शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

राज्यात यापुढे केवळ विकासाचे ‘नरेटिव्ह’ चालेल, पंकजा मुंडे यांनी केला दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:17 IST

महाआघाडीच्या ‘फेक नरेटिव्ह’मुळे राज्याचे नुकसान

मिरज : संविधान धोक्यात असल्याचा खोटा अपप्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीच्या ‘फेक नेरेटिव्ह’ मुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. मात्र अशा खोट्या प्रचारापासून आता जनता सावध झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फक्त विकासाचा नरेटिव्ह चालणार असल्याचा दावा भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केला आहे.बेडग (ता. मिरज) येथे महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्यासाठी आमदार पंकजा मुंडे यांची गुरुवारी प्रचार सभा झाली. यावेळी मुंडे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधानपदी असलेल्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाचे संरक्षण केले आहे. त्यामुळे संविधानाला धोका आहे, अशा भूलथापा विरोधकांनी आता बंद कराव्यात. महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसल्याने ते खोटे आरोप व अपप्रचार करत आहेत. अशा भूलथापांना आपण बळी पडू नका, मिरजेतील महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश खाडे यांच्यासह सर्वच महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.यावेळी भाजपा नेत्या नीता केळकर, सुमन खाडे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रकाश ढंग, जनसुराज युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी महापौर संगीता खोत, स्वाती शिंदे, बेडगचे सरपंच उमेश पाटील, शिवसेनेचे किरण राजपूत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांच्या बॅगेची तपासणी ..मिरजेचे महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारासाठी भाजप आमदार पंकजा मुंडे या बेडग येथील हॅलिपॅडवर उतरल्या. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या पथकाने त्यांच्या बॅगेची तपासणी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४miraj-acमिरजPankaja Mundeपंकजा मुंडेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024