शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केलेः मोहन प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 20:10 IST

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले असून भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन यांनी केली आहे.

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले असून भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन यांनी केली आहे.ते सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित जनआक्रोश मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. पतंगराव कदम, नसीम खान, हर्षवर्धन पाटील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहन प्रकाशभाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. गेल्या तीन वर्षापासून शेतमालाला हमीभाव नाही. महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. यवतमाळमध्ये 25 शेतक-यांचा फवारणी करताना मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायला वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर नाचत असून,मोदी आणि जेटलींनी देश विकण्याचे काम सुरु केले आहे, असा घणाघाती आरोप मोहन प्रकाश यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी इंग्रजांची दलाली केली, ते सत्तेत बसून आज आम्हाला देशभक्ती शिकवू पाहत आहेत. काळा पैसा आणू म्हणणाऱ्या आणि १५ लाख रुपये बँक खात्यावर जमा करणा-यांनी किमान १५ हजार रुपयांची तरी मनीऑर्डर करायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला. भुपिंदरसिंग हुडाभाजपचे सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. युपीए सरकारच्या काळात समाधानी असणारा शेतकरी आज दुःखात आहे. शेतक-यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. धानाला भाव नाही मात्र तांदळाचे भाव वाढतच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 50 टक्क्याने कमी झाले आहेत देशात मात्र इंधनाचे दर वाढतच आहेत. तेलाचे दर वाढवून सरकारने 3 लाख कोटी रूपये कमावले आहेत. मोदी सरकार गरिबविरोधी आहे. निवडणुकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते पण सत्तेवर येताच शिफारशी लागू करणे अशक्य असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले. युपीए सरकारच्या काळात हमीभावात दरवर्षी सरासरी 15 टक्के वाढ केली जायची या सरकारच्या काळात 4 टक्के ही वाढ नाही. नोटाबंदीमुळे देशातील उद्योगांना बसला असून उत्पादन घटले चीनमधून होणारी आयातीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नोटाबंदीचा खरा फायदा चीनलाच झाला आहे. देशभरात सरकारविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण असून जनआक्रोश मेळाव्याला जमलेला हा जसमुदाय परिवर्तनाचा संकेत आहे असे हुडा म्हणाले. अशोकराव चव्हाणराज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सरकार कसे चालवतात हे भाजपच्या लोकांना कळत नाही. या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही. फसव्या घोषणा करणे आणि खोट्या जाहिराती देणे एवढेच काम या सरकारने केले आहे. राज्यातील शेतक-यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी देऊ.