शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर येथे युवक राष्ट्रवादीचा हल्लाबोल : वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:12 IST

सध्या भाजप सरकारच्या काळात वाढीव वीजबिले व अतिरिक्त भारनियमनाच्या झटक्यांनी राज्यातील सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने तातडीने वीजबिले कमी करून सर्वांना योग्य दाबाने, नियमित वीज द्यावी, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’

ठळक मुद्देवेळेवर वीज द्या, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’ आंदोलनाचा संग्राम पाटील यांचा इशारायावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

इस्लामपूर : सध्या भाजप सरकारच्या काळात वाढीव वीजबिले व अतिरिक्त भारनियमनाच्या झटक्यांनी राज्यातील सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने तातडीने वीजबिले कमी करून सर्वांना योग्य दाबाने, नियमित वीज द्यावी, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’ आंदोलनाचा झटका देऊ, असा इशारा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष संग्राम पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यातील युवकांनी सोमवारी इस्लामपूर येथील वीज महावितरणच्या विभागीय कार्यालयावर जोरदार हल्लाबोल करून, वाढीव वीज बिलांची होळी केली. यावेळी ठिय्या आंदोलन करून उपकार्यकारी अभियंता राजेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, ‘राज्य सरकारचा धिक्कार असो, वीज दरवाढ व अतिरिक्त भारनियमन कमी व्हायलाच हवे’ आदी घोषणांनी इस्लामपूर बसस्थानक परिसर दणाणून सोडला होता.

विजय पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना कमी दराने, नियमित वीज देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने कित्येक वेळा शेतकºयांच्या शेतीपंपाची वीज दरवाढ व अलीकडे अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. सरकारच्या भरमसाट दरवाढीने सामान्य माणूस व शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. याला भाजप सरकारची धोरणेच जबाबदार आहेत.

या आंदोलनात विनायक यादव, मनोज पाटील, अजित बेनाडे, असिफ पटेल, हणमंत कदम, स्वप्नील पाटील, सतीश पाटील, सुहास खोत, भागवत पाटील, नंदकुमार कोळेकर, वीरधवल होरे, सुशील पाटील, प्रशांत थोरात, अक्षय मोरे, सुजित साळुंखे, सचिन साळुंखे, रवी सूर्यवंशी, डॉ. प्रकाश पाटील, बाजीराव बेनाडे, राजेंद्र पाटील सहभागी झाले होते.खरीप : पिके वाळलीपाणी असूनही, वीज नसल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाळू लागली आहेत. तरीही शेतकºयांकडे भाजप सरकारचे लक्ष दिसत नाही. वीज अखंडित मिळत नसताना, पुन्हा ग्राहकांवर वीज बिलाचा बोजा टाकण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस