शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: February 10, 2017 22:41 IST

स्वच्छ भारत अभियान : देवळा तालक्यात गुडमॉर्निंग पथकाची कारवाई

अशोक पाटील --इस्लामपूर --गेल्या ३0 वर्षात सत्ताधारी राष्ट्रवादीने निकृष्ट कामाचे शहरवासीयांना दर्शन घडविले आहे. विकास कामांतील काही कामे भकास झाली आहेत. म्हणूनच मतदारांनी सत्ताबदल केला आहे. स्वच्छतेसाठी ठेकेदारही बदलण्यात आला आहे. परंतु अजूनही स्वच्छतेची परिस्थिती जैसे थे आहे. स्वच्छतेवर पालिका प्रशासन वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करते. मग हा निधी जातो कुठे? हे शोधण्याचे आव्हान नूतन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना आहे.पालिकेत सत्ताधारी विकास आघाडी येऊन तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. शहराचा चेहरा—मोहरा बदलण्याचे आश्वासन विकास आघाडीने प्रचार सभांतून दिले होते. शिक्षण विभाग सोडला, तर सर्व विभाग राष्ट्रवादीकडे आहेत. परंतु जनतेतून निवडून गेलेले नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासमोर मात्र सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे मोठे आव्हान आहे. त्यातच विकास आघाडीचे पक्षप्रतोद आणि गटनेते विक्रमभाऊ पाटील यांनी स्वच्छतेवर आवाज उठवून विकास आघाडीलाच घरचा आहेर दिला आहे. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने भुयारी गटार योजनेची घोषणा केली होती. पण ती फक्त कागदावरच राहिली आहे. उपनगरांत बांधलेल्या गटारी जवळजवळ ढासळलेल्या आहेत. शहरातील बेकायदा बांधकामांमुळे काही ठिकाणी वाहणाऱ्या गटारीतील पाणी निघून जाण्यासाठी पुढे गटारीच नाहीत. त्यामुळे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होऊन दुर्गंधी निर्माण झाली आहे.स्वच्छता आणि कीटकनाशक फवारणीचा ठेका विभागून देण्यात आला आहे. यापूर्वीच्या सत्ताधारी राष्ट्रवादीने कीटकनाशक औषध खरेदीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केला होता. त्याचे पुढे काय झाले? की विरोधक मॅनेज झाले? हे काहीच समजले नाही. याचाही शोध घेण्याची वेळ नूतन नगराध्यक्षांवर येऊन ठेपली आहे.निशिकांत पाटील हे आमदार जयंत पाटील यांचे चेले आहेत. परंतु ते सध्या विरोधात काम करत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी राष्ट्रवादीने पालिकेत केलेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. यासह इतरही घोषणा मते पदरात पाडून घेण्यासाठी केल्या होत्या. परंतु यातील एकही आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. केवळ ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हाच काय तो उपक्रम त्यांच्याकडून राबवला जात आहे. या भेटीनंतरही किती कामे मार्गी लागली, हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे.एकंदरीत गेल्या ३0 वर्षात पालिकेतील अनागोंदी कारभाराचा नारळ पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या नावाने फोडला जात होता. आता विकास आघाडीसह विरोधी राष्ट्रवादीमध्ये निर्णय घेणाऱ्या नेत्यांची रेलचेल सुरु आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या ठेकेदाराकडून बाजूला काढलेला टक्का नेमका कोणा-कोणाकडे जातो, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.पालिकेत सत्ताबदल : अस्वच्छता कायमयाबाबत विकास आघाडीचे गटनेते व नगरसेवक विक्रम पाटील म्हणाले, शहराच्या स्वच्छतेसाठी वर्षाला ४ कोटी ७६ लाखांचा निधी खर्ची टाकला जातो. पण या खर्चाच्या मानाने शहरातील स्वच्छता होताना दिसत नाही. सध्या पालिकेत सत्ताबदल झाला असला तरी, पूर्वीप्रमाणेच अस्वच्छता दिसत आहे. ठिकठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या भरुन वाहत आहेत. गटारींची स्वच्छता वेळेवर होत नाही. डुकरांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील बेकायदा बांधकामामुळे वाहणाऱ्या गटारातील पाणी निघून जाण्यासाठी पुढे गटारीच नाहीत. त्यामुळे परिसरामध्ये घाणीचे व डासांचे साम्राज्य पसरले आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी.इस्लामपूर शहरातील अनेक ठिकाणचा कचरा उठाव झाला नसल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.