शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

महापुरामुळे दीड लाख लोकांचे स्थलांतर, ९५ गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

सांगलीत महिलांनी पुराच्या पाण्यातूनच कौटुंबिक साहित्य डोक्यावर घेऊन घरे सोडली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात ९५ गावांना प्रलयंकारी ...

सांगलीत महिलांनी पुराच्या पाण्यातूनच कौटुंबिक साहित्य डोक्यावर घेऊन घरे सोडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात ९५ गावांना प्रलयंकारी महापुराचा दणका बसला आहे. सुमारे दीड लाख लोक विस्थापित झाले आहेत.

२०१९ च्या अनुभवाने लोक वेळीच घराबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. महापुरामुळे १०४ गावे बाधित होतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाने गावे वेळीच रिकामी केली. लोकांनीही पुरापूर्वीच घरे सोडली. सुमारे २५ हजार कुटुंबांतील दीड लाख रहिवाशी पूरपट्ट्यातून सुरक्षितस्थळी गेले. गेल्या महापुरात हजारो जनावरे पुरात वाहून गेली होती, हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लहान व मोठी अशी ४० हजार जनावरे सोबत नेली.

पुरामध्ये ११ गावे पूर्णत: पाण्याखाली गेली. ८४ गावांना काही प्रमाणात फटका बसला.

चौकट

मीरा हौसिंग सोसायटीची भिंत फोडली

सांगलीत मीरा हौसिंग सोसायटीत पुरामुळे अडकून पडलेल्या रहिवाशांची नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या पुढाकाराने सुटका झाली. धनेश कातगडे, पांडुरंग व्हनमाने यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीतून बाहेर काढले. त्यासाठी सोसायटीची भिंत फोडण्यात आली.

चौकट

सांगली, मिरजेत ६० हजारजण विस्थापित

महापालिकेने १८ शाळांमध्ये पूरग्रस्तांच्या राहण्या-खाण्याची सोय केली आहे. सुमारे दीड हजार लोक आश्रयाला आले आहेत. सांगलीवाडी, कृष्णाघाट, शामरावनगर, गावभाग, कोल्हापूर रस्ता, काकानगर आदी भागांतील सुमारे ४० हजार नागरिकांनी घरे रिकामी केली आहेत. सांगलीवाडी व कृष्णाघाट येथे मोजके तरुण घरांत थांबून आहेत. महिला व इतरांनी नातेवाइकांकडे धाव घेतली आहे. काहीजणांनी हॉटेलमध्ये राहणे पसंत केलेे आहे.

चौकट

जनावरे दुष्काळी भागात

जिल्ह्याच्या पूरग्रस्त पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी जनावरे दुष्काळी भागात पाहुण्यांकडे नेऊन बांधली आहेत. गेल्या महापुरातील जनावरांची हानी लक्षात घेऊन जनावरे सुरक्षित भागात नेली. सांगली, मिरजेत मुख्य रस्त्याकडेलाही अनेक ठिकाणी बांधून ठेवली आहेत.

चौकट

वाळव्याला सर्वाधिक फटका

महापालिका क्षेत्रात सांगलीवाडीला पुराने घेरले. मिरज तालुक्यात दोन गावे पूर्णत:, तर २ गावे अंशत: बाधित झाली. सांगलीच्या पश्चिमेकडील १५ गावे अंशत: बाधित झाली. वाळवा तालुक्यात २९, आष्टा परिसरात ८, शिराळा तालुक्यात १४, पलूस तालुक्यात २३ गावे पुराने वेढली. वाळवा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला.