शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११० गावांत एकच गणपती!

By admin | Updated: September 18, 2015 23:10 IST

संख्या घटली : ‘तंटामुक्ती’चे बक्षीस पटकाविल्यानंतर उपक्रमाचा विसर

सचिन लाड -- सांगली  जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा राबवित असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यावर्षी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ७१९ पैकी केवळ ११० गावांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावांना या उपक्रमाचा विसर पडल्याने, संख्या घटल्याचे चित्र आहे. पोलिसांनी प्रयत्न करुनही गावे या उपक्रमात सहभागी होत नाहीत. गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आले, यातून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, पोलीस ठाण्यापासून अनेक गावे २५ ते ३० किलोमीटरवर आहेत, एखादा अनुचित प्रकार घडला तर तिथे पोलिसांना पोहोचण्यास किमान अर्धा तास तरी लागतो. यासाठी पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी पुढाकार घेऊन ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम सुरु केला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छताअभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्वीकार केला. मात्र बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे उपक्रमातून बाहेर पडली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गतवर्षी १४० गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला होता.दुष्काळग्रस्तांकडे पाठजिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. जमा झालेल्या वर्गणीतील निधी दुष्काळग्रस्तांना देण्याची विनंती करण्यात आली होती. पण याकडे अनेक मंडळांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळे पुढे आली असती, तर ‘एक गाव एक गणपती’ मोहीम राबविणाऱ्या गावांची संख्या वाढली असती. योजनेची आकडेवारी...वर्षगावांची संख्या २००५ ७६२००६ ८५२००७ १४५२००८ ३३४२००९ २४५२०१० ३०२२०११ १९४२०१२ २०५२०१३ १५१२०१४ १२४२०१५ ११०जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ व्हावा, यासाठी जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील ग्रामस्थांच्या बैठका घेऊन आवाहन केले होते. दुष्काळजन्य स्थिती असल्याने खर्च कमी करावा. गणेशोत्सवासाठी जमा झालेला पैसा दुष्काळग्रस्तांना देण्याऐवजी गावपातळीवर शेततळी कामासाठी वापरता आला असता.- शेखर गायकवाड, जिल्हाधिकारीगावपातळीवर राजकारण व गट-तट बाजूला ठेवले, तर ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. पण पोलीस व प्रशासनाकडून जनजागृती कमी पडत आहे. लोकवर्गणीचा वापर गावाच्या विधायक कामासाठी होऊ शकतो. बक्षीस मिळविण्यापुरते एकत्रित न येता सातत्य ठेवावे.- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली जिल्हा सुधार समिती