शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

गैरकारभार रोखल्याने माझी बदनामी

By admin | Updated: July 6, 2016 00:22 IST

संजीवकुमार सावंत : प्रामाणिक अधिकाऱ्यांशी नम्रतेनेच बोलणार

सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दर करारपत्राद्वारे बेकायदेशीर साहित्य खरेदीचा प्रयत्न केला होता. त्यास विरोध करून ई-निविदा मागविण्याची सूचना दिली होती. एका अधिकाऱ्याच्या निष्क्रिय कारभारामुळे दीड कोटीचा निधी शासनाकडे परत गेला. याविरोधात जाब विचारला, म्हणूनच तो अधिकारी माझी बदनामी करीत आहे, अशी टीका कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजीवकुमार सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. जिल्हा परिषदेतील अन्य प्रामाणिक अधिकाऱ्यांशी आपण नम्रतेनेच बोलू, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.ते म्हणाले की, कृषी विभागाकडील योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे दीड कोटीचा निधी मिळाला होता. या निधीतून अधिकाऱ्यांनी योजना राबविल्या नाहीत, म्हणून तो निधी शासनाकडे परत गेला आहे. अर्थातच जिल्ह्याच्या विकास कामाचा निधी परत गेल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागले आहे. याचबरोबरच राज्य शासनाकडून सोलर पंपासाठी सध्या दोन कोटीचा निधी मिळाला आहे. परंतु, या निधी खर्चासाठी प्रस्तावच अधिकाऱ्यांनी केला नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील विकास कामे थांबली आहेत. या अधिकाऱ्यास आम्ही सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव कृषी समितीच्या सभेत घेतला होता. या महाशयांनी विषय समितीच्या इतिवृत्तामध्येच तो ठराव घेतला नाही. त्यामुळे मी इतिवृत्तावर सही केली नव्हती. याचा अधिकाऱ्यांच्या मनामध्ये राग होता. यातूनच, मी पैसे मागत असल्याची सर्वत्र चर्चा करून माझी बदनामी करीत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करणार आहे. बदनामी करणाऱ्या या अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर काम यापुढेही करणार नाही. औषध दुकानदाराकडून पैसे गोळा करण्याबाबत त्यांना काहीच बोललो नव्हतो. तरीही माझ्यावर द्वेषातून, दुकानदाराकडून पैसे गोळा करण्याची सूचना केल्याचे ते सांगत आहेत. मला कोणत्याही दुकानदाराकडून पैसे गोळा करण्याची काहीच गरज नाही. अधिकारी पैसे मागत असतील तर त्यांनी माझ्याकडे अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहनही सावंत यांनी केले. (प्रतिनिधी)आधी त्यांचा आवाज वाढला...शिक्षण समितीच्या सभेत जत तालुक्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या आणि बदल्यांसाठी गेलो होतो. यावेळी अधिकाऱ्यांना मी नम्रपणे बोलत असताना, त्यांचा माझ्याकडे पाहत आवाज वाढला. यावेळी त्यांना आपण सभापतींशी बोलत असल्याचे भान ठेवा, असे म्हणालो. त्यांचा आवाज वाढल्यामुळे माझाही आवाज वाढला होता, असे संजीवकुमार सावंत यांनी स्पष्ट केले. जत तालुक्यातील काही शिक्षक अन्य जिल्ह्यात असून, त्यांना सांगली जिल्ह्यात घेण्याची सूचना केली होती. प्रत्येकवेळा अधिकारी चुकीचा अर्थ लावून फायली पुढे जाऊ देत नाहीत. शिक्षकांची आर्थिक पिळवणूक थांबावी म्हणून अधिकाऱ्यांना बोललो आहे, असेही त्यांनी सांगितले.