शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

डफळापूरमध्ये अधिकाऱ्यांनी पाणीचोरी रोखावी - : विलासराव जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:59 IST

डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील तलावात सोडलेल्या पाण्याची लूट सुरू आहे, कालवा फोडला जात आहे. ‘लोकमत’मधून यासंदर्भात बातमी ...

ठळक मुद्देम्हैसाळ योजनेचा कालवा फोडल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची बैठक

डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील तलावात सोडलेल्या पाण्याची लूट सुरू आहे, कालवा फोडला जात आहे. ‘लोकमत’मधून यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी आ. विलासराव जगताप यांनी डफळापूर येथे बैठक घेऊन यासंदर्भात म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाणीचोरी होऊ नये यासाठी अधिकाराचा पूर्ण वापर करा, अशी सूचना त्यांनी दिली.

आ. जगताप म्हणाले, ग्रामस्थांनी व शेतकºयांनी पाणी जपून वापरले पाहिजे, अन्यथा भविष्यात सर्वांनाच भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. शेतकºयांनी सरसकट पिकांना ठिबकने पाणी द्यावे, कमी पाण्याची पिके घ्यावीत, म्हैसाळच्या अधिकाºयांनी पाणी वाटप करताना सर्व शेतकºयांना समान न्याय द्यावा.

यावेळी म्हैसाळ योजनेचे कनिष्ठ अभियंता एम. बी. कर्नाळे यांनी, आ. जगताप यांनी केलेल्या सूचनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.तब्बल एक महिना झाला, डफळापुरात नळाला पाणी आलेले नाही. त्यामुळे आता तलावात पाणी आल्याने ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने सोमवारपासून तलावातून मोटरद्वारे उपसा सुरु केला. जळालेली मोटर दुरुस्त करुन ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांनी तलावात मोटर जोडली व पाणी सुरु केले.

डफळापूर तलावात सोडण्यात आलेले पाणी हे केवळ पिण्यासाठी वापर केला, तर डफळापूर ग्रामस्थांना जूनअखेर पाणी पुरेल, असा दावा म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी केला आहे. परंतु पैसे भरले असल्याने शेतकºयांनाही पाण्याची आस लागून राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही पाणी उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दुहेरी अडचणीत आता प्रशासनाला मार्ग काढून पाण्याचे वाटप करून ते पुरवावे लागणार आहे.यावेळी परसराम चव्हाण, विलास माने, माधवराव चव्हाण, बाजीराव चव्हाण, राहुल पाटील, डॉ. साहेबराव गावडे, अरुण छत्रे, प्रमोद चव्हाण, दिलीप माळी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

‘लोकमत’चे कौतुककालवा फुटीबाबत बातमी प्रसिद्ध केल्याने आ. विलासराव जगताप यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. तसेच वृत्तपत्रात बातमी येऊनही तालुक्यातील योजनेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसते, याबाबत त्यांनी खंत व्यक्त करत, अधिकाऱ्यांना जागरूक राहून काम करण्याची सूचना केली.

 

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक