शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...तर दोघांनी पळून जावून लग्न करावे; प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

By शीतल पाटील | Updated: October 2, 2023 22:06 IST

इंडिया आघाडीत सामील होण्याच्या मुद्दावरून वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवण्यात आले आहे.

शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू असतानाच डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली आहे. इंडिया आघाडीत सहभागी होण्यास दोन भडजी आडवे येत असल्याचा आरोप केला होता. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत दोघेजण लग्नाला उत्सूक असतील आणि भडजी आडवे येत असतील तर पळून जावून लग्न करावे, असा टोला लगाविला.

इंडिया आघाडीत सामील होण्याच्या मुद्दावरून वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवण्यात आले आहे. अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यात ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या युतीची चर्चा राज्यभर सुरू आहे. मध्यंतरी ठाकरे व आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले होते. आंबेडकर यांनी निवडणुकीबाबत शिवसेनेशी चर्चा झाली आहे. लग्नाची तारीख ठरली असली तरी दोन भडजी आडवे येत आहेत. एक राष्ट्रवादी तर दुसरा काँग्रेस असल्याची टीका केली होती.

त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले की, दोघेही लग्नाला उत्सूक आहेत. त्यांचा साखरपुडा झाला असेल आणि भटजी अडथळे आणत असतील तर पळून जाऊन लग्न करावे. इंडिया आघाडीत सामील होणाऱ्या पक्षाचे आम्ही स्वागतच करू. भाजला विरोध करणे हाच मुख्य उद्देश आहे. पण आघाडीची ध्येयधोरणे सहभागी पक्षांना मान्य करावी लागतील. डाॅ. आंबेडकर सकारात्मक असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांची उद्ध्व ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. ठाकरे आम्हाला सांगतील. भाजपला विरोध करणाऱ्याला कुणालाही आम्ही टाळणार नाही, असेही पाटील म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडेच राहील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी (दि. ६) सुनावणी होणार आहे. तेथे आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. देशभरात २३ राज्यांत राष्ट्रवादीचे अस्तित्व आहे. त्यातील १९ राज्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. पक्षकार्यकर्त्यांचे केडर शरद पवारांसोबत मताधिक्याने आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे. पक्ष हा आमदारांचा नसून कार्यकर्त्यांचा असतो. तो कार्यकर्त्यांचाच आणि पर्यायाने शरद पवार यांच्याकडेच राहील.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर