शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

पवारांची भूमिकाच भाजपला रोखणार निखिल वागळे : भाजपमुळे चार वर्षांत देशाची अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:48 IST

सांगली : भाजपचे जनमत घसरत चालले असून, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त २२५ जागाच मिळतील. काँग्रेसच्या जागांत सुधारणा होऊन

सांगली : भाजपचे जनमत घसरत चालले असून, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त २२५ जागाच मिळतील. काँग्रेसच्या जागांत सुधारणा होऊन १२५ पर्यंत त्यांचा आकडा जाईल, तर बिगर भाजप आणि काँग्रेस वगळून तिसºया आघाडीला सर्वाधिक १९३ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका शरद पवार बजावतील, असे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगलीत केले.

येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहात भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर वागळे बोलत होते.वागळे म्हणाले, देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झाले आहेत. राजकारणातील हवा बदलत असल्याची जाणीव झाल्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तिसºया आघाडीची तयारी सुरु केली आहे. भाजपला रोखण्यासाठी पवार यांची भूमिकाच निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव कमी होत असून, दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. देशभरात बेरोजगारी वाढण्याची भीती आहे.

वागळे पुढे म्हणाले की, मागील सरकारने केलेल्या चुका सुधारण्यासाठी भाजपला संधी दिली, पण त्यांच्याकडूनही लोकांचा अपेक्षाभंग झाला. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाची किमया झाली असल्याचा बोलबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरु आहे. तलाव खोदले, पण पाणी थांबत नाही.

८० वर्षांच्या धर्मा पाटील यांना मंत्रालयात येऊन जमिनीच्या मोबदल्यासाठी विषारी औषध प्राशन करावे लागत असल्याची बाब लज्जास्पद आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मार्क्सवादी पक्षाच्या राज्य अधिवेशन स्वागत समितीचे स्वागताध्यक्ष प्राचार्य भाई व्ही. वाय. पाटील, सचिव कॉ. उमेश देशमुख, डॉ. अमोल पवार, डॉ. नामदेव कस्तुरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संजय देसाई, डॉ. संजय पाटील, आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती छायाताई खरमाटे, भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा संगीता शिंदे आदी उपस्थित होते.भाजपचे कॉँग्रेसीकरणमागील सरकारने केलेल्या चुका सुधारण्यासाठी भाजपला संधी दिली. त्यांच्याकडूनही लोकांचा अपेक्षाभंग झाला. भाजपचेही कॉँग्रेसीकरण झाले आहे. राज्याच्या विविध भागात गेल्यानंतर पूर्वी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेले नेतेच भाजपमध्ये आलेले दिसून येत आहेत. त्यामुळे चार वर्षानंतर भाजप सरकार अच्छे दिन न आणणारे सरकार असल्याचे लोकांच्या लक्षात आल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केली.