शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

रात्रीच्या एक्स्पे्रसमधील चोऱ्यांचे सत्र

By admin | Updated: October 16, 2014 22:53 IST

रेल्वे पोलिसांकडून उपाययोजना : दिवाळीसाठी पोलीस यंत्रणा सतर्क

मिरज : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या रेल्वेगाड्यांत प्रवाशांच्या किमती साहित्याच्या चोऱ्या रोखण्यासाठी मिरज रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाने रात्रीच्या रेल्वेगाड्यांत बंदोबस्त सुरू केला आहे. गतवर्षी दिवाळीदरम्यान चोरट्यांनी प्रवाशांचा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने चोऱ्यांचे सत्र रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मिरजेकडे येणाऱ्या जोधपूर-बेंगलोर, अजमेर- बेंगलोर, गांधीधाम-बेंगलोर या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुबाडण्याच्या घटना वारंवार घडतात. गतवर्षी दिवाळीपूर्वी चोरट्यांनी रात्रीच्या रेल्वेगाड्यांमध्ये महिनाभर धुमाकूळ घालून झोपेत असलेल्या प्रवाशांची लूटमार केली होती. पाहटेच्यावेळी लोणावळा ते पुणेदरम्यान प्रवासी झोपेत असताना प्रवाशांच्या बॅगा चोरीला जातात. सकाळी पुणे स्थानक सोडल्यानंतर बॅगा चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मिरज रेल्वे पोलिसांत तक्रारी दाखल होतात. काही प्रवासी बेळगाव रेल्वे पोलिसांत चोरीची फिर्याद देतात. गतवर्षी दिवाळीपूर्वी आठवड्यात अजमेर, जोधपूर गांधीधाम या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची रोख रक्कम, दागिने, मोबाईल व किमती वस्तूंच्या चोरीचे अनेक प्रकार घडले होते. कल्याण वसई परिसरातील टोळ्यांनी रात्रीच्या रेल्वेगाड्यांत धुमाकूळ घालून प्रवाशांना व रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांना हैराण केले होते. रेल्वेच्या आरक्षित बोगीसह वातानूकूलित व सर्वसाधारण बोगीतही चोऱ्या झाल्याने एक्स्प्रेसमधून रात्रीच्या प्रवासाचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला होता. लोणावळा ते पुणेदरम्यान रेल्वे प्रवाशांचे साहित्य चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन काही टोळ्यांना रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले आहे. (वार्ताहर)पायबंद घालण्याचा दावादिवाळी प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा चोरीच्या घटना होऊ नयेत, यासाठी रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाने उपापयोजना सुरू केल्या आहेत. अजमेर, जोधपूर, गांधीधाम या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने गस्त सुरू केली आहे. रात्रीच्या रेल्वेगाड्यात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असल्याने दररोज होणाऱ्या चोऱ्यांना पायबंद घालण्यात आल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा आहे.