शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सांगली जिल्ह्यात विस्तारतेय दुर्मिळ रक्तदात्यांची चळवळ...--रक्तदाता दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:12 IST

अविनाश कोळी ।सांगली : जनजागृती, शिबिरांची वाढती संख्या, संघटनात्मक चळवळीला मिळणारे बळ यामुळे गेल्या काही वर्षांत सांगली जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. त्यातही आता दुर्मिळ रक्तदात्यांकडून दिले जाणारे योगदान ठळकपणे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून त्यांचे दातृत्व विस्तारत आहे.राज्याचा रक्तदात्यांचा आलेख ज्यापद्धतीने वाढत आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील रक्तदात्यांची ...

ठळक मुद्देजागृतीचा परिणाम : संख्या पन्नास हजारांवर;जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून गरजूंसाठी रक्तदाते सरसावत असल्याचे चित्र

अविनाश कोळी ।सांगली : जनजागृती, शिबिरांची वाढती संख्या, संघटनात्मक चळवळीला मिळणारे बळ यामुळे गेल्या काही वर्षांत सांगली जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. त्यातही आता दुर्मिळ रक्तदात्यांकडून दिले जाणारे योगदान ठळकपणे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून त्यांचे दातृत्व विस्तारत आहे.

राज्याचा रक्तदात्यांचा आलेख ज्यापद्धतीने वाढत आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्याही वाढताना दिसते. मागणीच्या तुलनेत आजही शंभर टक्के ऐच्छिक रक्तदान होत नसले तरी, भविष्यात हा आकडा गाठणे कठीण नसल्याचेही आशादायी चित्र दिसून येते. साधारण रक्तदानाच्या चळवळीसोबतच दुर्मिळ रक्तगटासाठी विशेष मोहिमा राबविणाऱ्या संघटनांचा जन्म गेल्या काही वर्षांत झाला. यामध्ये आयुष ब्लड हेल्पलाईन, बॉम्बे ओ ग्रुप यासारख्या आणखी काही संघटनांचा समावेश आहे. आयुष या संस्थेकडे ९५०० दात्यांचा मोठा गट आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ३५०० रुग्णांना निगेटिव्ह रक्ताचा, दीड हजार रुग्णांना प्लेटलेटस्चा आणि १७५ रुग्णांना एसडीपी (सिंगल डोनर प्लेटलेटस्)चा पुरवठा केला आहे. त्यांची चळवळ सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यांपर्यंत वाढली आहे.

बॉम्बे ओ या दुर्मिळ रक्तगटाचे जिल्ह्यात केवळ चौघेच आहेत. या चारही लोकांनी अनेकजणांना जीवदान दिले आहे. संपूर्ण महाराष्टÑात त्यांनी १५ हजार ७३० धडपड्या रक्तदात्यांची एकत्रित बांधणी केली. राज्यासह दिल्ली, हरियाणा, ओडिशा व अन्य राज्यात जेथे या दुर्मिळ रक्ताची गरज भासेल, त्याठिकाणी ते रक्त विनामूल्य पोहोचविण्याचे काम विक्रम यादव व त्यांची टीम करीत आहे. या दोन्ही संघटनांसह आजही जिल्ह्यात अनेक संस्था, संघटना रक्तदात्यांची ही चळवळ बळकट करण्याचे काम तितक्याच जोमाने आणि आत्मियतेने करताना दिसत आहेत.शासनाच्या उदासीनतेचा फटका!आयुष संस्थेचे प्रमुख अमोल पाटील म्हणाले की, रक्तदात्यांचे प्रमाण वाढत असतानाच शासनाच्या उदासीनतेचा फटका या चळवळीला बसताना दिसत आहे. आजही रक्तदात्यांकडून मोफत मिळणारे रक्त त्यावरील प्रक्रिया, महागड्या बॅग्ज यामुळे रुग्णापर्यंत जाईपर्यंत महागडे होते. एसडीपीचा केलेला पुरवठा रुग्णापर्यंत जाईपर्यंत ११ ते १२ हजार ५०० रुपयांपर्यंत महागडा होतो. याचे कारण म्हणजे रक्तावरील प्रक्रिया आणि विशेषत: त्यासाठी वापरल्या जाणाºया बॅग्जच्या किमती. होल ब्लड, प्लेटलेटस्, क्रायो, एफएफपी यासारखे रक्तघटकसुद्धा अशाच प्रक्रियेतून जातात. शासनाने चळवळीचाच एक भाग म्हणून जर यासाठी अनुदान दिले तर, अत्यंत कमी किमतीत हे रक्त गरीब रुग्णांपर्यंत पोहोचविता येऊ शकेल.तुटवड्याचा काळ संपणार कधी?राज्याच्या ऐच्छिक रक्तदात्यांचा आलेख पाहिला तर, १९९६ मध्ये ३८ टक्के इतके प्रमाण होते. २०१६ पर्यंत रक्तदात्यांचा मागणीच्या तुलनेतील पुरवठा ९७.०६ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील काही रक्तपेढी चालकांशी केलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात हेच प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांच्या घरात असेल. रक्ताचा सर्वात मोठा तुटवडा मार्च ते जून या महिन्यांमध्ये जाणवतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षा व सुटीचा कालावधी असल्याने या कालावधित रक्तपुरवठ्याचे प्रमाण घटते. संघटनात्मक पातळीवर आता या कालावधित शिबिर घेणे गरजेचे आहे. 

रक्त व रक्तघटकांचे संक्रमण हजारो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी मदत करते. त्यामुळे रक्तदानाची ही चळवळ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. रक्तदान केल्याने रुग्णांबरोबरच दात्याच्या आरोग्यालाही तितकेच फायदे मिळत असतात. सांगली जिल्ह्यात ही चळवळ वाढताना दिसत आहे.- डॉ. प्रणिता गायकवाडरक्त संक्रमण अधिकारी, शासकीय रुग्णालय, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक