शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

दहा व्हेंटिलेटर्स खरेदीचा महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST

सांगली : जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडूनच विनानिविदा १० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. ...

सांगली : जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडूनच विनानिविदा १० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. दरम्यान, मिरजेत जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय महासभेत घेण्यात आला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटर्स खरेदी व बायो मेडिकल वेस्ट प्रकल्पाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष राहिले होते. एक विषय स्थायी समितीकडे, तर दुसरा महासभेत चर्चेला आला. महापालिका स्थायी समितीची ऑनलाईन सभा बुधवारी सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ५५ लाख रुपये खर्च करून जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडूनच १० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जैववैद्यकीय कचऱ्याच्या विघटनाच्या प्रकल्पावरून जोरदार चर्चा झाली. सभेत काँग्रेसचे शेडजी मोहिते व संगीता हारगे यांनी यांनी मिरजेत बेडग रोडवर असलेले जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्प मिरज आयएमए या संस्थेला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव ‘१-ज’ अंतर्गत आणला होता. या प्रस्तावाला उपमहापौर उमेश पाटील यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी सभेपूर्वीच विरोध केला.

शेडजी मोहिते म्हणाले की, हा प्रकल्प शिरोली येथील संस्थेला चालविण्यास देण्याचा ठराव महासभेत झाला होता. मात्र, ही संस्था नोंदणीकृत नाही, त्यांना या कामाचा अनुभव नाही; मात्र या प्रकल्पासाठी मिरजेतील डॉक्टरांच्या आयएमए संस्थेने लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन वर्ष त्यांनी प्रकल्प योग्य पद्धतीने चालविला आहे. महापालिकेने त्यांना काही दुरस्ती व प्रदूषण मंडळाचा परवाना घेण्यास सांगितले होते. त्यामुळे प्रकल्प बंद ठेवला होता. हे कामही या संस्थेने पूर्ण केले आहे. शिवाय या कंपनीचा आणि पालिकेचा दहा वर्षांचा करार आहे, तो अजून वैध आहे. त्यामुळे या संस्थेला हा प्रकल्प द्यावा, अशी मागणी केली.

चाैकट

चर्चेवेळी सभा संपल्याची घोषणा

महापौर सूर्यवंशी यांनी या विषयावर कोणतेही आदेश दिले नाहीत. अन्य कोणत्या सदस्यांना बाेलण्याची संधीही दिली नाही. त्यांनी थेेट संभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे या विषयावर नेमका निर्णय काय झाला? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.