शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

स्वाभिमानी शेतकरीची आता नव्याने बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:46 IST

दक्षिण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ताकदीवर ज्यांनी निवडणुकीत यश मिळवले, ते सरकारबरोबर गेले. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापासून दुरावले. परिणामी राजू शेट्टी यांचा लोकसभेला पराभव झाला. राज्यात त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. शेवटपर्यंत त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळेच आता त्यांनी ‘सात-बारा कोरा’ हे आंदोलन हाती घेऊन संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच उग्ररूप धारण केले.

ठळक मुद्देउर्जितावस्थेसाठी आंदोलन : रयत क्रांती संघटनेत शांतता

अशोक पाटील ।इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मिळालेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. राज्यातील सत्तेतही वाटा मिळाला नाही. त्यामुळे संघटनेत मरगळ येण्याची भीती होती. म्हणून त्यांनी संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी बुधवारी शेतकरी आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढले. बुधवारी उग्र आंदोलन करून त्यांनी अजूनही ‘स्वाभिमानी’ची ताकद राज्यभर जिवंत असल्याचे दाखवून दिले. तर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती शेतकरी संघटनेत मात्र अद्याप शांतता दिसत आहे.

दक्षिण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ताकदीवर ज्यांनी निवडणुकीत यश मिळवले, ते सरकारबरोबर गेले. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापासून दुरावले. परिणामी राजू शेट्टी यांचा लोकसभेला पराभव झाला. राज्यात त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. शेवटपर्यंत त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळेच आता त्यांनी ‘सात-बारा कोरा’ हे आंदोलन हाती घेऊन संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच उग्ररूप धारण केले.

दरम्यान माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचा झेंडा रोवला. मुलगा सागर याला भाजपमध्ये पाठवले. भविष्यातील राजकीय खुर्ची भक्कम व्हावी, याची काळजी त्यांनी घेतली. दुसरीकडे राजू शेट्टी यांनी साखरसम्राट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी हातमिळवणी केली. याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला.

विधानसभेत भाजपची सत्ता येईल, म्हणून सदाभाऊ खोत यांची गाडी बेफाम होती. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोटारीवर ‘स्वाभिमानी’ने कडकनाथ कोंबड्या भिरकावत ‘रयत क्रांती’ला टार्गेट केले. ‘रयत क्रांती’ची हवा विरळ झाली. भाजपविरोधी महाविकास आघाडी सत्तेत आली. आणि खोत यांच्याकडे फक्त विधानपरिषदेचे सदस्यत्व राहिले.

अवकाळी पाऊस व महापुरामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला. त्यावेळी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले. परंतु महाविकास आघाडीने ते आश्वासन पाळले नाही. हाच मुद्दा पुढे करून शेतकरी संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी राजू शेट्टी हे पुन्हा आंदोलनाचे हत्यार घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. यातून संघटना खरंच बाळसं धरेल का, हे येणारा काळच ठरवेल.

  • पुन्हा एकत्र : आल्यास...

लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी एकत्र आले आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हाच धागा पकडत जर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटना पुन्हा एकत्र आल्या, तर वावगे ठरू नये.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना