शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात राष्टवादीचे नगरसेवक प्रभावहीन : पालिका सभेत दुबळा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:27 IST

तासगाव : तासगाव शहरात एकापेक्षा एक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत, सत्ताधाऱ्यांकडून भ्रमनिरास होत असताना, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात विरोधक राष्टÑवादीचे नगरसेवकही प्रभावहीन झाले आहेत. सर्वसाधारण सभेत दुबळा विरोध करण्यापलीकडे राष्टÑवादीच्या नगरसेवकांचे दर्शन दुर्मिळ झाल्याचे बोलले जात आहे.पालिका निवडणुकीत शहरातील जनतेने विरोधक म्हणून राष्टवादीला झुकते माप दिले. राष्टÑवादीच्या आठ नगरसेवकांनी पालिकेत ...

तासगाव : तासगाव शहरात एकापेक्षा एक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत, सत्ताधाऱ्यांकडून भ्रमनिरास होत असताना, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात विरोधक राष्टÑवादीचे नगरसेवकही प्रभावहीन झाले आहेत. सर्वसाधारण सभेत दुबळा विरोध करण्यापलीकडे राष्टÑवादीच्या नगरसेवकांचे दर्शन दुर्मिळ झाल्याचे बोलले जात आहे.

पालिका निवडणुकीत शहरातील जनतेने विरोधक म्हणून राष्टवादीला झुकते माप दिले. राष्टÑवादीच्या आठ नगरसेवकांनी पालिकेत एन्ट्री केली. विरोधक म्हणून राष्टवादीला मिळालेले प्रतिनिधित्व भाजपला झोंबणारे होते. विरोधकांची संख्या जास्त असल्याने सत्ताधाºयांवर अंकुश बसेल अशी अपेक्षा होती. मात्र आतापर्यंतची राष्टवादीची कामगिरी पाहिल्यानंतर, सर्वसारधारण सभेत दुबळा विरोध करण्यापलीकडे राष्टवादीचे नगरसेवक काहीच करू शकलेले नाहीत. सत्ताधाºयांकडून सभा गुंडाळण्याचा पायंडा कायम आहे. हा पायंडा मोडीत काढण्यात विरोधकांना अपयश आले आहे. सभेत एखादा आक्षेप नोंदवण्यापलीकडे राष्टवादीच्या नगरेसवकांची कोणतीच कामगिरी लक्षणीय नाही.

पालिकेकडे कोट्यवधीचा निधी शिल्लक असूनही अनेक महिन्यांपासून एकाही सभेत विकास कामे करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला नाही. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लागलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचे गाळेवाटप रखडलेले आहे. शहरातील स्वच्छतेचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात एक ना अनेक समस्यांचे गाºहाणे असताना, विरोधकांकडून मात्र सक्षमपणे विरोध होताना दिसून येत नाही. सत्ताधाºयांकडून कामे होत नाहीत आणि विरोधकांचा प्रभाव पडत नाही, अशी परस्थिती आहे. त्यामुळे शहरातील जनतेला समस्यांचा सामना करावा लागत आहे.

गतवेळच्या सभागृहात आबा - काका ऐक्य एक्स्प्रेस असताना, काँग्रेसचे अजय पवार हे एकमेव नगरसेवक विरोधी बाकावर होते. त्यावेळी त्यांनी एकट्याने सगळे सभागृह चालवून दाखवले होते. मात्र यावेळी राष्टÑवादीचे आठ नगरसेवक विरोधी बाकावर असतानादेखील, ते नॉट नोटिसेबल ठरत आहेत.

राष्टदीचे नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागात सत्ताधाºयांपेक्षा अधिक समस्यांचा बोजवारा आहे. गटनेता म्हणून बाळासाहेब सावंत हे एकटेच खिंड लढवताना दिसत आहेत, तर प्रभाग एकमधील निर्मला पाटील याच अपवादाने प्रभागातील समस्यांबाबत आग्रही असल्याचे चित्र आहे. यापलीकडे राष्टवादीच्या नगरसेवकांना कोणताही प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे पालिकेत राष्टवादीची अवस्था असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच आहे.सभागृहात भाषण : बाहेर नॉट रिचेबलप्रभाग एकमधून भाजपचे मातब्बर उमेदवार बाबासाहेब पाटील यांचा पराभव करून राष्टवादीचे अभिजित माळी सभागृहात आले. त्यांच्याकडून लोकांनाही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र सभागृहात केवळ जुजबी भाषण करण्यापलीकडे माळी यांची कोणतीच कामगिरी लक्षवेधी झाली नाही. किंबहुना बहुतांशीवेळा ते नॉट रिचेबल असल्याने समस्या मांडायच्या तरी कोणाकडे? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.