शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तासगावात राष्टवादीचे नगरसेवक प्रभावहीन : पालिका सभेत दुबळा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:27 IST

तासगाव : तासगाव शहरात एकापेक्षा एक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत, सत्ताधाऱ्यांकडून भ्रमनिरास होत असताना, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात विरोधक राष्टÑवादीचे नगरसेवकही प्रभावहीन झाले आहेत. सर्वसाधारण सभेत दुबळा विरोध करण्यापलीकडे राष्टÑवादीच्या नगरसेवकांचे दर्शन दुर्मिळ झाल्याचे बोलले जात आहे.पालिका निवडणुकीत शहरातील जनतेने विरोधक म्हणून राष्टवादीला झुकते माप दिले. राष्टÑवादीच्या आठ नगरसेवकांनी पालिकेत ...

तासगाव : तासगाव शहरात एकापेक्षा एक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत, सत्ताधाऱ्यांकडून भ्रमनिरास होत असताना, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात विरोधक राष्टÑवादीचे नगरसेवकही प्रभावहीन झाले आहेत. सर्वसाधारण सभेत दुबळा विरोध करण्यापलीकडे राष्टÑवादीच्या नगरसेवकांचे दर्शन दुर्मिळ झाल्याचे बोलले जात आहे.

पालिका निवडणुकीत शहरातील जनतेने विरोधक म्हणून राष्टवादीला झुकते माप दिले. राष्टÑवादीच्या आठ नगरसेवकांनी पालिकेत एन्ट्री केली. विरोधक म्हणून राष्टवादीला मिळालेले प्रतिनिधित्व भाजपला झोंबणारे होते. विरोधकांची संख्या जास्त असल्याने सत्ताधाºयांवर अंकुश बसेल अशी अपेक्षा होती. मात्र आतापर्यंतची राष्टवादीची कामगिरी पाहिल्यानंतर, सर्वसारधारण सभेत दुबळा विरोध करण्यापलीकडे राष्टवादीचे नगरसेवक काहीच करू शकलेले नाहीत. सत्ताधाºयांकडून सभा गुंडाळण्याचा पायंडा कायम आहे. हा पायंडा मोडीत काढण्यात विरोधकांना अपयश आले आहे. सभेत एखादा आक्षेप नोंदवण्यापलीकडे राष्टवादीच्या नगरेसवकांची कोणतीच कामगिरी लक्षणीय नाही.

पालिकेकडे कोट्यवधीचा निधी शिल्लक असूनही अनेक महिन्यांपासून एकाही सभेत विकास कामे करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला नाही. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लागलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचे गाळेवाटप रखडलेले आहे. शहरातील स्वच्छतेचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात एक ना अनेक समस्यांचे गाºहाणे असताना, विरोधकांकडून मात्र सक्षमपणे विरोध होताना दिसून येत नाही. सत्ताधाºयांकडून कामे होत नाहीत आणि विरोधकांचा प्रभाव पडत नाही, अशी परस्थिती आहे. त्यामुळे शहरातील जनतेला समस्यांचा सामना करावा लागत आहे.

गतवेळच्या सभागृहात आबा - काका ऐक्य एक्स्प्रेस असताना, काँग्रेसचे अजय पवार हे एकमेव नगरसेवक विरोधी बाकावर होते. त्यावेळी त्यांनी एकट्याने सगळे सभागृह चालवून दाखवले होते. मात्र यावेळी राष्टÑवादीचे आठ नगरसेवक विरोधी बाकावर असतानादेखील, ते नॉट नोटिसेबल ठरत आहेत.

राष्टदीचे नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागात सत्ताधाºयांपेक्षा अधिक समस्यांचा बोजवारा आहे. गटनेता म्हणून बाळासाहेब सावंत हे एकटेच खिंड लढवताना दिसत आहेत, तर प्रभाग एकमधील निर्मला पाटील याच अपवादाने प्रभागातील समस्यांबाबत आग्रही असल्याचे चित्र आहे. यापलीकडे राष्टवादीच्या नगरसेवकांना कोणताही प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे पालिकेत राष्टवादीची अवस्था असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच आहे.सभागृहात भाषण : बाहेर नॉट रिचेबलप्रभाग एकमधून भाजपचे मातब्बर उमेदवार बाबासाहेब पाटील यांचा पराभव करून राष्टवादीचे अभिजित माळी सभागृहात आले. त्यांच्याकडून लोकांनाही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र सभागृहात केवळ जुजबी भाषण करण्यापलीकडे माळी यांची कोणतीच कामगिरी लक्षवेधी झाली नाही. किंबहुना बहुतांशीवेळा ते नॉट रिचेबल असल्याने समस्या मांडायच्या तरी कोणाकडे? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.