शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मुलाला वाचविताना मावशीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:13 IST

बिळाशी (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या डाव्या कालव्यात बहिणीच्या बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या मावशीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. इंदिरा तुकाराम जाधव (वय ३८, रा. वाकुर्डे, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. इंदिरा यांना वाचविण्यासाठी गेलेली त्यांची

ठळक मुद्देबिळाशीतील घटना : वारणा डाव्या कालव्यात बुडाली

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या डाव्या कालव्यात बहिणीच्या बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या मावशीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. इंदिरा तुकाराम जाधव (वय ३८, रा. वाकुर्डे, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. इंदिरा यांना वाचविण्यासाठी गेलेली त्यांची बहीण रंजना यशवंत पाटील (रा. मोहरे) मात्र बचावल्या.

इंदिरा बिळाशी येथील यशवंत दळवी यांच्या कन्या होत. त्या व रंजना सुटीसाठी काही दिवसांपूर्वी माहेरी आल्या होत्या. शुक्रवारी कपडे धुण्यासाठी त्या वारणा डावा कालव्यावरील शिराळकर डोहाजवळ गेल्या होत्या.

यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा यांचा मुलगा ओम, रंजना यांचा मुलगा सोहम व शेजारील यश साठे अशी तीन मुले होती. दोघी बहिणी कपडे धुण्यात व्यस्त होत्या. त्यावेळी यश याने पोहता येत असल्याने कालव्यात उडी मारली. हे पाहून त्याच्यापाठोपाठ सोहम व ओम यांनीही उड्या मारल्या. मात्र सोहमला पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. हे पाहून इंदिरा पाण्यात उतरल्या व त्यांनी सोहम आणि ओम या दोघांनाही बाहेर काढले. मात्र, पाणी वाहते असल्याने आणि वेगाचा अंदाज न आल्याने इंदिरा बुडू लागल्या. ही बाब रंजना यांच्या निदर्शनास येताच त्यांनी इंदिरा यांना पाण्याबाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली. विशेष म्हणजे रंजना यांना पोहता येत नसतानाही त्यांनी धाडस केले. एका हाताने त्यांनी कालव्याच्या काठावरील झाडाला घट्ट धरले, तर दोन्ही पायांमध्ये इंदिरा यांना धरून ठेवले होते.

दरम्यान, या घटनेने भयभीत झालेली तिन्ही मुले आरडाओरडा करत पळत सुटली. हे पाहून परिसरातील नागरिकांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. रंजना यांचा भाऊ गुणवंत दळवी, कुमार शिराळकर, मयूर शिराळकर, बाबासाहेब परीट, बाबूराव पाटील, अक्षय लोहार, महेश लोहार, आकाश लोहार, दिनकर साळुंखे, अण्णा परीट, महादेव साठे आदींनी कालव्यात उडी घेतली व टायरट्यूब तसेच साडीच्या साहाय्याने दोघींना बाहेर काढले. मात्र, पाण्यात गटांगळ्या खाल्ल्याने इंदिरा बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना तात्काळ शिराळा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तथापि त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.इंदिराचे धाडस आणि मनाला चटकाबहिणीचा मुलगा बुडत असल्याचे पाहून, पोहता येत नसतानाही इंदिरा यांंनी पाण्यात उडी घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले व त्याचा जीव वाचविला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. त्यांनी धाडसाने बहिणीच्या मुलाचे प्राण वाचवले व स्वत: मृत्यूला कवटाळले. ही घटना मनाला चटका लावून जाणारी होती.

आज परतणार होत्या...इंदिरा सध्या मुंबईला कुटुंबासह राहत होत्या. महिन्यापूर्वी त्या सुटीसाठी माहेरी आल्या होत्या. सुटी संपल्याने त्या शनिवारी मुंबईला जाणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

 

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू