शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘म्हैसाळ’च्या पाण्यावरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर-: काँग्रेस, राष्टवादीचे सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:50 IST

मिरज तालुक्यात टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत अन्याय केल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समिती सभेत केला. जनावरांच्या चाºयाबाबत चुकीचा अहवाल सादर करून अधिकाºयांनी दिशाभूल केल्याचेही सदस्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे मिरज पंचायत समिती सभा

मिरज : मिरज तालुक्यात टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत अन्याय केल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समिती सभेत केला. जनावरांच्या चाºयाबाबत चुकीचा अहवाल सादर करून अधिकाºयांनी दिशाभूल केल्याचेही सदस्यांनी सांगितले. दुष्काळी प्रश्नावर काँग्रेस व राष्टÑवादीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिकारी निरुत्तर झाले.

पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती शालन भोई यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती विक्रम पाटील, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. कक्ष अधिकारी संजय शिंदे यांनी आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाई व म्हैसाळचे पाणी सोडण्याबाबत अन्याय झाल्याची तक्रार करीत काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अधिकाºयांची खरडपट्टी काढली. मिरजपूर्व भागात मार्चपासून दुष्काळाची तीव्रता वाढल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला. आजही मागणी असतानाही चारा छावणी सुरु होत नाही. तालुका कृषी व पशुसंवर्धन विभाग याला जबाबदार आहे. तालुक्यात चारा उपलब्ध असल्याचा अहवाल या विभागांनी जानेवारीत प्रशासनाला दिल्याने चारा छावणी सुरु झाली नाही. छावणीची वाट पाहून शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरे विकली. तालुक्यात एक हजार हेक्टर चारा उपलब्ध असल्याचा अहवाल देणाºया अधिकाºयांनी चारा दाखवावा, असा जाब विचारला. चुकीचा अहवाल देणाºया अधिकाºयावर कारवाईची मागणी अनिल आमटवणे व अशोक मोहिते यांनी केली.

आमटवणे म्हणाले, टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्यासाठी म्हैसाळ योजनेतून त्या गावातील तलाव व बंधारे भरुन घेण्याचे आदेश दिले असताना, पाणी सोडण्यात मनमानी केली. त्यामुळे टँकर सुरु करावे लागत आहेत. म्हैसाळच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर पाणी टंचाईचे निवारण झाले असते. तालुक्यात म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तलाव व बंधारे भरावेत व चारा छावण्या सुरू कराव्यात.

मिरजपूर्व भागातील रस्ता कामासाठी आघाडी शासनाने १८ कोटीचा निधी दिला. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी झाल्याने कामाची चौकशी केल्यानंतर ठेकेदारास बिले न देण्याचा पंचायत समितीच्या सभेत ठराव होऊनही टक्केवारीसाठी बिले देण्यात आली. सभेतील ठरावाला किंमत आहे का नाही, असा जाब आमटवणे, मोहिते, कृष्णदेव कांबळे, रंगराव जाधव, सतीश कोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना विचारला. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.दुष्काळाकडे आमदारांचे दुर्लक्षजिल्ह्यातील अन्य आमदारांनी तालुक्याच्या दुष्काळ निवारणाच्या आढावा बैठका घेऊन उपाययोजनेचे नियोजन केले. मात्र मिरज तालुक्यात भीषण दुष्काळ असताना आ. सुरेश खाडे यांनी एकही आढावा बैठक घेतली नाही. राजकीय द्वेषापोटी शेतकºयांचा वीजपुरवठा तोडण्यात त्यांना रस आहे. मात्र दुष्काळ निवारणाबाबत आमदारांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप अनिल आमटवणे यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई