शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-मिरज रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्यांसाठी मुहूर्त अखेर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

सांगली ते मिरज रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सध्या सुरू आहे, त्यामुळे रस्त्याची सुरक्षितता व सौंदर्य वाढले आहे. लोकमत ...

सांगली ते मिरज रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सध्या सुरू आहे, त्यामुळे रस्त्याची सुरक्षितता व सौंदर्य वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अनेक अपघात आणि वाहनचालकांच्या तक्रारींची रीघ याची दखल घेत अखेर सांगली-मिरज रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी सुमारे १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काही ठिकाणी लाल रंगाचे रिफ्लेक्टरही बसविले जाणार आहेत, त्यामुळे रस्त्याचे सौंदर्यही वाढणार आहे.

सध्या काम गतीने सुरू आहे. वाहनांची संख्या कमी झाल्यानंतर रात्रीच्या वेळी पट्टे मारले जात आहेत. सांगली-मिरजदरम्यान २६ ठिकाणी गतिरोधक आणि झेब्रा पट्टे रंगविले जात आहेत. विशेषत: गतिरोधकांना प्राधान्य देण्यात आले आहे. विश्रामबाग, भारती रुग्णालय, विजयनगर आदी ठिकाणी झेब्रा पट्टे रंगविले जात आहेत. यामुळे रस्त्याचे सौंदर्य वाढले आहे, शिवाय तो सुरक्षितही झाला आहे.

विश्रामबाग ते सांगलीदरम्यान गतिरोधकांमध्ये लाल रंगाचे रिफ्लेक्टरही बसविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रात्री वाहनाचालकांना ते ठळकपणे नजरेत येतील. हा रस्ता बहुतांश वेळा अंधारात बुडालेला असतो. पथदिवे बंदच असतात. काही ठिकाणी गर्द झाडीमुळेही रस्त्यावर प्रकाश पडत नाही. अशावेळी रिफ्लेक्टर वाहनचालकांना सतर्क करण्याचे काम करतील.

चौकट

अपघातांमध्ये लाखोंची वित्तहानी

सांगली-मिरज रस्त्यावरील गतिरोधक लक्षात न आल्याने अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. कृपामयीजवळ गतिरोधक लक्षात न आल्याने वेगातील दोन कंटेनर परस्परांवर आदळून खूपच मोठी हानी झाली होती. भारती रुग्णालय, वालचंद महाविद्यालय, वानलेसवाडी येथील गतिरोधक अजिबात लक्षात न आल्याने अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. पट्टे मारल्याने अपघातांना आळा बसणार आहे.

चौकट

१०० मीटर अंतरात पाच गतिरोधक

मिरजेत शास्त्री चौक ते नदीवेस हा रस्ता सहा महिन्यांपूर्वी नव्याने करण्यात आला. बांधकाम विभागाने रहिवाशांच्या सुरक्षिततेची जरा जास्तच काळजी घेतली. अवघ्या १०० मीटर अंतरात तब्बल पाच गतिरोधक बसविले. त्यामुळे वाहनांना हा रस्ता पार करणे म्हणजे दिव्यच ठरत आहे. कोणताही शास्त्रशुद्ध विचार न करता अधिकाऱ्यांनी मनमानीपणे गतिरोधक बसवले आहेत. त्याच्यावर पट्टेही मारले नाहीत.