शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळे दीड लाख लोकांचे स्थलांतर, ९५ गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

सांगलीत महिलांनी पुराच्या पाण्यातूनच कौटुंबिक साहित्य डोक्यावर घेऊन घरे सोडली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात ९५ गावांना प्रलयंकारी ...

सांगलीत महिलांनी पुराच्या पाण्यातूनच कौटुंबिक साहित्य डोक्यावर घेऊन घरे सोडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात ९५ गावांना प्रलयंकारी महापुराचा दणका बसला आहे. सुमारे दीड लाख लोक विस्थापित झाले आहेत.

२०१९ च्या अनुभवाने लोक वेळीच घराबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. महापुरामुळे १०४ गावे बाधित होतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाने गावे वेळीच रिकामी केली. लोकांनीही पुरापूर्वीच घरे सोडली. सुमारे २५ हजार कुटुंबांतील दीड लाख रहिवाशी पूरपट्ट्यातून सुरक्षितस्थळी गेले. गेल्या महापुरात हजारो जनावरे पुरात वाहून गेली होती, हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लहान व मोठी अशी ४० हजार जनावरे सोबत नेली.

पुरामध्ये ११ गावे पूर्णत: पाण्याखाली गेली. ८४ गावांना काही प्रमाणात फटका बसला.

चौकट

मीरा हौसिंग सोसायटीची भिंत फोडली

सांगलीत मीरा हौसिंग सोसायटीत पुरामुळे अडकून पडलेल्या रहिवाशांची नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या पुढाकाराने सुटका झाली. धनेश कातगडे, पांडुरंग व्हनमाने यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीतून बाहेर काढले. त्यासाठी सोसायटीची भिंत फोडण्यात आली.

चौकट

सांगली, मिरजेत ६० हजारजण विस्थापित

महापालिकेने १८ शाळांमध्ये पूरग्रस्तांच्या राहण्या-खाण्याची सोय केली आहे. सुमारे दीड हजार लोक आश्रयाला आले आहेत. सांगलीवाडी, कृष्णाघाट, शामरावनगर, गावभाग, कोल्हापूर रस्ता, काकानगर आदी भागांतील सुमारे ४० हजार नागरिकांनी घरे रिकामी केली आहेत. सांगलीवाडी व कृष्णाघाट येथे मोजके तरुण घरांत थांबून आहेत. महिला व इतरांनी नातेवाइकांकडे धाव घेतली आहे. काहीजणांनी हॉटेलमध्ये राहणे पसंत केलेे आहे.

चौकट

जनावरे दुष्काळी भागात

जिल्ह्याच्या पूरग्रस्त पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी जनावरे दुष्काळी भागात पाहुण्यांकडे नेऊन बांधली आहेत. गेल्या महापुरातील जनावरांची हानी लक्षात घेऊन जनावरे सुरक्षित भागात नेली. सांगली, मिरजेत मुख्य रस्त्याकडेलाही अनेक ठिकाणी बांधून ठेवली आहेत.

चौकट

वाळव्याला सर्वाधिक फटका

महापालिका क्षेत्रात सांगलीवाडीला पुराने घेरले. मिरज तालुक्यात दोन गावे पूर्णत:, तर २ गावे अंशत: बाधित झाली. सांगलीच्या पश्चिमेकडील १५ गावे अंशत: बाधित झाली. वाळवा तालुक्यात २९, आष्टा परिसरात ८, शिराळा तालुक्यात १४, पलूस तालुक्यात २३ गावे पुराने वेढली. वाळवा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला.