शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

महापालिका गोत्यात

By admin | Updated: May 14, 2015 23:53 IST

कारवाईलाही ‘अभय’ : एलबीटीप्रश्नी थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कृपादृष्टी

सांगली : दंड व व्याज माफीसाठी शासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेंतर्गत आता लाभार्थी होणाऱ्या थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही. शासनाच्या आदेशातच तसा उल्लेख असल्याने, राज्यातील सर्वच महापालिकांचे प्रशासन अडचणीत सापडले आहे. दंड व व्याजाबरोबरच संभाव्य कारवाईपासूनही व्यापाऱ्यांची मुक्तता झाली असून, महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. सांगलीत एलबीटीविरोधी कृती समितीने केलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे महापालिका दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. महापालिकेचा डोलारा कोसळला असतानाच, दंड व व्याजमाफीच्या शासननिर्णयामुळे ६० कोटी रुपयांवर प्रशासनाला पाणी सोडावे लागणार आहे. त्यातच थकबाकीदार व्यापारी व विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी तयारी सुरू असतानाच, शासनाने अभय योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अडचणीत भरच पडली आहे. शासनाच्या या सूचनेनुसार ३१ जुलैपर्यंत व्यापाऱ्यांना विवरणपत्र व कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मुदतीत जे व्यापारी पूर्ण कर भरतील, त्यांचा दंड व व्याज माफ होणार आहे. तोपर्यंत महापालिकेला अशा कोणत्याही थकबाकीदार व्यापाऱ्यावर कारवाई करता येणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांवर दाखविलेल्या कृपादृष्टीमुळे महापालिकेच्या अडचणीत भरच पडली आहे. व्यापाऱ्यांनी स्वत:हून कर भरण्याची अपेक्षा करण्याशिवाय महापालिकेच्या हाती आता काहीही उरलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास नकार देत असहकार आंदोलन पुकारले होते. गत महिन्यात व्यापारी आणि महापालिकेत तडजोड होऊन कर भरण्यास व्यापारी तयार झाले. तरीही तडजोडीप्रमाणे व्यापाऱ्यांकडून एलबीटी भरण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. व्यापाऱ्यांकडे १७० कोटींची एलबीटी थकीत असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. जकातीची शेवटची वसुली १०५ कोटी रुपये होती. त्यात दोन वर्षांची नैसर्गिक वाढ गृहीत धरून ती रक्कम १४५ कोटींच्या घरात जाते. यातील किमान १२० कोटी रुपये तरी महापालिकेच्या तिजोरीत जमा व्हावेत, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मार्च २०१५ पासून ३१ जुलै २०१५ पर्यंतचाही एलबीटी गृहीत धरता, महापालिकेला १५० कोटी रुपये अपेक्षित होते. (प्रतिनिधी)मुदतीनंतर कारवाई?शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अभय योजना ३१ जुलैपर्यंतच लागू आहे. त्यानंतर जे व्यापारी चालू किंवा थकीत कर भरतील, त्यांना दंड व व्याज लागू होणार आहे. त्यामुळे ही मुदत संपण्याची प्रतीक्षा महापालिकेला करावी लागणार आहे. जुलैपर्यंत हरित न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा प्रकल्पासाठी महापालिकेस ४० कोटी भरावे लागणार असल्याने महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. हरकती व सूचना शासनाच्या अभय योजनेबाबतची प्रसिद्धी येत्या दोन दिवसांत करण्यात येणार असून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. २० दिवसांत या सूचना नागरिकांनी शासनाकडे दाखल करायच्या आहेत.