शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

स्वाभिमानी शेतकरीची आता नव्याने बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:46 IST

दक्षिण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ताकदीवर ज्यांनी निवडणुकीत यश मिळवले, ते सरकारबरोबर गेले. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापासून दुरावले. परिणामी राजू शेट्टी यांचा लोकसभेला पराभव झाला. राज्यात त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. शेवटपर्यंत त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळेच आता त्यांनी ‘सात-बारा कोरा’ हे आंदोलन हाती घेऊन संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच उग्ररूप धारण केले.

ठळक मुद्देउर्जितावस्थेसाठी आंदोलन : रयत क्रांती संघटनेत शांतता

अशोक पाटील ।इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मिळालेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. राज्यातील सत्तेतही वाटा मिळाला नाही. त्यामुळे संघटनेत मरगळ येण्याची भीती होती. म्हणून त्यांनी संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी बुधवारी शेतकरी आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढले. बुधवारी उग्र आंदोलन करून त्यांनी अजूनही ‘स्वाभिमानी’ची ताकद राज्यभर जिवंत असल्याचे दाखवून दिले. तर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती शेतकरी संघटनेत मात्र अद्याप शांतता दिसत आहे.

दक्षिण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ताकदीवर ज्यांनी निवडणुकीत यश मिळवले, ते सरकारबरोबर गेले. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापासून दुरावले. परिणामी राजू शेट्टी यांचा लोकसभेला पराभव झाला. राज्यात त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. शेवटपर्यंत त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळेच आता त्यांनी ‘सात-बारा कोरा’ हे आंदोलन हाती घेऊन संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच उग्ररूप धारण केले.

दरम्यान माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचा झेंडा रोवला. मुलगा सागर याला भाजपमध्ये पाठवले. भविष्यातील राजकीय खुर्ची भक्कम व्हावी, याची काळजी त्यांनी घेतली. दुसरीकडे राजू शेट्टी यांनी साखरसम्राट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी हातमिळवणी केली. याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला.

विधानसभेत भाजपची सत्ता येईल, म्हणून सदाभाऊ खोत यांची गाडी बेफाम होती. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोटारीवर ‘स्वाभिमानी’ने कडकनाथ कोंबड्या भिरकावत ‘रयत क्रांती’ला टार्गेट केले. ‘रयत क्रांती’ची हवा विरळ झाली. भाजपविरोधी महाविकास आघाडी सत्तेत आली. आणि खोत यांच्याकडे फक्त विधानपरिषदेचे सदस्यत्व राहिले.

अवकाळी पाऊस व महापुरामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला. त्यावेळी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले. परंतु महाविकास आघाडीने ते आश्वासन पाळले नाही. हाच मुद्दा पुढे करून शेतकरी संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी राजू शेट्टी हे पुन्हा आंदोलनाचे हत्यार घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. यातून संघटना खरंच बाळसं धरेल का, हे येणारा काळच ठरवेल.

  • पुन्हा एकत्र : आल्यास...

लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी एकत्र आले आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हाच धागा पकडत जर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटना पुन्हा एकत्र आल्या, तर वावगे ठरू नये.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना