शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मंत्र्यांनी कान उपटले अन् फायली मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:59 IST

कृषिमंत्री दादा भुसे यांनी कान उपटल्यानंतर कृषी कार्यालय मान मुरडून कामाला लागले आहे. कृषी व्यवसायासाठी परवान्याच्या फायलींची निर्गती करण्यासाठी वीस कृषी सहायकांना जुंपले आहे. यानिमित्ताने या कार्यालयातील खाबूगिरीवरच मंत्रीमहोदयांनी नेमके बोट ठेवल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांनी कान उपटले अन् फायली मार्गीकृषी कार्यालय लागले मान मुरडून कामाला

संतोष भिसे सांगली : कृषिमंत्री दादा भुसे यांनी कान उपटल्यानंतर कृषी कार्यालय मान मुरडून कामाला लागले आहे. कृषी व्यवसायासाठी परवान्याच्या फायलींची निर्गती करण्यासाठी वीस कृषी सहायकांना जुंपले आहे. यानिमित्ताने या कार्यालयातील खाबूगिरीवरच मंत्रीमहोदयांनी नेमके बोट ठेवल्याची चर्चा आहे.परवाने म्हणजे मलिद्याचे मोठे कुरण ठरले आहे. जिल्हाभरात सुमारे दोन ते अडीच हजार दुकाने आहेत. त्यांच्या परवान्यांची प्रक्रिया वर्षभर चालते. औषधे, खते व बियाणे अशा तिहेरी परवान्यांच्या प्रस्तावांची वार्षिक संख्या किमान सात हजारांवर जाते. वजनाविना प्रस्ताव पुढे सरकतच नसल्याचा दुकानदारांचा अनुभव आहे. खरिपाच्या हंगामात हा व्यवसाय जोमात असतो. नेमक्या याचवेळी परवान्याचे घोडे अडते. मंत्री भुसे यांनी स्वत:च सुमारे ७४० प्रस्ताव निर्गतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगून, या विभागातील खाबूगिरीवर बोट ठेवले.मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शंकर नरळे या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड  चालली. पण इतके प्रस्ताव प्रलंबित असताना वरिष्ठांचे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न आता चवीचवीने चर्चेत आहे. मासिक आढावा बैठकीत बियाणे, खतांची उपलब्धता, शेततळी, हरितगृहे, शेडनेट आदींचा आढावा होतो. त्यामध्ये परवान्याच्या प्रलंबित फायलींविषयी चर्चा होत नाही काय, असाही प्रश्न पुढे येतो.गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील अनेक दुकानांवर छापे टाकण्यात आले, पण कारवाई कोणावरच झाली नाही. दुकानांचे कामकाज चोख सुरु असल्याची कृषी विभागाची सोयीस्कर समजूत झाल्याचे यातून स्पष्ट होते. 

टॅग्स :GovernmentसरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगली