शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

शिराळ्यात चक्रीवादळाच्या नुकसानीचे केवळ पंचनामे नकाेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

शिराळा : चक्रीवादळामुळे शिराळा औद्योगिक वसाहत आणि भटवाडी, करमाळे येथे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत; परंतु फक्त पंचनामे करून ...

शिराळा : चक्रीवादळामुळे शिराळा औद्योगिक वसाहत आणि भटवाडी, करमाळे येथे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत; परंतु फक्त पंचनामे करून चालणार नाही, तर त्यांना भरीव नुकसानभरपाई मिळायला पाहिजे, अशी मागणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. ते शिराळा येथे चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले होते.

शेट्टी म्हणाले, शिराळा औद्योगिक वसाहत येथे झालेल्या चक्रीवादळात कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचे पत्रे उडून गेले आहेत. करमाळे, भटवाडी येथील अनेक कुटुंबांच्या राहत्या घराचे छत उडून गेले. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बांध फुटून शेतातील माती वाहून गेली. नुकसानग्रस्त उद्योजक आणि कुटुंबांना भरघोस नुकसानभरपाई मिळायला पाहिजे.

ते म्हणाले, तहसील कार्यालयामार्फत पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र केवळ पंचनामे करून उपयोग नाही. त्या पंचनाम्याची अंमलबजावणी करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. या संदर्भात मी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना भेटून पाठपुरावा करणार आहे. तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधणार आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे राम पाटील, एस. यू. संदे, मानसिंग पाटील, ॲड. रवी पाटील, रणजित चव्हाण, युवराज चव्हाण, आदी उपस्थित होते.