शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अधिकाऱ्यांकडून केवळ समस्यांचा पाऊस

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

सदाभाऊंची आढावा बैठक : जिल्ह्याच्या विकासाची समन्वयातून नवी दिशा निर्माण करण्याचे आवाहन

सांगली : जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळण्यास उशीर लागला असला तरी मिळालेल्या संधीचा उपयोग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करणार आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न गंभीर असून यावर तातडीने मुंबईत बैठक घेणार आहे. अडचणींवर मात करत प्रशासन व शासन यांनी टीमवर्क दाखवत जिल्ह्याच्या विकासाची नवी दिशा निर्माण करूया, असे आवाहन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी केले. दरम्यान, मंत्री खोत यांनी बोलाविलेल्या पहिल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी मात्र, विकासकामांना बगल देत समस्यांचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री खोत यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. खोत म्हणाले की, पदभार हाती घेताच व्यापाऱ्यांच्या संपाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात येण्यास उशीर झाला. मात्र, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नावर अधिवेशन काळात बैठका घेऊन हे प्रश्न सोडविले जातील. जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असून या विषयावर जिल्ह्यातील आमदारांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जिल्हा नियोजन समितीतून मंजूर निधीत जास्तीत जास्त विकास कामांवर खर्च व्हायला पाहिजे. राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना एक महत्त्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन योजनांची कामे ‘जलयुक्त’मधून करता येतील का याबाबत प्रशासनाने अहवाल तयार करावा. टीमवर्कने काम करूया, विकास आपोआप साधला जाईल. बैठकीत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना, जिल्ह्यातील प्रमुख अडचणी व त्यावर कशी मात करता येऊ शकते हे सांगत, जिल्ह्यात झालेल्या चांगल्या कामाचा आढावाही मांडला. त्यानंतर जवळपास सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी स्वत:ची ओळख करून देत विभागातील अडचणी मंत्र्यांसमोर मांडत त्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली. यावेळी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना औद्योगिक दराने वीजबिले येत असून ती कृषिपंपांच्या दराने आल्यास योजनेच्या थकबाकीची अडचण निर्माण होणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. वाकुर्डे योजनेतून सदाभाऊंच्याच मरळनाथपूरला कधी पाणी मिळणार? असा सवाल आ. शिवाजीराव नाईक यांनी करत, आता तरी काम पूर्ण करण्याची मागणी केली. कृषीच्या आढाव्यावेळी हुमनी व गोगलगाईचा प्रार्दुभाव वाढत असून त्यावर उपाययोजना सुरू असून त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली. फळबाग विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत तर पीक विमा योजनेला १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत निर्णय होणार असल्याचे यावेळी खोत यांनी सांगितले. स्वतंत्र सांगली तालुका व जत तालुक्याचे विभाजन हे प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित असून यावर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, आयुक्त रवींद्र खेबूडकर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महापालिकेला हवेत १०५ कोटी रूपयेसर्व विभागांचा आढावा झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी महापालिका क्षेत्रातील प्रश्न मंत्र्यांसमोर मांडले. शासनाकडून २९१ कोटींचा निधी येणार असून यातील १०५ कोटींचा निधी राज्य शासनाकडून येणे बाकी आहे. यात ड्रेनेजचे ५० कोटी, वीज खांब, अंतर्गत वीजवाहिनीसाठीचा निधी, झोपडपट्टी पुनर्वसनचा १० कोटी, तर यासाठी अजून २२ कोटींची, तर गुंठेवारी विकास योजनेसाठी १५ कोटींचा निधी अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावर मंत्रालयात बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश खोत यांनी दिले. रिक्त जागांच्या संख्येने मंत्रीही अवाक्राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बोलाविलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत आढावा मांडताना सर्वच प्रमुखांनी रिक्त जागांचा प्रश्न मांडला. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील १० पैकी ६ गटविकास अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याचे सांगितले. इतरही तांत्रिक अधिकाऱ्यांच्या जागाही रिक्त असून पशुसंवर्धन विभागातही ४६ पदे रिक्त असल्याचे सांगितले. प्रत्येक अधिकारी आपली ओळख सांगताना विभागाकडे असणाऱ्या रिक्त जागा सांगत असल्याने, अखेर खोत यांनी या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले.