शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

पवारांची भूमिकाच भाजपला रोखणार निखिल वागळे : भाजपमुळे चार वर्षांत देशाची अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:48 IST

सांगली : भाजपचे जनमत घसरत चालले असून, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त २२५ जागाच मिळतील. काँग्रेसच्या जागांत सुधारणा होऊन

सांगली : भाजपचे जनमत घसरत चालले असून, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त २२५ जागाच मिळतील. काँग्रेसच्या जागांत सुधारणा होऊन १२५ पर्यंत त्यांचा आकडा जाईल, तर बिगर भाजप आणि काँग्रेस वगळून तिसºया आघाडीला सर्वाधिक १९३ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका शरद पवार बजावतील, असे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगलीत केले.

येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहात भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर वागळे बोलत होते.वागळे म्हणाले, देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झाले आहेत. राजकारणातील हवा बदलत असल्याची जाणीव झाल्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तिसºया आघाडीची तयारी सुरु केली आहे. भाजपला रोखण्यासाठी पवार यांची भूमिकाच निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव कमी होत असून, दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. देशभरात बेरोजगारी वाढण्याची भीती आहे.

वागळे पुढे म्हणाले की, मागील सरकारने केलेल्या चुका सुधारण्यासाठी भाजपला संधी दिली, पण त्यांच्याकडूनही लोकांचा अपेक्षाभंग झाला. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाची किमया झाली असल्याचा बोलबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरु आहे. तलाव खोदले, पण पाणी थांबत नाही.

८० वर्षांच्या धर्मा पाटील यांना मंत्रालयात येऊन जमिनीच्या मोबदल्यासाठी विषारी औषध प्राशन करावे लागत असल्याची बाब लज्जास्पद आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मार्क्सवादी पक्षाच्या राज्य अधिवेशन स्वागत समितीचे स्वागताध्यक्ष प्राचार्य भाई व्ही. वाय. पाटील, सचिव कॉ. उमेश देशमुख, डॉ. अमोल पवार, डॉ. नामदेव कस्तुरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संजय देसाई, डॉ. संजय पाटील, आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती छायाताई खरमाटे, भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा संगीता शिंदे आदी उपस्थित होते.भाजपचे कॉँग्रेसीकरणमागील सरकारने केलेल्या चुका सुधारण्यासाठी भाजपला संधी दिली. त्यांच्याकडूनही लोकांचा अपेक्षाभंग झाला. भाजपचेही कॉँग्रेसीकरण झाले आहे. राज्याच्या विविध भागात गेल्यानंतर पूर्वी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेले नेतेच भाजपमध्ये आलेले दिसून येत आहेत. त्यामुळे चार वर्षानंतर भाजप सरकार अच्छे दिन न आणणारे सरकार असल्याचे लोकांच्या लक्षात आल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केली.