शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मिरजेचे शिवाजी क्रीडांगण बनले तळे

By admin | Updated: October 23, 2014 00:04 IST

खेळ ठप्प : तीन महिने मैदान पाण्यात असल्याने दिवाळी सुट्टीत खेळाडूंची अडचण

मिरज : मिरज शहरातील एकमेव असलेल्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर गेल्या तीन महिन्यांपासून पाणी साचले आहे. मैदानाचा तलाव झाल्याने दिवाळीच्या सुट्टीत खेळण्यासाठी मैदान नसल्याने खेळाडूंची व बालगोपाळांची अडचण झाली आहे. शहराच्या मध्यभागी असलेले छत्रपती शिवाजी क्रीडांगण खेळाडूंच्या सोयीचे आहे. या क्रीडांगणावर दररोज अनेक खेळाडू क्रिकेट व फुटबॉल खेळायचे, नागरिकांसाठी सकाळी फिरण्यासाठीही या मैदानाचा उपयोग होतो. मात्र आॅगस्ट महिन्यापासून क्रीडांगणावर सुमारे चार फूट पावसाचे पाणी साचल्याने क्रीडांगणास तलावाचे स्वरूप आले आहे. याबाबत महापालिकेकडे खेळाडूंनी वारंवार तक्रार करूनही उपययोजना करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या मालकीच्या या मैदानाकडे महापालिका प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. शहरातील क्रीडाप्रेमी नगरसेवकांनीही मैदानाच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. तीन महिन्यांपासून क्रीडांगणावर पाणी साचल्याने क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. मैदानाच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हे पाणी क्रीडांगणात साचते. यावर्षी पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने पाणी मोठ्याप्रमाणात साचले आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. क्रीडांगणावरील पाणी त्वरित काढण्याची मागणी क्रीडाप्रेमी व खेळाडू करीत आहेत. मिरजेत छत्रपती शिवाजी क्रीडांगण हे एकमेव खेळाचे मोठे मैदान असल्याने येथे क्रिकेट, फुटबॉलसह विविध क्रीडा स्पर्धा होतात. दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी असल्याने खेळाचा सराव करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची व खेळाडूंची अडचण झाली आहे. या मैदानावर नेहमीच फुटबॉल स्पर्धा सुरू असतात. या दिवाळीच्या सुट्टीत क्रीडांगणावर खेळाऐवजी म्हैशी पाण्यात डुंबत असल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)वारंवार आंदोलने करूनही दुर्लक्षक्रीडांगणाची दुरवस्था दूर करण्यासाठी क्रीडांगण बचाव समिती व खेळाडूंनी वारंवार आंदोलने केली आहेत. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. पावसाळा अद्याप सुरू असल्याने पंप लावून मैदानात साचलेले पाणी काढता येत नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबॉल स्पर्धा आयोजित करून मोठ्याप्रमाणात निधी संकलन करणाऱ्या नगरसेवकांनी मैदानाच्या सुधारणेबाबत डोळेझाक केली आहे.