शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

महापालिका गोत्यात

By admin | Updated: May 14, 2015 23:53 IST

कारवाईलाही ‘अभय’ : एलबीटीप्रश्नी थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कृपादृष्टी

सांगली : दंड व व्याज माफीसाठी शासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेंतर्गत आता लाभार्थी होणाऱ्या थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही. शासनाच्या आदेशातच तसा उल्लेख असल्याने, राज्यातील सर्वच महापालिकांचे प्रशासन अडचणीत सापडले आहे. दंड व व्याजाबरोबरच संभाव्य कारवाईपासूनही व्यापाऱ्यांची मुक्तता झाली असून, महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. सांगलीत एलबीटीविरोधी कृती समितीने केलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे महापालिका दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. महापालिकेचा डोलारा कोसळला असतानाच, दंड व व्याजमाफीच्या शासननिर्णयामुळे ६० कोटी रुपयांवर प्रशासनाला पाणी सोडावे लागणार आहे. त्यातच थकबाकीदार व्यापारी व विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी तयारी सुरू असतानाच, शासनाने अभय योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अडचणीत भरच पडली आहे. शासनाच्या या सूचनेनुसार ३१ जुलैपर्यंत व्यापाऱ्यांना विवरणपत्र व कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मुदतीत जे व्यापारी पूर्ण कर भरतील, त्यांचा दंड व व्याज माफ होणार आहे. तोपर्यंत महापालिकेला अशा कोणत्याही थकबाकीदार व्यापाऱ्यावर कारवाई करता येणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांवर दाखविलेल्या कृपादृष्टीमुळे महापालिकेच्या अडचणीत भरच पडली आहे. व्यापाऱ्यांनी स्वत:हून कर भरण्याची अपेक्षा करण्याशिवाय महापालिकेच्या हाती आता काहीही उरलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास नकार देत असहकार आंदोलन पुकारले होते. गत महिन्यात व्यापारी आणि महापालिकेत तडजोड होऊन कर भरण्यास व्यापारी तयार झाले. तरीही तडजोडीप्रमाणे व्यापाऱ्यांकडून एलबीटी भरण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. व्यापाऱ्यांकडे १७० कोटींची एलबीटी थकीत असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. जकातीची शेवटची वसुली १०५ कोटी रुपये होती. त्यात दोन वर्षांची नैसर्गिक वाढ गृहीत धरून ती रक्कम १४५ कोटींच्या घरात जाते. यातील किमान १२० कोटी रुपये तरी महापालिकेच्या तिजोरीत जमा व्हावेत, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मार्च २०१५ पासून ३१ जुलै २०१५ पर्यंतचाही एलबीटी गृहीत धरता, महापालिकेला १५० कोटी रुपये अपेक्षित होते. (प्रतिनिधी)मुदतीनंतर कारवाई?शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अभय योजना ३१ जुलैपर्यंतच लागू आहे. त्यानंतर जे व्यापारी चालू किंवा थकीत कर भरतील, त्यांना दंड व व्याज लागू होणार आहे. त्यामुळे ही मुदत संपण्याची प्रतीक्षा महापालिकेला करावी लागणार आहे. जुलैपर्यंत हरित न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा प्रकल्पासाठी महापालिकेस ४० कोटी भरावे लागणार असल्याने महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. हरकती व सूचना शासनाच्या अभय योजनेबाबतची प्रसिद्धी येत्या दोन दिवसांत करण्यात येणार असून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. २० दिवसांत या सूचना नागरिकांनी शासनाकडे दाखल करायच्या आहेत.