शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

इस्लामपूर येथे युवक राष्ट्रवादीचा हल्लाबोल : वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:12 IST

सध्या भाजप सरकारच्या काळात वाढीव वीजबिले व अतिरिक्त भारनियमनाच्या झटक्यांनी राज्यातील सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने तातडीने वीजबिले कमी करून सर्वांना योग्य दाबाने, नियमित वीज द्यावी, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’

ठळक मुद्देवेळेवर वीज द्या, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’ आंदोलनाचा संग्राम पाटील यांचा इशारायावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

इस्लामपूर : सध्या भाजप सरकारच्या काळात वाढीव वीजबिले व अतिरिक्त भारनियमनाच्या झटक्यांनी राज्यातील सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने तातडीने वीजबिले कमी करून सर्वांना योग्य दाबाने, नियमित वीज द्यावी, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’ आंदोलनाचा झटका देऊ, असा इशारा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष संग्राम पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यातील युवकांनी सोमवारी इस्लामपूर येथील वीज महावितरणच्या विभागीय कार्यालयावर जोरदार हल्लाबोल करून, वाढीव वीज बिलांची होळी केली. यावेळी ठिय्या आंदोलन करून उपकार्यकारी अभियंता राजेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, ‘राज्य सरकारचा धिक्कार असो, वीज दरवाढ व अतिरिक्त भारनियमन कमी व्हायलाच हवे’ आदी घोषणांनी इस्लामपूर बसस्थानक परिसर दणाणून सोडला होता.

विजय पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना कमी दराने, नियमित वीज देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने कित्येक वेळा शेतकºयांच्या शेतीपंपाची वीज दरवाढ व अलीकडे अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. सरकारच्या भरमसाट दरवाढीने सामान्य माणूस व शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. याला भाजप सरकारची धोरणेच जबाबदार आहेत.

या आंदोलनात विनायक यादव, मनोज पाटील, अजित बेनाडे, असिफ पटेल, हणमंत कदम, स्वप्नील पाटील, सतीश पाटील, सुहास खोत, भागवत पाटील, नंदकुमार कोळेकर, वीरधवल होरे, सुशील पाटील, प्रशांत थोरात, अक्षय मोरे, सुजित साळुंखे, सचिन साळुंखे, रवी सूर्यवंशी, डॉ. प्रकाश पाटील, बाजीराव बेनाडे, राजेंद्र पाटील सहभागी झाले होते.खरीप : पिके वाळलीपाणी असूनही, वीज नसल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाळू लागली आहेत. तरीही शेतकºयांकडे भाजप सरकारचे लक्ष दिसत नाही. वीज अखंडित मिळत नसताना, पुन्हा ग्राहकांवर वीज बिलाचा बोजा टाकण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस