शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

जत नगरपालिकेत निवडणूकपूर्व उलथापालथ--राजकीय वातावरण तापू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:17 IST

जत : जत नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु निवडणूकपूर्व राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

ठळक मुद्दे: डिसेंबरमध्ये निवडणूक शक्य; जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणारआगामी निवडणुकीत भाजप व कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेस असा तिरंगी सामना

जयवंत आदाटे।लोकमत न्यूज नेटवर्कजत : जत नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु निवडणूकपूर्व राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे जत शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.डिसेंबरमध्ये जत नगरपालिकेत नवे नगरसेवक येणार आहेत. त्यापूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ४२ हजार असून मतदार २८ हजार ५०० आहेत. एकूण १० प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन याप्रमाणे वीस नगरसेवक, एक नगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत नगरसेवक अशा एकूण २३ जणांचे मंडळ असणार आहे.

बाजार समितीचे माजी सभापती व वसंतदादा गटाचे जत तालुक्यातील प्रमुख सुरेश शिंदे यांनी कॉँग्रेस पक्षातून नुकताच राष्टÑवादीत प्रवेश केला आहे. त्यांचे समर्थक व वसंतदादा विकास आघाडीतून निवडून आलेले सहा नगरसेवक आणि राष्टÑवादीचे उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नेते राष्टÑवादीत, तर त्यांचे समर्थक नगरसेवक कॉँग्रेसमधील डॉ. पतंगराव कदम गटात सामील झाले आहेत. त्यामुळे जत शहरातील कॉँग्रेस पक्ष मजबूत होण्यास मदत मिळाली आहे.गत निवडणुकीत सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा विकास आघाडी, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनेल आणि राष्टÑवादी असा तिरंगी सामना झाला होता. शिंदे गटाचे आठ, सावंत समर्थक सात व राष्टÑवादीचे तीन नगरसेवक असे पक्षीय बलाबल होते. मागील पाच वर्षात जत शहर आणि तालुक्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाला. शिंदे यांनी विक्रम सावंत यांना डावलून आमदार विलासराव जगताप यांच्याशी युती करून नगरपालिकेत सुरुवातीस सत्ता स्थापन केली. त्यानंतर अल्पावधित शिंदे व सावंत यांनी एकत्र येऊन पालिकेत सत्ता स्थापन केली.

कालांतराने या दोन नेत्यांत मतभेद निर्माण झाले. परंतु नगरसेवक मात्र मतभेद विसरुन एकत्रित राहिले आहेत.जत शहरातील वाहतूक व्यवस्था, टपरी धारकांचे पुनर्वसन व अतिक्रमण आणि कचरा निर्मूलन आदी प्रश्न मागील पाच वर्षात प्रलंबित राहिले आहेत. विकास कामांऐवजी एकमेकांची जिरविण्यात आणि सोयीचे राजकारण करण्यातच नेतेमंडळी आणि नगरसेवकांनी धन्यता मानली आहे.त्यामुळे मतदारांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. आगामी निवडणुकीत भाजप व कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेस असा तिरंगी सामना होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. प्रत्येक प्रभागात गोपनीय बैठका घेऊन मतदारांचा कानोसा घेण्यात सुरुवात केली आहे.पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. पक्षाची ध्येय-धोरणे मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांना आपले करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. - चंद्रकांत गुड्डोडगी, भाजप तालुकाध्यक्ष 

नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांना घेऊन सर्वसमावेशक पॅनेल आम्ही तयार करणार आहे. जत शहराचा कायापालट करण्यासाठी एक व्हिजन घेऊन आम्ही मतदारांसमोर जाणार आहे. कॉँग्रेस पक्षाला सध्या चांगले वातावरण आहे.- सुजय ऊर्फ नाना शिंदे,कॉँग्रेस, तालुका कार्याध्यक्ष्सर्वच प्रभागात नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. आमदार जयंत पाटील यांनी जत शहरासाठी सर्वाधिक निधी दिला आहे. केलेल्या कामांची पोहोच पावती मतदारांकडून निश्चित मिळणार आहे.- उत्तम चव्हाण, राष्ट्रवादीयुवक कॉँग्रेस तालुकाध्यक्ष ा