शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

प्रलंबित कामावरून अधिकारी धारेवर

By admin | Updated: June 28, 2017 23:07 IST

महापालिका स्थायी समिती सभा : अंदाजपत्रकात तरतूद नसल्याने दहा कोटींची कामे रखडली

लोकमत न्यूज नेटवर्क -सांगली : महापालिका प्रशासनातील विभागांत समन्वय नसल्याने ठेकेदारांची १० कोटीची थकीत बिले अडकल्याचे स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आले. संतप्त सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत, तरतूद करायला भाग पाडले. महापालिका चौक ते एसटी स्टँड रोड, शिवाजी पुतळ्यापर्यंतच्या १ कोटी ६७ लाखाच्या हॉटमिक्स रस्ते कामाला अखेर मंजुरी दिली. दरम्यान, भटकी कुत्री, डुकरे यावरुनही वादळी चर्चा झाली. शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण वाढले आहे, याबाबत आरोग्य विभागावर सदस्यांनी ताशेरे ओढले.शहरात पावसाळा सुरु झाला आहे. रस्त्यावरचे खड्डे अद्याप अनेक ठिकाणी तसेच आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी सदस्यांकडे येत आहेत. याबाबत सभापती संगीता हारगे यांनी, दोन दिवसात खड्डे मुजवा, ठेकेदार कोण आहे, काम कोणाकडे आहे, याच्याशी आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. मुजविलेल्या खड्ड्यांची तपासणी करा. पॅचवर्क तपासायला अधिकारी नाहीत. मुरुम कुठे टाकला याची माहिती नाही. प्रशासनाने ताळमेळ ठेवावा, असे आदेश दिले. शिवराज बोळाज यांनी, शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण वाढत चालल्याने आरोग्य धोक्यात येत असल्याचा प्रश्न मांडला. कचरा उठावाचे नियोजन नाही. शहरात अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या आढळून येत आहेत. त्यामुळे गटारी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. मारुती चौकात पावसाचे साचलेले पाणी निचरा करताना, गटारीत प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. यावर नियंत्रण आणण्याचे काम आरोग्य विभागाचे आहे. तात्काळ हे प्रमाण रोखा व कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली. अतहर नायकवडी यांनी, शिक्षण मंडळाकडील शिक्षकांना पगार दिला जातो, त्या प्रमाणात काम समाधानकारक नाही. गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. यातच खासगी शाळा, इंग्रजी शाळा वाढत आहेत. यात टिकण्यासाठी दर्जा सुधारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवराज बोळाज यांनी, बालवाड्या, अंगणवाड्या सक्षम केल्या तरच शाळा सुधारतील, असे स्पष्ट केले. निर्मला जगदाळे यांनी रोस्टरचा मुद्दा उपस्थित केला. प्रतिनियुक्तीचे अधिकारी महापालिकेत येतात, महापालिकेतील अधिकाऱ्यांवर जादा कामाचा भार टाकला जातो. प्रशासनाने रोस्टर पूर्ण करुन महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.नाल्यावर : अपार्टमेंटवानलेसवाडी येथील नैसर्गिक नाल्यावर एका बिल्डरने महापालिकेची फसवणूक करुन अपार्टमेंट उभारले आहे. याबद्दल सदस्या प्रियांका बंडगर यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमारच केला. हा नाला गेला, तर वानलेसवाडी पाण्यात जाईल. नगररचना विभागाने याआधीच्या बैठकीत अहवाल देतो असे सांगितले होते. प्रत्यक्षात आजपर्यंत अहवालच दिला नाही. अहवाल दिला नाही, तर वानलेसवाडीचे लोक स्थायीत घुसवू, असा इशाराही दिला.भटकी कुत्री पकडण्यासाठी नव्हे, सोडण्यासाठी ठेका...मनगू आबा सरगर यांनी, भटकी, कुत्री, डुकरे याविषयी प्रश्न उपस्थित केला. शहरात अनेक ठिकाणी भटकी कुत्री, डुकरे वाढली आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन काय करते? असा सवाल त्यांनी केला. मला तर वाटते, भटकी कुत्री पकडण्यासाठी नाही, तर सोडण्यासाठीच ठेका दिला जात असेल, असा टोला त्यांनी मारला.खात्यावर पैसेच शिल्लक नसल्याचे उघडकीसपैसे नसल्याच्या कारणाबद्दल सदस्यांचा संतापठेकेदारांना कामाची वर्क आॅर्डर दिल्यानंतर प्रशासन पैसे नसल्याचे सांगत आहे. याबाबत दिलीप पाटील, संतोष पाटील, निर्मला जगदाळे, शिवराज बोळाज, प्रियांका बंडगर, बसवेश्वर सातपुते यांनी टीकेची झोड उठविली. अखेर उपायुक्त सुनील पवार यांनी याबाबतची तरतूद केली जाईल, असे सांगितले.