शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

वाळवा तालुक्यातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येत्या दोन वर्षांत वाळवा तालुक्यातील कोणीही बेघर राहणार नाही अशा पद्धतीने घरकुल उभारणीचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येत्या दोन वर्षांत वाळवा तालुक्यातील कोणीही बेघर राहणार नाही अशा पद्धतीने घरकुल उभारणीचे काम करू, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शेतकरी सल्लागार मंडळाने तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना एकत्र करून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वाळवा पंचायत समितीच्या वतीने वेळेत घरकुल बांधकाम पूर्ण केलेले लाभार्थी, यामध्ये योगदान दिलेल्या ग्रामपंचायती, तसेच जिल्हा परिषद मतदार गटांतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, वाळवा पंचायत समिती ही राज्यात अग्रेसर असून, तालुक्यातील सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम समितीने केले आहे. तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचा आढावा घेऊन ती पूर्ण करण्यास पदाधिकाऱ्यांनी वेळ द्यावा. ‘ड’ यादीस मंजुरी देण्याचा माझा प्रयत्न आहे. सल्लागार समितीच्या सदस्यांनी जबाबदारी चोख पार पाडावी.

तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांनी त्यांच्या विभागाची माहिती दिली. विनोद बाबर (साखराळे) यांच्या अध्यक्षतेखालील शेतकरी सल्लागार समितीच्या २२ सदस्यांना निवडपत्रे देण्यात आली.

शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, छाया पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, जि. प. सदस्या राजश्री एटम उपस्थित होते. पं. स. सदस्या रूपाली सपाटे यांनी आभार मानले.