शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात पूरपट्ट्यातील तीन हजार घर मालकांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:12 IST

तातडीने उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना

सांगली : जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०४ गावांमध्ये सुमारे तीन हजार घरे धोकादायक आहेत. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिक धोकादायक असलेल्या घरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, तातडीने उपाययोजना करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. या उपाययोजना केल्या नाही तर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या तालुक्यातील १०४ गावांना पुराचा धोका आहे. या गावांमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात येते. त्यासाठी बाधित होणाऱ्या गावांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची पाहणी केली जाते. अधिक धोकादायक असणाऱ्या घर मालकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीस बजावून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. महापुराच्या काळात या गावांना पाण्याचा वेढा पडतो. गावात पाणी शिरते, अशावेळी धोकादायक घरे पडण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे जीवितहानीही होण्याची शक्यता असते. अशा घरांचे सर्वेक्षण करून या घराची दुरुस्ती करून उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना केल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशाराही नोटिसांद्वारे दिला आहे.पूरपट्ट्यातील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली जाते; मात्र धोकादायक आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या घरांची ऐनवेळी दुरुस्ती करणे शक्य नाही. तेव्हा, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा धोकादायक घरांच्या मालकांनी घरे दुरुस्त करून घ्यावीत, सुरक्षित करून घ्यावीत तसेच ऐन पावसाळ्यात पूर आल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीही तजवीज करावी, या उद्देशाने प्रशासनाकडून या धोकादायक घरांचे सर्वेक्षण करून नोटीस बजावण्याचा प्रयत्न आहे.

धोकादायक घरांची संख्या जैसे थेगतवर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक घरांची संख्या फारशी घटलेली नाही; मात्र गतवर्षी १०९ गावांतील तीन हजार ८८ धोकादायक घरे आढळून आली होती. यंदा १०४ गावांत दोन हजार ९३३ धोकादायक घरे सर्वेक्षणात सापडली आहेत. यातील सर्व घर मालकांना ग्रामपंचायतींनी नोटिसा बजावल्या आहेत; मात्र हे केवळ सर्वेक्षणात दिसून आले आहे. एवढ्यावरच प्रशासन समाधान मानणार का, हा प्रश्न आहे. नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत, याबद्दल स्पष्टता नाही.

तालुकानिहाय धोकादायक घरेतालुका / गावे / धोकादायक घरेवाळवा ३७ / १०३२शिराळा २० / १५३पलूस २७ / १३५७मिरज २० / ३९१