शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ'च्या हरकती फेटाळल्या, सांगलीत नोटिसांची शेतकऱ्यांनी केली होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:52 IST

शंखध्वनी आंदोलन : शासनाविरोधात निदर्शने

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठीच्या शेतकऱ्यांच्या हरकती प्रांताधिकारी यांनी फेटाळल्या आहेत. यासंबंधीच्या नोटिसा शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत. या नोटिसांची शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी केली. शासनाच्या नावाने शंखध्वनी आंदोलनही शेतकऱ्यांनी करून राज्य सरकारचा निषेध केला.शक्तिपीठ महामार्गबाधित शेती बचाव कृती समितीचे पदाधिकारी उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाने शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.

वाचा- शक्तिपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा, राजू शेट्टींचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनअखिल भारतीय किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा राज्य सरकारचा आहे. मात्र शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गाचे काम रद्दच झाले पाहिजे. प्रसंगी शेतकरी कुटुंबीयासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनास बसणार आहे. राज्य सरकारने जनतेला नको असलेला शक्तिपीठ महामार्ग त्वरित रद्द करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना मातीत घालत आहे. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सरकारचे षडयंत्र हाणून पाडू. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबला पाहिजे. अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.आंदोलनात शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी प्रभाकर तोडकर, अजित हळीगले, विष्णू पाटील, उमेश एडके, अधिक पाटील, रघुनाथ पाटील, रवींद्र साळुंखे, नितीन झांबरे, सुनील पवार, विक्रम हारूगडे, राजाराम माळी, रमेश एडके, अधिक शिंदे, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय पाटील, राजू एडके, प्रमोद एडके, पांडुरंग मिसळ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भांडवलदारांच्या सोयीसाठी शक्तिपीठ महामार्ग : सतीश साखळकरशक्तिपीठ महामार्ग करण्याची राज्यातील एकाही शेतकऱ्यांची मागणी नाही. सर्वसामान्य नागरिकांमधूनही मागणी नाही. तरीही शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. भांडवलदारांच्या हितासाठी हजार शेतकऱ्यांना भूमीहिन करत आहे. या शेतकऱ्यांचा उद्रेकच शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडतील, असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला.