शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘म्हैसाळ’च्या पाण्यावरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर-: काँग्रेस, राष्टवादीचे सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:50 IST

मिरज तालुक्यात टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत अन्याय केल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समिती सभेत केला. जनावरांच्या चाºयाबाबत चुकीचा अहवाल सादर करून अधिकाºयांनी दिशाभूल केल्याचेही सदस्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे मिरज पंचायत समिती सभा

मिरज : मिरज तालुक्यात टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत अन्याय केल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समिती सभेत केला. जनावरांच्या चाºयाबाबत चुकीचा अहवाल सादर करून अधिकाºयांनी दिशाभूल केल्याचेही सदस्यांनी सांगितले. दुष्काळी प्रश्नावर काँग्रेस व राष्टÑवादीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिकारी निरुत्तर झाले.

पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती शालन भोई यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती विक्रम पाटील, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. कक्ष अधिकारी संजय शिंदे यांनी आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाई व म्हैसाळचे पाणी सोडण्याबाबत अन्याय झाल्याची तक्रार करीत काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अधिकाºयांची खरडपट्टी काढली. मिरजपूर्व भागात मार्चपासून दुष्काळाची तीव्रता वाढल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला. आजही मागणी असतानाही चारा छावणी सुरु होत नाही. तालुका कृषी व पशुसंवर्धन विभाग याला जबाबदार आहे. तालुक्यात चारा उपलब्ध असल्याचा अहवाल या विभागांनी जानेवारीत प्रशासनाला दिल्याने चारा छावणी सुरु झाली नाही. छावणीची वाट पाहून शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरे विकली. तालुक्यात एक हजार हेक्टर चारा उपलब्ध असल्याचा अहवाल देणाºया अधिकाºयांनी चारा दाखवावा, असा जाब विचारला. चुकीचा अहवाल देणाºया अधिकाºयावर कारवाईची मागणी अनिल आमटवणे व अशोक मोहिते यांनी केली.

आमटवणे म्हणाले, टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्यासाठी म्हैसाळ योजनेतून त्या गावातील तलाव व बंधारे भरुन घेण्याचे आदेश दिले असताना, पाणी सोडण्यात मनमानी केली. त्यामुळे टँकर सुरु करावे लागत आहेत. म्हैसाळच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर पाणी टंचाईचे निवारण झाले असते. तालुक्यात म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तलाव व बंधारे भरावेत व चारा छावण्या सुरू कराव्यात.

मिरजपूर्व भागातील रस्ता कामासाठी आघाडी शासनाने १८ कोटीचा निधी दिला. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी झाल्याने कामाची चौकशी केल्यानंतर ठेकेदारास बिले न देण्याचा पंचायत समितीच्या सभेत ठराव होऊनही टक्केवारीसाठी बिले देण्यात आली. सभेतील ठरावाला किंमत आहे का नाही, असा जाब आमटवणे, मोहिते, कृष्णदेव कांबळे, रंगराव जाधव, सतीश कोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना विचारला. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.दुष्काळाकडे आमदारांचे दुर्लक्षजिल्ह्यातील अन्य आमदारांनी तालुक्याच्या दुष्काळ निवारणाच्या आढावा बैठका घेऊन उपाययोजनेचे नियोजन केले. मात्र मिरज तालुक्यात भीषण दुष्काळ असताना आ. सुरेश खाडे यांनी एकही आढावा बैठक घेतली नाही. राजकीय द्वेषापोटी शेतकºयांचा वीजपुरवठा तोडण्यात त्यांना रस आहे. मात्र दुष्काळ निवारणाबाबत आमदारांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप अनिल आमटवणे यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई