शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

सांगली जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक लोक पूरबाधित - : अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 19:37 IST

सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू ...

ठळक मुद्दे४२ हजारहून अधिक जनावरे विस्थापित

सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. दि. १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण १०४ पूरबाधित गावांतील सुमारे ३४ हजार ९१७ कुटुंबांतील ३ लाख ११ हजार ४८५ लोक व ४२ हजार ४९४ जनावरे विस्थापित झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील ११ हजार ३४ कुटुंबांतील ४९ हजार ५३० व्यक्ती आणि १६ हजार ३६३ जनावरांचे प्रशासकीय कँपमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. २३ हजार ८८३ कुटुंबांतील १ लाख २४ हजार ९५५ व्यक्ती आणि २६ हजार १३१ जनावरे संबंधितांनी नातेवाईक व स्वत:च्या सोयीनुसार विस्थापित केली आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील १ लाख ३७ हजार व्यक्ती नातेवाईक व स्वत:च्या सोयीनुसार विस्थापित झाल्या आहेत.

डॉ. चौधरी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील ३ हजार ८८१ कुटुंबांतील १५ हजार ५२२ लोक व ७२० जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील १ लाख ३७ हजार व्यक्ती नातेवाईक व स्वत:च्या सोयीनुसार विस्थापित आहेत.

मिरज तालुक्यातील २० गावांतील १० हजार ४७६ कुटुंबांतील ५२ हजार ५१४ लोक व १२ हजार ६६१ जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील २५ गावांतील ७ हजार ६५१ कुटुंबांतील ३७ हजार ७२० लोक व ११ हजार २५१ जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील ३७ गावांतील १२ हजार २५६ कुटुंबांतील ६५ हजार ५४७ लोक व १५ हजार १३५ जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील २१ गावांतील ६५३ कुटुंबांतील ३ हजार १८२ लोक व २ हजार ७२७ जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरcommissionerआयुक्त