शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सांगली जिल्ह्यात पूरपट्ट्यातील तीन हजार घर मालकांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:12 IST

तातडीने उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना

सांगली : जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०४ गावांमध्ये सुमारे तीन हजार घरे धोकादायक आहेत. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिक धोकादायक असलेल्या घरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, तातडीने उपाययोजना करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. या उपाययोजना केल्या नाही तर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या तालुक्यातील १०४ गावांना पुराचा धोका आहे. या गावांमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात येते. त्यासाठी बाधित होणाऱ्या गावांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची पाहणी केली जाते. अधिक धोकादायक असणाऱ्या घर मालकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीस बजावून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. महापुराच्या काळात या गावांना पाण्याचा वेढा पडतो. गावात पाणी शिरते, अशावेळी धोकादायक घरे पडण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे जीवितहानीही होण्याची शक्यता असते. अशा घरांचे सर्वेक्षण करून या घराची दुरुस्ती करून उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना केल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशाराही नोटिसांद्वारे दिला आहे.पूरपट्ट्यातील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली जाते; मात्र धोकादायक आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या घरांची ऐनवेळी दुरुस्ती करणे शक्य नाही. तेव्हा, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा धोकादायक घरांच्या मालकांनी घरे दुरुस्त करून घ्यावीत, सुरक्षित करून घ्यावीत तसेच ऐन पावसाळ्यात पूर आल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीही तजवीज करावी, या उद्देशाने प्रशासनाकडून या धोकादायक घरांचे सर्वेक्षण करून नोटीस बजावण्याचा प्रयत्न आहे.

धोकादायक घरांची संख्या जैसे थेगतवर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक घरांची संख्या फारशी घटलेली नाही; मात्र गतवर्षी १०९ गावांतील तीन हजार ८८ धोकादायक घरे आढळून आली होती. यंदा १०४ गावांत दोन हजार ९३३ धोकादायक घरे सर्वेक्षणात सापडली आहेत. यातील सर्व घर मालकांना ग्रामपंचायतींनी नोटिसा बजावल्या आहेत; मात्र हे केवळ सर्वेक्षणात दिसून आले आहे. एवढ्यावरच प्रशासन समाधान मानणार का, हा प्रश्न आहे. नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत, याबद्दल स्पष्टता नाही.

तालुकानिहाय धोकादायक घरेतालुका / गावे / धोकादायक घरेवाळवा ३७ / १०३२शिराळा २० / १५३पलूस २७ / १३५७मिरज २० / ३९१