातील मतभेद जगजाहीर आहेत. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरून पृथ्वीराजबाबा आणि संजयकाका यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागली होती. दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाले असले तरी, मने जुळलीच नसल्याचे दिसत आहे. आटपाडी तालुक्यात गोपीचंद पडळकर आणि संजयकाका गटाचेही फारसे जमत नाही. दोघे नेते कार्यक्रमांतही फारसे एकत्र नसतात. देशमुख आणि पडळकर यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून खदखद आहे. या दोन गटाकडे दहा सदस्यांचे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच संजयकाका गटाला अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. या दोन नेत्यांना भाजपमधील अन्य काका विरोधकांनीही बळ दिले. शिवाय, भाजपकडे जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसल्यामुळे रयत विकास आघाडी चार, शिवसेना तीन आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे दोन अशा नऊ सदस्यांवर अवलंबून रहावे लागणार होते. भाजप सोडून अन्य मित्रपक्षांबरोबरही संजयकाका गटाचे फारसे जमत नसल्यामुळे त्यांनीही त्यांच्या समर्थकांना दूर ठेवण्याची अट घातल्याचे भाजपच्या एका नेत्याने मंगळवारी पत्रकारांना सांगितले. अजितराव घोरपडे यांनी तर संजयकाकांविरोधात उघड भूमिका घेतली आहे. भाजपला काठावरचे बहुमत असल्यामुळे घोरपडेंची दोन मते अत्यंत महत्त्वाची होती. घोरपडे यांनी, संग्रामसिंहांची उमेदवारी असेल तरच पाठिंबा मिळेल, अशी भूमिका घेतली होती. याला रयत आघाडीच्या काही नेत्यांनीही पाठबळ दिल्यामुळे संजयकाकांचे चुलते आणि डी. के. पाटील यांचे नाव मागे पडले. या कुरघोड्यांमुळे नाराज झालेल्या संजयकाकांचा मिरज पंचायत समिती निवडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत आणण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत या पॅटर्नची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत भाजपच्या अन्य नेत्यांनी पोहोचवली. यातूनच डोंगरेंची बंडखोरी थोपविण्यात भाजपला यश आले. डोंगरेंना वर्षानंतर अध्यक्ष करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपच्या सर्वच नेत्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष अडीच वर्षासाठी असतील, असे जाहीर केल्याने डोंगरे यांना फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय, असाही प्रश्न चर्चेत आला आहे.