शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

सांगली जिल्ह्यात पूरपट्ट्यातील तीन हजार घर मालकांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:12 IST

तातडीने उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना

सांगली : जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०४ गावांमध्ये सुमारे तीन हजार घरे धोकादायक आहेत. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिक धोकादायक असलेल्या घरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, तातडीने उपाययोजना करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. या उपाययोजना केल्या नाही तर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या तालुक्यातील १०४ गावांना पुराचा धोका आहे. या गावांमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात येते. त्यासाठी बाधित होणाऱ्या गावांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची पाहणी केली जाते. अधिक धोकादायक असणाऱ्या घर मालकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीस बजावून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. महापुराच्या काळात या गावांना पाण्याचा वेढा पडतो. गावात पाणी शिरते, अशावेळी धोकादायक घरे पडण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे जीवितहानीही होण्याची शक्यता असते. अशा घरांचे सर्वेक्षण करून या घराची दुरुस्ती करून उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना केल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशाराही नोटिसांद्वारे दिला आहे.पूरपट्ट्यातील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली जाते; मात्र धोकादायक आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या घरांची ऐनवेळी दुरुस्ती करणे शक्य नाही. तेव्हा, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा धोकादायक घरांच्या मालकांनी घरे दुरुस्त करून घ्यावीत, सुरक्षित करून घ्यावीत तसेच ऐन पावसाळ्यात पूर आल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीही तजवीज करावी, या उद्देशाने प्रशासनाकडून या धोकादायक घरांचे सर्वेक्षण करून नोटीस बजावण्याचा प्रयत्न आहे.

धोकादायक घरांची संख्या जैसे थेगतवर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक घरांची संख्या फारशी घटलेली नाही; मात्र गतवर्षी १०९ गावांतील तीन हजार ८८ धोकादायक घरे आढळून आली होती. यंदा १०४ गावांत दोन हजार ९३३ धोकादायक घरे सर्वेक्षणात सापडली आहेत. यातील सर्व घर मालकांना ग्रामपंचायतींनी नोटिसा बजावल्या आहेत; मात्र हे केवळ सर्वेक्षणात दिसून आले आहे. एवढ्यावरच प्रशासन समाधान मानणार का, हा प्रश्न आहे. नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत, याबद्दल स्पष्टता नाही.

तालुकानिहाय धोकादायक घरेतालुका / गावे / धोकादायक घरेवाळवा ३७ / १०३२शिराळा २० / १५३पलूस २७ / १३५७मिरज २० / ३९१