शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सांगली जिल्ह्यात विस्तारतेय दुर्मिळ रक्तदात्यांची चळवळ...--रक्तदाता दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:12 IST

अविनाश कोळी ।सांगली : जनजागृती, शिबिरांची वाढती संख्या, संघटनात्मक चळवळीला मिळणारे बळ यामुळे गेल्या काही वर्षांत सांगली जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. त्यातही आता दुर्मिळ रक्तदात्यांकडून दिले जाणारे योगदान ठळकपणे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून त्यांचे दातृत्व विस्तारत आहे.राज्याचा रक्तदात्यांचा आलेख ज्यापद्धतीने वाढत आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील रक्तदात्यांची ...

ठळक मुद्देजागृतीचा परिणाम : संख्या पन्नास हजारांवर;जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून गरजूंसाठी रक्तदाते सरसावत असल्याचे चित्र

अविनाश कोळी ।सांगली : जनजागृती, शिबिरांची वाढती संख्या, संघटनात्मक चळवळीला मिळणारे बळ यामुळे गेल्या काही वर्षांत सांगली जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. त्यातही आता दुर्मिळ रक्तदात्यांकडून दिले जाणारे योगदान ठळकपणे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून त्यांचे दातृत्व विस्तारत आहे.

राज्याचा रक्तदात्यांचा आलेख ज्यापद्धतीने वाढत आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्याही वाढताना दिसते. मागणीच्या तुलनेत आजही शंभर टक्के ऐच्छिक रक्तदान होत नसले तरी, भविष्यात हा आकडा गाठणे कठीण नसल्याचेही आशादायी चित्र दिसून येते. साधारण रक्तदानाच्या चळवळीसोबतच दुर्मिळ रक्तगटासाठी विशेष मोहिमा राबविणाऱ्या संघटनांचा जन्म गेल्या काही वर्षांत झाला. यामध्ये आयुष ब्लड हेल्पलाईन, बॉम्बे ओ ग्रुप यासारख्या आणखी काही संघटनांचा समावेश आहे. आयुष या संस्थेकडे ९५०० दात्यांचा मोठा गट आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ३५०० रुग्णांना निगेटिव्ह रक्ताचा, दीड हजार रुग्णांना प्लेटलेटस्चा आणि १७५ रुग्णांना एसडीपी (सिंगल डोनर प्लेटलेटस्)चा पुरवठा केला आहे. त्यांची चळवळ सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यांपर्यंत वाढली आहे.

बॉम्बे ओ या दुर्मिळ रक्तगटाचे जिल्ह्यात केवळ चौघेच आहेत. या चारही लोकांनी अनेकजणांना जीवदान दिले आहे. संपूर्ण महाराष्टÑात त्यांनी १५ हजार ७३० धडपड्या रक्तदात्यांची एकत्रित बांधणी केली. राज्यासह दिल्ली, हरियाणा, ओडिशा व अन्य राज्यात जेथे या दुर्मिळ रक्ताची गरज भासेल, त्याठिकाणी ते रक्त विनामूल्य पोहोचविण्याचे काम विक्रम यादव व त्यांची टीम करीत आहे. या दोन्ही संघटनांसह आजही जिल्ह्यात अनेक संस्था, संघटना रक्तदात्यांची ही चळवळ बळकट करण्याचे काम तितक्याच जोमाने आणि आत्मियतेने करताना दिसत आहेत.शासनाच्या उदासीनतेचा फटका!आयुष संस्थेचे प्रमुख अमोल पाटील म्हणाले की, रक्तदात्यांचे प्रमाण वाढत असतानाच शासनाच्या उदासीनतेचा फटका या चळवळीला बसताना दिसत आहे. आजही रक्तदात्यांकडून मोफत मिळणारे रक्त त्यावरील प्रक्रिया, महागड्या बॅग्ज यामुळे रुग्णापर्यंत जाईपर्यंत महागडे होते. एसडीपीचा केलेला पुरवठा रुग्णापर्यंत जाईपर्यंत ११ ते १२ हजार ५०० रुपयांपर्यंत महागडा होतो. याचे कारण म्हणजे रक्तावरील प्रक्रिया आणि विशेषत: त्यासाठी वापरल्या जाणाºया बॅग्जच्या किमती. होल ब्लड, प्लेटलेटस्, क्रायो, एफएफपी यासारखे रक्तघटकसुद्धा अशाच प्रक्रियेतून जातात. शासनाने चळवळीचाच एक भाग म्हणून जर यासाठी अनुदान दिले तर, अत्यंत कमी किमतीत हे रक्त गरीब रुग्णांपर्यंत पोहोचविता येऊ शकेल.तुटवड्याचा काळ संपणार कधी?राज्याच्या ऐच्छिक रक्तदात्यांचा आलेख पाहिला तर, १९९६ मध्ये ३८ टक्के इतके प्रमाण होते. २०१६ पर्यंत रक्तदात्यांचा मागणीच्या तुलनेतील पुरवठा ९७.०६ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील काही रक्तपेढी चालकांशी केलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात हेच प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांच्या घरात असेल. रक्ताचा सर्वात मोठा तुटवडा मार्च ते जून या महिन्यांमध्ये जाणवतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षा व सुटीचा कालावधी असल्याने या कालावधित रक्तपुरवठ्याचे प्रमाण घटते. संघटनात्मक पातळीवर आता या कालावधित शिबिर घेणे गरजेचे आहे. 

रक्त व रक्तघटकांचे संक्रमण हजारो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी मदत करते. त्यामुळे रक्तदानाची ही चळवळ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. रक्तदान केल्याने रुग्णांबरोबरच दात्याच्या आरोग्यालाही तितकेच फायदे मिळत असतात. सांगली जिल्ह्यात ही चळवळ वाढताना दिसत आहे.- डॉ. प्रणिता गायकवाडरक्त संक्रमण अधिकारी, शासकीय रुग्णालय, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक