शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

वाळवा तालुक्यातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येत्या दोन वर्षांत वाळवा तालुक्यातील कोणीही बेघर राहणार नाही अशा पद्धतीने घरकुल उभारणीचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येत्या दोन वर्षांत वाळवा तालुक्यातील कोणीही बेघर राहणार नाही अशा पद्धतीने घरकुल उभारणीचे काम करू, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शेतकरी सल्लागार मंडळाने तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना एकत्र करून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वाळवा पंचायत समितीच्या वतीने वेळेत घरकुल बांधकाम पूर्ण केलेले लाभार्थी, यामध्ये योगदान दिलेल्या ग्रामपंचायती, तसेच जिल्हा परिषद मतदार गटांतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, वाळवा पंचायत समिती ही राज्यात अग्रेसर असून, तालुक्यातील सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम समितीने केले आहे. तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचा आढावा घेऊन ती पूर्ण करण्यास पदाधिकाऱ्यांनी वेळ द्यावा. ‘ड’ यादीस मंजुरी देण्याचा माझा प्रयत्न आहे. सल्लागार समितीच्या सदस्यांनी जबाबदारी चोख पार पाडावी.

तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांनी त्यांच्या विभागाची माहिती दिली. विनोद बाबर (साखराळे) यांच्या अध्यक्षतेखालील शेतकरी सल्लागार समितीच्या २२ सदस्यांना निवडपत्रे देण्यात आली.

शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, छाया पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, जि. प. सदस्या राजश्री एटम उपस्थित होते. पं. स. सदस्या रूपाली सपाटे यांनी आभार मानले.