शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय दुग्ध संवर्धन योजनेकडे केंद्र-राज्य सरकारकडून डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 00:59 IST

विनायकराव पाटील : दूध व्यवसायावर परिणामाची भीती

इस्लामपूर : केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या १७ हजार ३३४ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय दुग्ध संवर्धन योजनेकडे केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारने दुर्लक्षित केले आहे. त्यांच्या उदासीनतेमुळे पुढे या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप राज्य दूध उत्पादक कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केला. राजारामबापू दूध संघाच्या कार्यस्थळावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. विनायकराव पाटील म्हणाले, तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी देशातील दुग्ध व्यवसाय उर्जितावस्थेत येण्यासाठी ही योजना अमलात आणली होती. २०११ मध्ये पुढील दहा वर्षांचा विचार करून शरद पवार यांनी जागतिक बॅँकेच्या सहकार्याने ही योजना बनवली होती. दूध उत्पादन क्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला चालना देणे, कृत्रिम गर्भधारणेसाठी उच्चतम दर्जाच्या सुविधा पुरवणे, दूध वाढीसाठी आहाराचे महत्त्व उत्पादकांना पटवून देणे यासह उच्च दर्जाचे चारा बियाणे करण्याचा अंतर्भाव या योजनेत आहे. पाटील म्हणाले, देशातील सर्व राज्य सरकारे, त्या राज्यातील दूध महासंघ आणि राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाशी चर्चा करून खा. शरद पवार यांनी हा आराखडा तयार केला. राष्ट्रीय दुग्ध संवर्धन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ८ ते १० हजार कोटी रुपयांच्या निधी वाटपासंदर्भात इतर राज्यांनी नियोजन केले आहे. मात्र महाराष्ट्रातील विद्यमान सहकार आणि महानंदमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने राज्याला या योजनेतील निधी मिळण्याबाबत साशंकता आहे. हा निधी न मिळाल्यास त्याचा राज्यातील दूध व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यासाठी राज्य दूध उत्पादक कृती समितीच्यावतीने शरद पवार यांची भेट घेऊन याप्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक उदयबापू पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)