शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

संजयकाकांवर पक्षांतर्गत विरोधकांनी केली कुरघोडी

By admin | Updated: March 21, 2017 23:25 IST

संग्रामसिंहांच्या नावावरच एकमत : घोरपडेंसह मित्रपक्षांचा काका गटाला विरोध

अशोक डोंबाळे ल्ल सांगलीभाजपमधील अंतर्गत कलह जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी चव्हाट्यावर आला. खासदार संजयकाका पाटील गटाला अध्यक्षपद देण्यास भाजपच्याच नेत्यांचा कडाडून विरोध होता. अजितराव घोरपडेंसह इतरांनी संग्रामसिंह देशमुख असतील तरच पाठिंबा अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाण्याचा इशारा दिला होता. या धुमसत असलेल्या संघर्षाचा उद्रेक झाला. यातूनच डी. के. पाटील आणि शिवाजी डोंगरे यांना अध्यक्षपदापासून दूर रहावे लागले. काकांची अखेरची खेळीही मुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीने फोल ठरली. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते गाफील राहिल्यामुळे त्यांचा कोणाशीही यशस्वी समझोता झाला नाही.जिल्हा परिषदेत भाजपचे २५ सदस्य असून, त्यात जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गटाचे व आमदार विलासराव जगताप गटाचे प्रत्येकी सहा, खासदार संजयकाका पाटील गटाचे दोन, आमदार सुरेश खाडे गटाचे चार, शिवाजी डोंगरे गटाचे तीन, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख व गोपीचंद पडळकर गटाचे चार अशी सदस्यसंख्या आहे. पृथ्वीराज देशमुख आणि संजयकाका पाटील गटातील मतभेद जगजाहीर आहेत. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरून पृथ्वीराजबाबा आणि संजयकाका यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागली होती. दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाले असले तरी, मने जुळलीच नसल्याचे दिसत आहे. आटपाडी तालुक्यात गोपीचंद पडळकर आणि संजयकाका गटाचेही फारसे जमत नाही. दोघे नेते कार्यक्रमांतही फारसे एकत्र नसतात. देशमुख आणि पडळकर यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून खदखद आहे. या दोन गटाकडे दहा सदस्यांचे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच संजयकाका गटाला अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. या दोन नेत्यांना भाजपमधील अन्य काका विरोधकांनीही बळ दिले. शिवाय, भाजपकडे जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसल्यामुळे रयत विकास आघाडी चार, शिवसेना तीन आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे दोन अशा नऊ सदस्यांवर अवलंबून रहावे लागणार होते. भाजप सोडून अन्य मित्रपक्षांबरोबरही संजयकाका गटाचे फारसे जमत नसल्यामुळे त्यांनीही त्यांच्या समर्थकांना दूर ठेवण्याची अट घातल्याचे भाजपच्या एका नेत्याने मंगळवारी पत्रकारांना सांगितले. अजितराव घोरपडे यांनी तर संजयकाकांविरोधात उघड भूमिका घेतली आहे. भाजपला काठावरचे बहुमत असल्यामुळे घोरपडेंची दोन मते अत्यंत महत्त्वाची होती. घोरपडे यांनी, संग्रामसिंहांची उमेदवारी असेल तरच पाठिंबा मिळेल, अशी भूमिका घेतली होती. याला रयत आघाडीच्या काही नेत्यांनीही पाठबळ दिल्यामुळे संजयकाकांचे चुलते आणि डी. के. पाटील यांचे नाव मागे पडले. या कुरघोड्यांमुळे नाराज झालेल्या संजयकाकांचा मिरज पंचायत समिती निवडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत आणण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत या पॅटर्नची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत भाजपच्या अन्य नेत्यांनी पोहोचवली. यातूनच डोंगरेंची बंडखोरी थोपविण्यात भाजपला यश आले. डोंगरेंना वर्षानंतर अध्यक्ष करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपच्या सर्वच नेत्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष अडीच वर्षासाठी असतील, असे जाहीर केल्याने डोंगरे यांना फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय, असाही प्रश्न चर्चेत आला आहे.