शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

महापुरामुळे दीड लाख लोकांचे स्थलांतर, ९५ गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

सांगलीत महिलांनी पुराच्या पाण्यातूनच कौटुंबिक साहित्य डोक्यावर घेऊन घरे सोडली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात ९५ गावांना प्रलयंकारी ...

सांगलीत महिलांनी पुराच्या पाण्यातूनच कौटुंबिक साहित्य डोक्यावर घेऊन घरे सोडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात ९५ गावांना प्रलयंकारी महापुराचा दणका बसला आहे. सुमारे दीड लाख लोक विस्थापित झाले आहेत.

२०१९ च्या अनुभवाने लोक वेळीच घराबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. महापुरामुळे १०४ गावे बाधित होतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाने गावे वेळीच रिकामी केली. लोकांनीही पुरापूर्वीच घरे सोडली. सुमारे २५ हजार कुटुंबांतील दीड लाख रहिवाशी पूरपट्ट्यातून सुरक्षितस्थळी गेले. गेल्या महापुरात हजारो जनावरे पुरात वाहून गेली होती, हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लहान व मोठी अशी ४० हजार जनावरे सोबत नेली.

पुरामध्ये ११ गावे पूर्णत: पाण्याखाली गेली. ८४ गावांना काही प्रमाणात फटका बसला.

चौकट

मीरा हौसिंग सोसायटीची भिंत फोडली

सांगलीत मीरा हौसिंग सोसायटीत पुरामुळे अडकून पडलेल्या रहिवाशांची नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या पुढाकाराने सुटका झाली. धनेश कातगडे, पांडुरंग व्हनमाने यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीतून बाहेर काढले. त्यासाठी सोसायटीची भिंत फोडण्यात आली.

चौकट

सांगली, मिरजेत ६० हजारजण विस्थापित

महापालिकेने १८ शाळांमध्ये पूरग्रस्तांच्या राहण्या-खाण्याची सोय केली आहे. सुमारे दीड हजार लोक आश्रयाला आले आहेत. सांगलीवाडी, कृष्णाघाट, शामरावनगर, गावभाग, कोल्हापूर रस्ता, काकानगर आदी भागांतील सुमारे ४० हजार नागरिकांनी घरे रिकामी केली आहेत. सांगलीवाडी व कृष्णाघाट येथे मोजके तरुण घरांत थांबून आहेत. महिला व इतरांनी नातेवाइकांकडे धाव घेतली आहे. काहीजणांनी हॉटेलमध्ये राहणे पसंत केलेे आहे.

चौकट

जनावरे दुष्काळी भागात

जिल्ह्याच्या पूरग्रस्त पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी जनावरे दुष्काळी भागात पाहुण्यांकडे नेऊन बांधली आहेत. गेल्या महापुरातील जनावरांची हानी लक्षात घेऊन जनावरे सुरक्षित भागात नेली. सांगली, मिरजेत मुख्य रस्त्याकडेलाही अनेक ठिकाणी बांधून ठेवली आहेत.

चौकट

वाळव्याला सर्वाधिक फटका

महापालिका क्षेत्रात सांगलीवाडीला पुराने घेरले. मिरज तालुक्यात दोन गावे पूर्णत:, तर २ गावे अंशत: बाधित झाली. सांगलीच्या पश्चिमेकडील १५ गावे अंशत: बाधित झाली. वाळवा तालुक्यात २९, आष्टा परिसरात ८, शिराळा तालुक्यात १४, पलूस तालुक्यात २३ गावे पुराने वेढली. वाळवा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला.