शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

राष्ट्रीय दुग्ध संवर्धन योजनेकडे केंद्र-राज्य सरकारकडून डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 00:59 IST

विनायकराव पाटील : दूध व्यवसायावर परिणामाची भीती

इस्लामपूर : केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या १७ हजार ३३४ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय दुग्ध संवर्धन योजनेकडे केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारने दुर्लक्षित केले आहे. त्यांच्या उदासीनतेमुळे पुढे या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप राज्य दूध उत्पादक कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केला. राजारामबापू दूध संघाच्या कार्यस्थळावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. विनायकराव पाटील म्हणाले, तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी देशातील दुग्ध व्यवसाय उर्जितावस्थेत येण्यासाठी ही योजना अमलात आणली होती. २०११ मध्ये पुढील दहा वर्षांचा विचार करून शरद पवार यांनी जागतिक बॅँकेच्या सहकार्याने ही योजना बनवली होती. दूध उत्पादन क्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला चालना देणे, कृत्रिम गर्भधारणेसाठी उच्चतम दर्जाच्या सुविधा पुरवणे, दूध वाढीसाठी आहाराचे महत्त्व उत्पादकांना पटवून देणे यासह उच्च दर्जाचे चारा बियाणे करण्याचा अंतर्भाव या योजनेत आहे. पाटील म्हणाले, देशातील सर्व राज्य सरकारे, त्या राज्यातील दूध महासंघ आणि राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाशी चर्चा करून खा. शरद पवार यांनी हा आराखडा तयार केला. राष्ट्रीय दुग्ध संवर्धन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ८ ते १० हजार कोटी रुपयांच्या निधी वाटपासंदर्भात इतर राज्यांनी नियोजन केले आहे. मात्र महाराष्ट्रातील विद्यमान सहकार आणि महानंदमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने राज्याला या योजनेतील निधी मिळण्याबाबत साशंकता आहे. हा निधी न मिळाल्यास त्याचा राज्यातील दूध व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यासाठी राज्य दूध उत्पादक कृती समितीच्यावतीने शरद पवार यांची भेट घेऊन याप्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक उदयबापू पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)