शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

सांगली जिल्ह्यात विस्तारतेय दुर्मिळ रक्तदात्यांची चळवळ...--रक्तदाता दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:12 IST

अविनाश कोळी ।सांगली : जनजागृती, शिबिरांची वाढती संख्या, संघटनात्मक चळवळीला मिळणारे बळ यामुळे गेल्या काही वर्षांत सांगली जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. त्यातही आता दुर्मिळ रक्तदात्यांकडून दिले जाणारे योगदान ठळकपणे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून त्यांचे दातृत्व विस्तारत आहे.राज्याचा रक्तदात्यांचा आलेख ज्यापद्धतीने वाढत आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील रक्तदात्यांची ...

ठळक मुद्देजागृतीचा परिणाम : संख्या पन्नास हजारांवर;जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून गरजूंसाठी रक्तदाते सरसावत असल्याचे चित्र

अविनाश कोळी ।सांगली : जनजागृती, शिबिरांची वाढती संख्या, संघटनात्मक चळवळीला मिळणारे बळ यामुळे गेल्या काही वर्षांत सांगली जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. त्यातही आता दुर्मिळ रक्तदात्यांकडून दिले जाणारे योगदान ठळकपणे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून त्यांचे दातृत्व विस्तारत आहे.

राज्याचा रक्तदात्यांचा आलेख ज्यापद्धतीने वाढत आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्याही वाढताना दिसते. मागणीच्या तुलनेत आजही शंभर टक्के ऐच्छिक रक्तदान होत नसले तरी, भविष्यात हा आकडा गाठणे कठीण नसल्याचेही आशादायी चित्र दिसून येते. साधारण रक्तदानाच्या चळवळीसोबतच दुर्मिळ रक्तगटासाठी विशेष मोहिमा राबविणाऱ्या संघटनांचा जन्म गेल्या काही वर्षांत झाला. यामध्ये आयुष ब्लड हेल्पलाईन, बॉम्बे ओ ग्रुप यासारख्या आणखी काही संघटनांचा समावेश आहे. आयुष या संस्थेकडे ९५०० दात्यांचा मोठा गट आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ३५०० रुग्णांना निगेटिव्ह रक्ताचा, दीड हजार रुग्णांना प्लेटलेटस्चा आणि १७५ रुग्णांना एसडीपी (सिंगल डोनर प्लेटलेटस्)चा पुरवठा केला आहे. त्यांची चळवळ सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यांपर्यंत वाढली आहे.

बॉम्बे ओ या दुर्मिळ रक्तगटाचे जिल्ह्यात केवळ चौघेच आहेत. या चारही लोकांनी अनेकजणांना जीवदान दिले आहे. संपूर्ण महाराष्टÑात त्यांनी १५ हजार ७३० धडपड्या रक्तदात्यांची एकत्रित बांधणी केली. राज्यासह दिल्ली, हरियाणा, ओडिशा व अन्य राज्यात जेथे या दुर्मिळ रक्ताची गरज भासेल, त्याठिकाणी ते रक्त विनामूल्य पोहोचविण्याचे काम विक्रम यादव व त्यांची टीम करीत आहे. या दोन्ही संघटनांसह आजही जिल्ह्यात अनेक संस्था, संघटना रक्तदात्यांची ही चळवळ बळकट करण्याचे काम तितक्याच जोमाने आणि आत्मियतेने करताना दिसत आहेत.शासनाच्या उदासीनतेचा फटका!आयुष संस्थेचे प्रमुख अमोल पाटील म्हणाले की, रक्तदात्यांचे प्रमाण वाढत असतानाच शासनाच्या उदासीनतेचा फटका या चळवळीला बसताना दिसत आहे. आजही रक्तदात्यांकडून मोफत मिळणारे रक्त त्यावरील प्रक्रिया, महागड्या बॅग्ज यामुळे रुग्णापर्यंत जाईपर्यंत महागडे होते. एसडीपीचा केलेला पुरवठा रुग्णापर्यंत जाईपर्यंत ११ ते १२ हजार ५०० रुपयांपर्यंत महागडा होतो. याचे कारण म्हणजे रक्तावरील प्रक्रिया आणि विशेषत: त्यासाठी वापरल्या जाणाºया बॅग्जच्या किमती. होल ब्लड, प्लेटलेटस्, क्रायो, एफएफपी यासारखे रक्तघटकसुद्धा अशाच प्रक्रियेतून जातात. शासनाने चळवळीचाच एक भाग म्हणून जर यासाठी अनुदान दिले तर, अत्यंत कमी किमतीत हे रक्त गरीब रुग्णांपर्यंत पोहोचविता येऊ शकेल.तुटवड्याचा काळ संपणार कधी?राज्याच्या ऐच्छिक रक्तदात्यांचा आलेख पाहिला तर, १९९६ मध्ये ३८ टक्के इतके प्रमाण होते. २०१६ पर्यंत रक्तदात्यांचा मागणीच्या तुलनेतील पुरवठा ९७.०६ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील काही रक्तपेढी चालकांशी केलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात हेच प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांच्या घरात असेल. रक्ताचा सर्वात मोठा तुटवडा मार्च ते जून या महिन्यांमध्ये जाणवतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षा व सुटीचा कालावधी असल्याने या कालावधित रक्तपुरवठ्याचे प्रमाण घटते. संघटनात्मक पातळीवर आता या कालावधित शिबिर घेणे गरजेचे आहे. 

रक्त व रक्तघटकांचे संक्रमण हजारो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी मदत करते. त्यामुळे रक्तदानाची ही चळवळ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. रक्तदान केल्याने रुग्णांबरोबरच दात्याच्या आरोग्यालाही तितकेच फायदे मिळत असतात. सांगली जिल्ह्यात ही चळवळ वाढताना दिसत आहे.- डॉ. प्रणिता गायकवाडरक्त संक्रमण अधिकारी, शासकीय रुग्णालय, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक