शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शासकीय कार्यालयात ना येण्याची वेळ ना जाण्याची; अनेकजण ‘दौऱ्यावर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 12:17 IST

शरद जाधव     सांगली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होऊनही कामकाजाच्या वेळी अनेक जण दांडी मारत ...

शरद जाधव

 

 

सांगली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होऊनही कामकाजाच्या वेळी अनेक जण दांडी मारत आहेत. विजयनगर येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीत अनेक कार्यालये असून त्यात दुपारनंतर अनेक टेबलवरील कर्मचारी गायब असतात. याबाबत विचारणा केली असता, ते कर्मचारी ‘दौऱ्यावर’ गेल्याचे सांगण्यात आले.

शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवस कामकाजाचे करण्यात आले असूनही अनेकजण कामाऐवजी बाहेरच असतात. याबाबत माहिती घेतली असता, सकाळी येताना अनेकजण उशिरा येतात तर दुपारी बाहेर गेलेले अनेक कर्मचारी दुसऱ्या दिवशीच कार्यालयात येत असल्याचे समजले. अनेक खातेप्रमुखही मुख्यालयात न राहता ते कोल्हापूर, सातारा येथून येत आहेत. यामुळे त्यांचे कार्यालयावर नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात काटेकोर पालन

जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास सर्व कर्मचारी येतात. बहुतांश जण येतानाच डबा घेऊन येतात. तर जे कर्मचारी बाहेर जातात ते आपल्या वरिष्ठांची परवानगी घेऊनच जात असल्याची माहिती मिळाली. दुपारनंतरही सर्व विभागात कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित होते.

अधिकाऱ्यांचा दौरा

- मध्यवर्ती शासकीय इमारतीत वीसहून अधिक कार्यालये आहेत. यातील अनेक कार्यालयात कर्मचारी कमी आहेत. ज्या कार्यालयात अधिकारी नव्हते याबाबत चौकशी केली. त्यावेळी ते दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले.

- काही कर्मचारीही दुपारनंतर ‘क्षेत्र भेटी’साठी गेले होते. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी याबाबतची कल्पनाही आपल्या सहकाऱ्यांना दिली होती.

कार्यालय सुनेसुने

मध्यवर्ती शासकीय इमारतीतील काही कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यानेही कार्यालय रिकामे पडले होते. या कार्यालयात एकच कर्मचारी सर्व नियोजन करत होता.

हालचाल रजिस्टर नावालाच

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या वेळेत कार्यालय सोडावयाचे असेल तर त्याची ‘हालचाल’ रजिस्टरमध्ये नोंद आवश्यक असते. मात्र, मध्यवर्ती शासकीय इमारतीमधील हे रजिस्टरचा वापर दिसून आला नाही.

या ठिकाणी नागरिकांचीही गर्दी दिसून आली नाही. बहुतांश कार्यालयातील कर्मचारी स्वत:च कोणाला दुपारनंतर येऊ नका, असे सांगत असल्यानेही ना कर्मचारी ना कोणी नागरिक अशी स्थिती दिसून आली. जे कर्मचारी होते ते आपल्या कामात होते.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार